शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
3
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
4
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
5
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
6
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
7
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
8
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
9
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
10
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
11
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
12
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
13
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
14
वॉशिंग्टनमधील मराठी कला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५०० भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप 
15
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
16
"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव
17
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
18
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
19
Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक
20
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा

राज्य नको, पाणी द्या!

By admin | Updated: March 22, 2016 04:10 IST

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र मराठवाड्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ घालत, सर्वपक्षीय आमदारांनी (भाजपा वगळता) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारी बंद पाडले.

नंदकिशोर पाटील राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र मराठवाड्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ घालत, सर्वपक्षीय आमदारांनी (भाजपा वगळता) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारी बंद पाडले. शिवसेनेची भूमिका आपण समजू शकतो, पण मराठवाड्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेच्या सुरात सूर मिसळून, या निमित्ताने चालून आलेली चर्चेची संधी का वाया घालविली, हे समजले नाही. मराठवाड्याच्या मागासलेपणाचा ल.सा.वि. काढण्यापूर्वी श्रीहरी अणे नेमकं काय म्हणाले, हे आधी समजून घेतलं पाहिजे. जालना येथे अणे यांनी केलेल्या भाषणाचा सारांश असा- ‘विदर्भ आणि मराठवाड्याचे दु:ख सारखेच आहे. किंबहुना, विदर्भाहून अधिक अन्याय मराठवाड्यावर झालेला आहे. मराठवाड्यातील जनतेने केंद्र सरकारवर दबाव आणून स्वतंत्र राज्याची मागणी केली पाहिजे.’विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातून अजून तरी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी जोरकसपणे पुढे आलेली नाही. त्यामुळे अणे यांनी ‘स्वतंत्र’ मराठवाड्यासाठी केलेली बिनपैशाची वकिली अनाठायी आहे, याबद्दल कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही, पण विकासाच्या बाबतीत आजवर मराठवाड्यावर अन्याय झाला आहे, हे अमान्य करून कसे चालेल? केळकर समितीने काढलेला अनुशेष आजही कायम आहे. सिंचनाच्या बाबतीत सर्वाधिक ६१ टक्के अनुशेष मराठवाड्यात आहे. राज्य सरकारने नुकताच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी सिंचनाबाबत करार केला. वास्तविक, हा करार करण्यास खूप विलंब झाला. कारण मराठवाड्यातील गोदावरीचे पाणी आजवर आंध्र प्रदेशने मनसोक्तपणे वापरले. कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी देण्यास प. महाराष्ट्रातील नेत्यांनी किती खळखळ केली, हे लपून राहिलेले नाही. अजूनही ते पाणी पोहोचलेले नाही. समन्यायी पाणीवाटपासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५ साली संमत झाला, पण तरीही जायकवाडीचे हक्काचे पाणी नगर-नाशिकच्या लोकांनी अडवून ठेवले. या कायद्यानुसार कोणत्याही धरणात ३१ आॅक्टोबर २००५ रोजी पाण्याचा किमान ३३ टक्के साठा असणे आवश्यक ठरवण्यात आले. ज्या धरणांत त्यापेक्षा कमी साठा असेल, तेथे अन्य धरणांमधून पाणी द्यावे, असा या कायद्याचा सोपा अर्थ. याच कायद्याचा आधार घेत, जायकवाडी धरणात नाशिक आणि नगरमधील धरणांतून १२.८४ टीएमसी एवढे पाणी सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मात्र, तरीही याचिकांवर याचिका दाखल करत, जायकवाडीच्या पाण्यास अटकाव करण्यात आला.लातूर, बीड,उस्मानाबाद आज तहानले आहेत. पाण्यासाठी १४४ कलम लावण्याची पाळी लातूरच्या प्रशासनावर आली. सह्याद्रीचा कडा आणि बालाघाट या दोन गिरीटोकाच्या मध्यात हा भूप्रदेश येत असल्याने तो कायम अवर्षणाच्या छायेत असणार आहे. कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. अणे यांनी उपस्थित केलेली मागासलेपणाची चर्चा पुढे नेण्याची गरज असताना, सभागृहाचे कामकाज बंद पाडून लोकप्रतिनिधींनी काय मिळविले?सध्या मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि हाताला काम नसल्यामुळे हजारो कुटुंबांनी गाव सोडलं आहे. लग्नं लांबणीवर पडली आहेत. असं असताना दिलासा देण्याची भूमिका घ्यायची सोडून स्वतंत्र राज्याची मागणी करून अणे यांनी सर्वांचे लक्ष विचलीत तर केले नाही ना, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. दुष्काळग्रस्तांसाठी तुम्ही काय उपाय योजत आहात,अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात केली होती. त्यावर सरकार पक्षाची बाजू मांडताना सरकारी अभियोक्त्यांनी अन्नसुरक्षा योजना आणि टँकरची आकडेवारी सादर केली! हा सरकारी कोरडेपणा आजचा नाही. वास्तविक, आज संवेदनशीलता दाखवून सरकारने या भागात ठाण मांडायला हवे. लातूरला रेल्वेने पाणी आणणार होते, काय झाले? तहानलेल्या मराठवाड्याकडे असेच दुर्लक्ष होत राहिले, तर उद्या कदाचित या भागातील लोकही ‘वेगळं व्हायचंय’ म्हणत रस्त्यावर उतरतील!