शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

‘विधिमंडळ समित्यांची बदनामी होऊ देऊ नका’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:23 IST

या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

 मुंबई : विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी व्हावे यासाठी कार्यरत असलेल्या ३० संसदीय समित्यांच्या कामकाजाचा प्रारंभ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

फडणवीस म्हणाले की, काही वर्षांपूर्वी या समित्यांची खूप बदनामी झाली होती. जिथेही काही समित्यांचे अध्यक्ष, सदस्य जायचे तिथे घबराट असायची. काही मागण्या केल्या गेल्या आणि त्यातूनही मोठी बदनामी झालेली होती. समित्यांच्या आड ब्लॅकमेल केले जात असल्याच्या तक्रारीदेखील झाल्या होत्या. मात्र, नंतर कारभारात बरीच सुधारणा झाली. या समित्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले जाऊ शकतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. समित्यांमध्ये जे सदस्य प्रभावीपणे काम करतात त्यांची कामे सरकार दरबारी अडत नाहीत, उलट ती लवकर होतात.  

सभापती, अध्यक्षांनी दौऱ्यांबाबत ठरवावे विधिमंडळ समित्यांचे परदेशातही दौरे आयोजित करण्याची मागणी आज झाली आहे. विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्षांनी त्या बाबत निर्णय घ्यावा, सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. 

विधिमंडळ समित्या या कामकाजाचा आत्मा विधिमंडळाच्या समित्या या विधिमंडळ कामकाजाचा आत्मा आहेत. या समित्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करून विधिमंडळाला आणि सरकारलाही उत्तरादायी करता येते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकार