शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

डोंबिवलीत डेंग्यूचा बळी?

By admin | Updated: July 4, 2016 03:44 IST

डोंबिवलीतील सागर्ली परिसरातील निशांत विजय ब्राह्मणे या चार वर्षांचा मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

कल्याण : वातावरणातील बदलामुळे एकीकडे कल्याण-डोंबिवलीत तापाचे रुग्ण वाढत असताना डोंबिवलीतील सागर्ली परिसरातील निशांत विजय ब्राह्मणे या चार वर्षांचा मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तो राहत असलेल्या विठ्ठल प्लाझा इमारतीतील १० ते १२ रहिवाशांनाही ताप आला असल्याने डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतरच निशांतचा मृत्यू डेंग्यूने झाला की नाही, हे स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून निशांतला ताप येत होता. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचाराकरिता दाखल केले होते. निशांतला ताप असताना काविळीचीही लागण झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली. त्याला कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, शुक्रवारी तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. परंतु, केडीएमसीच्या आरोग्य विभागाने मात्र यासंदर्भातील अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, सागर्ली परिसरातील विठ्ठल प्लाझा इमारतीतील तापाचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य विभागाने संबंधितांच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता घेतले असून या परिसरात आरोग्य विभागाकडून जंतुनाशक फवारणी करण्यात आल्याची माहिती नगरसेविका पाटील यांनी दिली. वातावरणातील बदलामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. यात डेंग्यूनेदेखील डोके वर काढल्याने आरोग्य विभागाचा साथीचे आजार नसल्याचा दावा एक प्रकारे फोल ठरला आहे. (प्रतिनिधी)>तापाची साथ नाहीयासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रभारी अधिकारी लीलाधर मस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरात कोणत्याही प्रकारच्या तापाची साथ नसल्याचे सांगितले. पावसाने जोर धरल्याने वातावरणात बदल झाला आहे. अशा वातावरणबदलामध्ये काही प्रमाणात तापाचे रुग्ण आढळतातच. निशांत ब्राह्मणे याचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे बोलले जात असले तरी त्याच्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांकडून अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी बोलणे उचित ठरेल, असे मस्के यांनी सांगितले. निशांत राहत असलेल्या ठिकाणी आणि ताप आलेल्या रहिवाशांच्या रक्ताचे नमुनेदेखील घेण्यात आले असून परिसराचे सर्वेक्षण करण्यात आल्याचेही ते म्हणाले.