शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

माऊंट मेरीच्या जत्रेत 'मेणा’च्या प्रतिकृतीवर बंदी घालायची हिंमत आहे का ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 15, 2017 07:58 IST

माऊंट मेरीच्या जत्रेत सुरक्षेच्या कारणास्तव ‘मेणा’च्या प्रतिकृतीवर बंदी घालण्याची हिंमत आमचे प्रशासन दाखवणार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव श्रीफळ नेण्यास बंदी घालण्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. इतर धर्मीयांचीही प्रार्थनास्थळे मुंबई-महाराष्ट्रात आहेत. म्हणजे माऊंट मेरीच्या जत्रेत भाविक मोठय़ा प्रमाणात मेणबत्त्या किंवा देवीस आवडणारी मेणाची साधने श्रद्धापूर्वक अर्पण करतात. पण सुरक्षेच्या कारणास्तव ‘मेणा’च्या प्रतिकृतीवर तेथे बंदी घालण्याची हिंमत आमचे प्रशासन दाखवणार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
सिद्धिविनायक मंदिरात हार, फुले, नारळावर बंदी म्हणजे बंदी! पोलीस व मंदिराच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय म्हणे मंदिराच्या सुरक्षेसाठी घेतला आहे. श्रद्धा आणि भक्तीवर बंधने लादण्याचा हा निर्णय म्हणजे सरकारी तुघलकी कारभार आहे काय? असा प्रश्न मनात येतो. सिद्धिविनायकाचे मंदिर व त्या देवाचे भक्त या दोघांतला हा विषय आहे. सरकारने त्यात टांग अडवून विनाकारण अनेक लोकांचा रोजगार बुडवू नये. देवाचे रक्षण करणे जमत नसेल तर सिद्धिविनायक मंदिराबाहेर फलक लावून तसे जाहीर करा! देवा, सिद्धिविनायका, आता तूच या सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी दे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
इतरही अनेक निर्णय जाहीर करून मंदिर प्रशासन जणू ‘नोटाबंदी’ निर्णयाची परंपराच पुढे चालवीत आहे. मंदिराचे विश्वस्त मंडळ हे सरकार नेमत असते. त्यामुळे श्रद्धा आणि भक्तीवर बंधने लादण्याचा हा निर्णय म्हणजे सरकारी तुघलकी कारभार आहे काय? असा प्रश्न मनात येतो. मोठय़ा मंदिरांच्या आसपास हार, फुले व नारळ, प्रसाद, तेल, अगरबत्ती विकणाऱ्या असंख्य टपऱ्या वर्षानुवर्षे सुरू आहेत व देवाच्याच कृपेने या नारळ, हार, फुले विकणाऱ्यांची रोजीरोटी सुरू आहे. शेकडो कुटुंबांची गुजराण हार, फुले, नारळ विक्रीवर सुरू आहे. पण नारळ, फुले बंदीने या कुटुंबांचा रोजगार बुडाला आहे. त्यांची भरपाई तुम्ही कशी करणार? असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. 
 
मोदी यांच्या ‘नोटाबंदी’ने अनेक लोक बँकांच्या रांगेत मरण पावले. लाखोंना रोजगार गमावण्याचा फटका बसला व त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली हे लक्षात घ्यायला कुणी तयार नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे एकहाती सरकार आहे. त्यामुळे भक्तांच्या श्रद्धांना असे तडे देणे त्यांना शोभत नाही. मंदिरांचे संरक्षण हा सरकारी कामाचा एक भाग आहे व त्यासाठी भक्तांना असे गुन्हेगार ठरवण्याचे कारण नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
हाजीअली दर्ग्याच्या बाबतीत तेच म्हणावे लागेल. तेथेही आजूबाजूस जी दुकाने, टपऱ्या व फेरीवाले आहेत ते लोक श्रद्धेचा व्यवहार करून रोजीरोटी चालवतच असतात. अशा गोरगरीबांची रोजीरोटी एका फर्मानाने हिसकावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. नारळ, फुलांतून ‘बॉम्ब’ आत येतील असे ज्यांना वाटते ते येडचाप आहेत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.