शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

माऊंट मेरीच्या जत्रेत 'मेणा’च्या प्रतिकृतीवर बंदी घालायची हिंमत आहे का ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 15, 2017 07:58 IST

माऊंट मेरीच्या जत्रेत सुरक्षेच्या कारणास्तव ‘मेणा’च्या प्रतिकृतीवर बंदी घालण्याची हिंमत आमचे प्रशासन दाखवणार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव श्रीफळ नेण्यास बंदी घालण्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. इतर धर्मीयांचीही प्रार्थनास्थळे मुंबई-महाराष्ट्रात आहेत. म्हणजे माऊंट मेरीच्या जत्रेत भाविक मोठय़ा प्रमाणात मेणबत्त्या किंवा देवीस आवडणारी मेणाची साधने श्रद्धापूर्वक अर्पण करतात. पण सुरक्षेच्या कारणास्तव ‘मेणा’च्या प्रतिकृतीवर तेथे बंदी घालण्याची हिंमत आमचे प्रशासन दाखवणार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
सिद्धिविनायक मंदिरात हार, फुले, नारळावर बंदी म्हणजे बंदी! पोलीस व मंदिराच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय म्हणे मंदिराच्या सुरक्षेसाठी घेतला आहे. श्रद्धा आणि भक्तीवर बंधने लादण्याचा हा निर्णय म्हणजे सरकारी तुघलकी कारभार आहे काय? असा प्रश्न मनात येतो. सिद्धिविनायकाचे मंदिर व त्या देवाचे भक्त या दोघांतला हा विषय आहे. सरकारने त्यात टांग अडवून विनाकारण अनेक लोकांचा रोजगार बुडवू नये. देवाचे रक्षण करणे जमत नसेल तर सिद्धिविनायक मंदिराबाहेर फलक लावून तसे जाहीर करा! देवा, सिद्धिविनायका, आता तूच या सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी दे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
इतरही अनेक निर्णय जाहीर करून मंदिर प्रशासन जणू ‘नोटाबंदी’ निर्णयाची परंपराच पुढे चालवीत आहे. मंदिराचे विश्वस्त मंडळ हे सरकार नेमत असते. त्यामुळे श्रद्धा आणि भक्तीवर बंधने लादण्याचा हा निर्णय म्हणजे सरकारी तुघलकी कारभार आहे काय? असा प्रश्न मनात येतो. मोठय़ा मंदिरांच्या आसपास हार, फुले व नारळ, प्रसाद, तेल, अगरबत्ती विकणाऱ्या असंख्य टपऱ्या वर्षानुवर्षे सुरू आहेत व देवाच्याच कृपेने या नारळ, हार, फुले विकणाऱ्यांची रोजीरोटी सुरू आहे. शेकडो कुटुंबांची गुजराण हार, फुले, नारळ विक्रीवर सुरू आहे. पण नारळ, फुले बंदीने या कुटुंबांचा रोजगार बुडाला आहे. त्यांची भरपाई तुम्ही कशी करणार? असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. 
 
मोदी यांच्या ‘नोटाबंदी’ने अनेक लोक बँकांच्या रांगेत मरण पावले. लाखोंना रोजगार गमावण्याचा फटका बसला व त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली हे लक्षात घ्यायला कुणी तयार नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे एकहाती सरकार आहे. त्यामुळे भक्तांच्या श्रद्धांना असे तडे देणे त्यांना शोभत नाही. मंदिरांचे संरक्षण हा सरकारी कामाचा एक भाग आहे व त्यासाठी भक्तांना असे गुन्हेगार ठरवण्याचे कारण नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
हाजीअली दर्ग्याच्या बाबतीत तेच म्हणावे लागेल. तेथेही आजूबाजूस जी दुकाने, टपऱ्या व फेरीवाले आहेत ते लोक श्रद्धेचा व्यवहार करून रोजीरोटी चालवतच असतात. अशा गोरगरीबांची रोजीरोटी एका फर्मानाने हिसकावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. नारळ, फुलांतून ‘बॉम्ब’ आत येतील असे ज्यांना वाटते ते येडचाप आहेत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.