शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

‘विधिमंडळ समित्यांची बदनामी होऊ देऊ नका’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:23 IST

या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

 मुंबई : विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी व्हावे यासाठी कार्यरत असलेल्या ३० संसदीय समित्यांच्या कामकाजाचा प्रारंभ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

फडणवीस म्हणाले की, काही वर्षांपूर्वी या समित्यांची खूप बदनामी झाली होती. जिथेही काही समित्यांचे अध्यक्ष, सदस्य जायचे तिथे घबराट असायची. काही मागण्या केल्या गेल्या आणि त्यातूनही मोठी बदनामी झालेली होती. समित्यांच्या आड ब्लॅकमेल केले जात असल्याच्या तक्रारीदेखील झाल्या होत्या. मात्र, नंतर कारभारात बरीच सुधारणा झाली. या समित्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले जाऊ शकतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. समित्यांमध्ये जे सदस्य प्रभावीपणे काम करतात त्यांची कामे सरकार दरबारी अडत नाहीत, उलट ती लवकर होतात.  

सभापती, अध्यक्षांनी दौऱ्यांबाबत ठरवावे विधिमंडळ समित्यांचे परदेशातही दौरे आयोजित करण्याची मागणी आज झाली आहे. विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्षांनी त्या बाबत निर्णय घ्यावा, सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. 

विधिमंडळ समित्या या कामकाजाचा आत्मा विधिमंडळाच्या समित्या या विधिमंडळ कामकाजाचा आत्मा आहेत. या समित्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करून विधिमंडळाला आणि सरकारलाही उत्तरादायी करता येते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकार