शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आम्ही काय विना पदोन्नतीनेच निवृत्त व्हायचे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:48 IST

आरोग्य विभागातील डॉक्टरांचा संतप्त सवाल । निवृत्तीचे वय ६५ करण्यावरुन तीव्र संताप

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सेवा नियमात कोणतीही सुधारणा न करता, वित्त, विधी, सामान्य प्रशासन या विभागांचा तीव्र विरोध असतानाही केवळ काही विशिष्ट अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी रिक्त पदांचे कारण पुढे करत विभागातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विरोध डावलून नियमबाह्य पद्धतीने सेवा निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० वर्षे केले गेले व आता ते ६५ पर्यंत केले जात आहे, असे झाले तर आम्हाला काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असे सांगत सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाºयांनी संताप व्यक्त केला आहे.

तब्बल ४० डॉक्टरांनी आपल्या नावानिशी, सह्या करुन याबाबचे निवेदन आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. वरिष्ठ वैद्यकीय संवर्गातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असताना १५ ते २० वर्षांपासून कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांच्या पदोन्नतीसाठी कोणतीही कार्यवाही जाणीवपूर्वक न केल्यामुळे कनिष्ठ वैद्यकीय अधिकाºयांच्या पदोन्नतीच्या संधी ३१ मे २०१५ व २९ आॅगस्ट २०१८ या दोन निर्णयामुळे धुळीस मिळाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या निर्णयाचा लाभ ज्यांना झाला ते सगळे अधिकारी राज्यस्तर, मंडळस्तर व जिल्हास्तरावर प्रशासकीय पदांवर आहेत. त्यांच्या वाढीव मुदतीचा प्रत्यक्ष रुग्ण हितासाठी कोणताही उपयोग झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय घेतला गेला, या म्हणण्यालाच हरताळ फासला गेल्याचे विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवू नका, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना, जिल्हा शल्यचिकित्सक संघटना आणि वर्ग १ संघटना अशा तीन संघटनांनी करुनही काही ठराविक अधिकाºयांच्या सोयीसाठी हे केले जात आहे. वैद्यकीय अधिकाºयांपेक्षा काही मोजक्या वरिष्ठ अधिकाºयांना याचा फायदा झाला, असेही या डॉक्टरांनी निदर्शनास आणले आहे.याचिका प्रलंबित, तरीही निर्णय घेण्याची घाईमुदतवाढीच्या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका प्रलंबित आहे. तरीही न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाता सेवा निवृत्तीचे वय ६० वरुन ६५ करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे पुरावेही डॉक्टरांनी दाखवले. यावर त्वरीत भूमिका स्पष्ट न केल्यास नाईलाजाने या सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल, प्रसंगी न्यायालयातही जाऊ, असेही या ४० डॉक्टरांनी म्हटले आहे.