शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नेत्रदानाला नाही ‘अर्जाची’ आडकाठी

By admin | Updated: June 9, 2016 01:13 IST

नेत्रदानासाठी अर्ज केला होता, याचा कोणताही डेटा उपलब्ध नाही आणि अर्ज भरला तरी कुटुंबीयांची परवानगी असल्याशिवाय नेत्रदान होऊ शकत नाही.

पुणे : एखादी व्यक्ती गेली, तरी तिने पूर्वी नेत्रदानासाठी अर्ज केला होता, याचा कोणताही डेटा उपलब्ध नाही आणि अर्ज भरला तरी कुटुंबीयांची परवानगी असल्याशिवाय नेत्रदान होऊ शकत नाही. म्हणूनच आता कुटुंबीयांना मृत व्यक्तीचे नेत्रदान करायची इच्छा असेल, तर त्यांनीच डॉक्टरांशी संपर्क साधून ६ तासांच्या आत डोळे नेत्रपेढीकडे सुपूर्त केले, तर दुसरा जीव ही सुंदर सृष्टी बघू शकणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची कोणतीच आडकाठी राहिलेली नाही, असे पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सदस्य डॉ. बबन डोळस यांनी सांगितले. उद्या (दि. १०) जागतिक दृष्टिदान दिन आहे, त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आजमितीला संपूर्ण देशभरात वर्षभरात १ लाख नेत्रांची गरज भासत असून, महाराष्ट्रात हा आकडा ३० ते ४० हजारच्या आसपास आहे. मात्र, राज्यात नेत्रदात्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून, दर वर्षी केवळ ३,००० दातेच मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी तयार होत आहेत. आज विविध गणेश मंडळांसह अनेक संघटनांच्या माध्यमातून नेत्रदानासंबंधी अर्जांचे वाटप केले जाते आणि ते भरून घेतले जातात. मात्र, या अर्जांचा डेटा जतन करून ठेवला जात नाही. शासकीय स्तरावरही या अर्जांची कोणतीच माहिती उपलब्ध नाही आणि मुळातच त्या अर्जांना कायदेशीर आधार नाही. कुणीही व्यक्ती नंतर त्याचा पाठपुरावा करीत नाही. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी त्याने नेत्रदानासंबंधी अर्ज भरल असेल, तर त्याचा डेटाच उपलब्ध नसल्याने त्या अर्जाला काहीच अर्थ राहत नाही, असे पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सदस्य व ग्लोबल व्हिजन फाउंडेशन नेत्रपेढीचे संस्थापक डॉ. बबन डोळस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. >केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आजमितीला संपूर्ण देशभरात वर्षभरात १ लाख नेत्रांची गरज भासत असून, महाराष्ट्रात हा आकडा ३० ते ४० हजारच्या आसपास आहे. मात्र, राज्यात नेत्रदात्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून, दर वर्षी केवळ ३,००० दातेच मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी तयार होत आहेत.