शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

‘झेडपी’च्या चाव्या चोरांच्या हातात नकोत

By admin | Updated: February 17, 2017 01:22 IST

मुख्यमंत्र्यांचा घणाघात : कोल्हापुरात परिवर्तन अटळ; बंटी-मुश्रीफ यांची बँक दिवाळखोरीत

हातकणंगले : विकासाचा पैसा योग्य मार्गाने खर्च व्हायचा असेल, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या चोरांच्या हातात देऊ नका, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोरोची (ता. हातकणंगले) येथील जाहीर सभेत केली. कोल्हापूर जिल्ह्यात आता परिवर्तन अटळ आहे. कोणत्याही स्थितीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची बँक दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे त्यामध्ये पुन्हा तुमच्या मताचे डिपॉझिट ठेवू नका नाहीतर मुद्दलही परत मिळणार नाही, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडी व युवक क्रांती आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची ही सभा झाली. त्यास रणरणत्या उन्हातही लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शाहू गु्रपचे समरजित घाटगे, बाबा देसाई, रजनीताई मगदूम, आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यांतील मातब्बर नेत्यांची मांदियाळी आता भाजपमध्ये असल्याने २४ तारखेला भाजपचा जिल्हा परिषदेतील नवीन अध्यक्ष घेऊनच आम्ही तुम्हाला भेटायला येतो, अशी ग्वाही आमदार हाळवणकर यांनी दिली. यावेळी भाजपच्या जाहीरनाम्याचे व प्रचारफितीचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्र्यांनी या सभेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा तर केलाच. त्याशिवाय त्याच्या हितासाठी कोणत्या योजना राबविल्या, ‘जलयुक्त शिवार’मधून झालेली सिंचनाची कामे, उसाची एफआरपी, थेट बाजार, गट शेतीची योजना आणि शेतीला लागेल तेवढा वीजपुरवठा यावरच जास्त भर दिला. ही सभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रभाव क्षेत्रात होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सरकारच अग्रक्रमाने शेतकरी हिताचा कारभार करत असल्याचे ठासून सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘गेल्या सव्वा दोन वर्षांत सगळे बदलून टाकले असा आमचा दावा नाही; परंतु हे सरकार समाजातील प्रत्येक घटकांसाठी काही करत आहे, असा विश्वास सामान्य माणसांच्या मनात निर्माण करू शकलो हे मोठे यश आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर राज्यात ६८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. दिल्लीत १२ हजार तर शेजारच्या कर्नाटकात अवघी ४ हजार कोटींची गुंतवणूक झाली म्हणजे भारतातील सगळ्या राज्यांत जेवढी झाली त्याहून जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. सरकारच्या पारदर्शक कारभाराचा हा परिणाम आहे. शहरे असोत की ग्रामीण भाग, सरकार आता त्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. हा निधी खर्च करण्याचे जिल्हा परिषद हे माध्यम आहे. तिथे चांगला कारभार करणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या. विरोधकांना निवडून देऊन झेडपीच्या चाव्या चोरांच्या हातात जाऊ देऊ नका.’‘स्वाभिमानी’ बेदखल...स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व भाजपच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या सभेत संघटनेबद्दल मुख्यमंत्री किंवा अन्य कोण काही बोलते का, याबद्दल उत्सुकता होती; परंतु मुख्यमंत्र्यांसह कुणीच संघटनेबद्दल अवाक्षरही बोलले नाही. भाषण नव्हे जीआर वाचनमुख्यमंत्री दुपारी साडेतीन वाजता बोलायला उभे राहिले. त्यांनी अर्ध्या तासात दोनवेळा पाणी पिऊन खणखणीत आवाजात भाषण केले; परंतु त्यातील २० ते २२ मिनिटे त्यांनी जीआरचेच वाचन केल्यासारखे भाषण केले.‘एफआरपी’ आमच्यामुळेच..उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त ५० टक्केच एफआरपी मिळाली आहे; परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ९८ टक्के एफआरपी मिळवून देण्यात राज्य सरकार यशस्वी झाले आहे व एवढी एफआरपी देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सदाभाऊंची दांडी..सांगलीतील सभेला कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत गळ््यात भाजपचे उपरणे घालून व्यासपीठावर उपस्थित होते; परंतु या सभेला मात्र सदाभाऊ आले नाहीत. त्यामुळे उपस्थितीत लोकांतही त्याची चर्चा झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते; परंतु वेळेअभावी ते सभेत बोलले नाहीत. पालकमंत्री असल्याने त्यांनी किमान पाच मिनिटे तरी बोलायला हवे होते, अशीही चर्चा यावेळी झाली.कोरोची (ता. हातकणंगले) येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनाम्याचे व प्रचार गीताचे अनावरण करण्यात आले. यावेळी हिंदुराव शेळके, आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे, धैर्यशील माने, माजी आमदार राजीव आवळे आदी.