शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

‘झेडपी’च्या चाव्या चोरांच्या हातात नकोत

By admin | Updated: February 17, 2017 01:22 IST

मुख्यमंत्र्यांचा घणाघात : कोल्हापुरात परिवर्तन अटळ; बंटी-मुश्रीफ यांची बँक दिवाळखोरीत

हातकणंगले : विकासाचा पैसा योग्य मार्गाने खर्च व्हायचा असेल, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या चोरांच्या हातात देऊ नका, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोरोची (ता. हातकणंगले) येथील जाहीर सभेत केली. कोल्हापूर जिल्ह्यात आता परिवर्तन अटळ आहे. कोणत्याही स्थितीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची बँक दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे त्यामध्ये पुन्हा तुमच्या मताचे डिपॉझिट ठेवू नका नाहीतर मुद्दलही परत मिळणार नाही, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडी व युवक क्रांती आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची ही सभा झाली. त्यास रणरणत्या उन्हातही लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शाहू गु्रपचे समरजित घाटगे, बाबा देसाई, रजनीताई मगदूम, आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यांतील मातब्बर नेत्यांची मांदियाळी आता भाजपमध्ये असल्याने २४ तारखेला भाजपचा जिल्हा परिषदेतील नवीन अध्यक्ष घेऊनच आम्ही तुम्हाला भेटायला येतो, अशी ग्वाही आमदार हाळवणकर यांनी दिली. यावेळी भाजपच्या जाहीरनाम्याचे व प्रचारफितीचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्र्यांनी या सभेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा तर केलाच. त्याशिवाय त्याच्या हितासाठी कोणत्या योजना राबविल्या, ‘जलयुक्त शिवार’मधून झालेली सिंचनाची कामे, उसाची एफआरपी, थेट बाजार, गट शेतीची योजना आणि शेतीला लागेल तेवढा वीजपुरवठा यावरच जास्त भर दिला. ही सभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रभाव क्षेत्रात होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सरकारच अग्रक्रमाने शेतकरी हिताचा कारभार करत असल्याचे ठासून सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘गेल्या सव्वा दोन वर्षांत सगळे बदलून टाकले असा आमचा दावा नाही; परंतु हे सरकार समाजातील प्रत्येक घटकांसाठी काही करत आहे, असा विश्वास सामान्य माणसांच्या मनात निर्माण करू शकलो हे मोठे यश आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर राज्यात ६८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. दिल्लीत १२ हजार तर शेजारच्या कर्नाटकात अवघी ४ हजार कोटींची गुंतवणूक झाली म्हणजे भारतातील सगळ्या राज्यांत जेवढी झाली त्याहून जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. सरकारच्या पारदर्शक कारभाराचा हा परिणाम आहे. शहरे असोत की ग्रामीण भाग, सरकार आता त्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. हा निधी खर्च करण्याचे जिल्हा परिषद हे माध्यम आहे. तिथे चांगला कारभार करणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या. विरोधकांना निवडून देऊन झेडपीच्या चाव्या चोरांच्या हातात जाऊ देऊ नका.’‘स्वाभिमानी’ बेदखल...स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व भाजपच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या सभेत संघटनेबद्दल मुख्यमंत्री किंवा अन्य कोण काही बोलते का, याबद्दल उत्सुकता होती; परंतु मुख्यमंत्र्यांसह कुणीच संघटनेबद्दल अवाक्षरही बोलले नाही. भाषण नव्हे जीआर वाचनमुख्यमंत्री दुपारी साडेतीन वाजता बोलायला उभे राहिले. त्यांनी अर्ध्या तासात दोनवेळा पाणी पिऊन खणखणीत आवाजात भाषण केले; परंतु त्यातील २० ते २२ मिनिटे त्यांनी जीआरचेच वाचन केल्यासारखे भाषण केले.‘एफआरपी’ आमच्यामुळेच..उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त ५० टक्केच एफआरपी मिळाली आहे; परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ९८ टक्के एफआरपी मिळवून देण्यात राज्य सरकार यशस्वी झाले आहे व एवढी एफआरपी देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सदाभाऊंची दांडी..सांगलीतील सभेला कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत गळ््यात भाजपचे उपरणे घालून व्यासपीठावर उपस्थित होते; परंतु या सभेला मात्र सदाभाऊ आले नाहीत. त्यामुळे उपस्थितीत लोकांतही त्याची चर्चा झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते; परंतु वेळेअभावी ते सभेत बोलले नाहीत. पालकमंत्री असल्याने त्यांनी किमान पाच मिनिटे तरी बोलायला हवे होते, अशीही चर्चा यावेळी झाली.कोरोची (ता. हातकणंगले) येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनाम्याचे व प्रचार गीताचे अनावरण करण्यात आले. यावेळी हिंदुराव शेळके, आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे, धैर्यशील माने, माजी आमदार राजीव आवळे आदी.