शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत डेंग्यूचा बळी?

By admin | Updated: July 4, 2016 03:44 IST

डोंबिवलीतील सागर्ली परिसरातील निशांत विजय ब्राह्मणे या चार वर्षांचा मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

कल्याण : वातावरणातील बदलामुळे एकीकडे कल्याण-डोंबिवलीत तापाचे रुग्ण वाढत असताना डोंबिवलीतील सागर्ली परिसरातील निशांत विजय ब्राह्मणे या चार वर्षांचा मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तो राहत असलेल्या विठ्ठल प्लाझा इमारतीतील १० ते १२ रहिवाशांनाही ताप आला असल्याने डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतरच निशांतचा मृत्यू डेंग्यूने झाला की नाही, हे स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून निशांतला ताप येत होता. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचाराकरिता दाखल केले होते. निशांतला ताप असताना काविळीचीही लागण झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली. त्याला कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, शुक्रवारी तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. परंतु, केडीएमसीच्या आरोग्य विभागाने मात्र यासंदर्भातील अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, सागर्ली परिसरातील विठ्ठल प्लाझा इमारतीतील तापाचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य विभागाने संबंधितांच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता घेतले असून या परिसरात आरोग्य विभागाकडून जंतुनाशक फवारणी करण्यात आल्याची माहिती नगरसेविका पाटील यांनी दिली. वातावरणातील बदलामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. यात डेंग्यूनेदेखील डोके वर काढल्याने आरोग्य विभागाचा साथीचे आजार नसल्याचा दावा एक प्रकारे फोल ठरला आहे. (प्रतिनिधी)>तापाची साथ नाहीयासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रभारी अधिकारी लीलाधर मस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरात कोणत्याही प्रकारच्या तापाची साथ नसल्याचे सांगितले. पावसाने जोर धरल्याने वातावरणात बदल झाला आहे. अशा वातावरणबदलामध्ये काही प्रमाणात तापाचे रुग्ण आढळतातच. निशांत ब्राह्मणे याचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे बोलले जात असले तरी त्याच्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांकडून अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी बोलणे उचित ठरेल, असे मस्के यांनी सांगितले. निशांत राहत असलेल्या ठिकाणी आणि ताप आलेल्या रहिवाशांच्या रक्ताचे नमुनेदेखील घेण्यात आले असून परिसराचे सर्वेक्षण करण्यात आल्याचेही ते म्हणाले.