शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

‘विधिमंडळ समित्यांची बदनामी होऊ देऊ नका’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:23 IST

या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

 मुंबई : विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी व्हावे यासाठी कार्यरत असलेल्या ३० संसदीय समित्यांच्या कामकाजाचा प्रारंभ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

फडणवीस म्हणाले की, काही वर्षांपूर्वी या समित्यांची खूप बदनामी झाली होती. जिथेही काही समित्यांचे अध्यक्ष, सदस्य जायचे तिथे घबराट असायची. काही मागण्या केल्या गेल्या आणि त्यातूनही मोठी बदनामी झालेली होती. समित्यांच्या आड ब्लॅकमेल केले जात असल्याच्या तक्रारीदेखील झाल्या होत्या. मात्र, नंतर कारभारात बरीच सुधारणा झाली. या समित्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले जाऊ शकतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. समित्यांमध्ये जे सदस्य प्रभावीपणे काम करतात त्यांची कामे सरकार दरबारी अडत नाहीत, उलट ती लवकर होतात.  

सभापती, अध्यक्षांनी दौऱ्यांबाबत ठरवावे विधिमंडळ समित्यांचे परदेशातही दौरे आयोजित करण्याची मागणी आज झाली आहे. विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्षांनी त्या बाबत निर्णय घ्यावा, सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. 

विधिमंडळ समित्या या कामकाजाचा आत्मा विधिमंडळाच्या समित्या या विधिमंडळ कामकाजाचा आत्मा आहेत. या समित्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करून विधिमंडळाला आणि सरकारलाही उत्तरादायी करता येते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकार