शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कासच्या सुंदर पुष्प पठारावर तरी जेसीबी चालवू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 06:18 IST

‘कास पठार येथील अनधिकृत बांधकामांना परवानगी देताच कशी’, असा संतप्त सवाल राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात एका याचिकेद्वारे विचारण्यात आला आहे.

‘कास पठार येथील अनधिकृत बांधकामांना परवानगी देताच कशी’, असा संतप्त सवाल राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात एका याचिकेद्वारे विचारण्यात आला आहे. कास पठार परिसरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे पर्यावरणाची हानी होत असताना अनधिकृत १५५ बांधकामे अधिकृत करण्याचा घाट घातला जात आहे.

कास पठारावर रानफुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसास्थळांच्या संरक्षित यादीत समावेश करण्यात आला आहे. पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील कास पठारावर अनधिकृत बांधकामे वाढणे आणि ती अधिकृत करणे हे अत्यंत असंवेदनशील, अदूरदृष्टीपणाचे लक्षण आहे. 

मध्यंतरी कास पठारावर कथित पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  या महोत्सवात लेझर शो, संगीत, नाचगाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खाद्यपदार्थांची रेलचेलदेखील होती. या कार्यक्रमाचे आयोजन खाजगी पातळीवर करण्यात आले होते. तरी त्याला शासनाच्या विविध विभागांचा वरदहस्त होता. अन्यथा जागतिक स्थळाचा वारसा लाभलेल्या कास पठारावर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे ना आयोजन होणे शक्य होते, ना झाडे तोडत सपाटीकरणासाठी जेसीबीसारखी वाहने वापरणे शक्य होते. पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाबाबतची ही आपली सामाजिक, राजकीय समज  !रामदास  स्वामींनी फांदीच्या शेंड्यावर बसून बुडाकडील फांदी तोडणाऱ्या आत्ममग्न इसमाची संभावना ऐतिहासिक मूर्ख अशी केली आहेच ! - आपलीही गत तशीच झाली आहे.- बाळकृष्ण शिंदे, पुणे