शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडून डोंबिवलीच्या प्रदूषणाची दखल

By admin | Updated: September 25, 2014 05:07 IST

गेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली परिसरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने भेडसावत असून वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीगेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली परिसरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने भेडसावत असून वारंवार होणा-या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, सजीवांच्या जीवस्वास्थ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याची मागणी करून डोंबिवलीतील नागरिकांसह सामाजिक संस्थांनी घातलेल्या साकड्याची केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, दिल्ली बोर्ड यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.त्यानुसार, याबाबत लवकरच एक उच्चस्तरीय समिती नेमून तिचा अहवाल मागवण्यात येणार असल्याचे आश्वासन पर्यावरणमंत्र्यांचे स्वीय सहायक गणेश रामदासी यांनी दिले. दक्ष नागरिक संघ आणि ईगल ब्रिगेड संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे याबाबतची सर्व माहिती दिली होती. त्यानुसार, तेथून गणेश यांनी संस्थेचे पदाधिकारी विश्वनाथ बिवलकर यांना बुधवारी ही माहिती दिली. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे परदेशी असून दोन दिवसांत भारतात आल्यावर याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात एमआयडीसी परिसरात जाणवणारी ही समस्या आता पांडुरंगवाडी, गांधीनगर, आयरे रोड, पाटकर विद्यालय परिसर इतकेच नव्हे तर जुनी डोंबिवली, डोंबिवली पश्चिमेपर्यंत पोहोचली असून त्याचा त्रास शेकडो रहिवाशांना होत आहे.