शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

भाषेचा वापर राजकारणासाठी करू नका- अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:35 IST

साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती करून राजकारणापेक्षा साहित्यकारणाचा विचार करणारे वातावरण निर्माण केले पाहिजे, असा मौलिक सल्ला नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी दिला.

पुणे : सर्वांचा सांस्कृतिक भूगोल सारखाच आहे. बेळगाव आपलेच आहे. ते आपले नव्हते, असे कधीच झालेले नाही. राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीचा संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. भौगोलिकदृष्ट्या सोयीसाठी राज्यांची रचना झाली. मात्र, आपण सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेलेले असू, तर माणसांनी सीमारेषा पुसून टाकायला हवी.आजकाल प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जाते. राजकारणाशिवाय विचार करणे फार कमी लोकांना जमते. भाषा ही राजकारणासाठी वापरू नका. साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती करून राजकारणापेक्षा साहित्यकारणाचा विचार करणारे वातावरण निर्माण केले पाहिजे, असा मौलिक सल्ला नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी दिला.यवतमाळ येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची सन्मानाने निवड केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अध्यक्षपदाची निवड माझ्यासाठी केवळ वर्षभरापुरता उपचार नाही. वाड्मयीन परंपरेतील सर्व गढूळपणा निघून जाऊन ती निखळपणे पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. घरातून मिळालेले साहित्याचे संस्कार घेऊन आयुष्यभर ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे, अशा शब्दांत ढेरे यांनी भावना व्यक्त केल्या. मराठी भाषा मुळातच अभिजात आहे. त्याबाबतचे अनेक प्राचीन पुरावे केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यावर केवळ केंद्राची मोहोर बाकी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.शिवस्मारकाबाबत भूमिका काय, असे विचारले असता, डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘पुतळे, स्मारके यांच्या पलीकडे जाऊन शिवाजीमहाराज समजून घेण्याची गरज आहे. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आज्ञापत्रांचे उत्तम संपादन केले. ज्यांचे आपण नुसते नाव घेतो, त्यांच्या कार्याची व्याप्ती, महाराष्ट्र आणि देशासाठी योगदान, कार्यकर्तृत्व इतिहासातून समजून घेणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. शिवरायांचे स्मारक करा अथवा करु नका, जमिनीवर करा किंवा समुद्रात करा; शिवरायांचे स्मारक व्हायचेच असेल, तर ते सामान्य माणसाच्या मनात व्हावे.ढेरे म्हणाल्या, ‘‘संमेलनाध्यक्षपदाची पुण्याई खूप मोठी आहे. ज्ञानवंत, विचारवंतांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवली आहे. अद्यापही मी स्वत:ला या पदासाठी योग्य समजत नाही. साहित्याची सेवा एका वर्षात होण्यासारखी नाही. ज्या ज्ञानपरंपरेमध्ये माझे वडील लिहीत होते, त्यामध्ये वाङ्मयबाह्य गोष्टींचा कधीच विचार झाला नाही. त्यांनी केवळ साहित्य, संस्कृतीची सेवा केली.४सध्याचा जमाना मल्टिस्क्रीनचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिव्यक्तीचे माध्यम मिळाले आहे. नव्या माध्यमातून अनेक माणसे लिहू लागली. या माध्यमात दीर्घकालीन, टिकाऊ साहित्य निर्माण होऊ शकणार नाही. मात्र, तिथे माणसांना संवाद साधावासा वाटतो, अभिव्यक्तीच्या कल्पना मांडता येतात. त्यातूनच आपण लिहावे, अशी प्रेरणा मिळते. त्यामुळे समाजमाध्यमांवर पूर्णपणे फुली मारता येणार नाही. मात्र, गंभीर आणि टिकाऊ वाङ्मयाकडे जाण्यासाठी ही वाट मिळते आहे आणि ती स्वागतार्ह आहे.’’स्त्री-पुरूषापेक्षा साहित्याचा उत्तम व सर्वश्रेष्ठ दर्जा हा संमेलनाध्यक्ष निवडीचा निकष असावा. मुळात संमेलनाध्यक्षाचा विचार करताना स्त्री-पुरुष असा मतभेद करू नये. कारण स्त्री-पुरुषांपेक्षाही संमेलनाध्यक्ष पद मोठे आहे. येत्या काळातही महिला लेखिका त्यांच्या लेखणीच्या बळावर संमेलनाध्यक्ष होत राहतील. नव्या बदलाने संमेलनाची वाट प्रशस्त होत जाईल. त्यातून समाजाची वाङ्मयीन दृष्टी विस्तारत राहील.४आज अण्णा असते, तर त्यांनी संमेलनाध्यक्ष पद स्वीकारायचे का नाकारायचे, याचे स्वातंत्र्यही मला बहाल केले असते. कारण नेहमी चांगले काम करण्याला त्यांचे प्राधान्य होते. संमेलनाध्यक्ष पदापेक्षा मी एखादा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला, तर त्याचा त्यांना खूप आनंद वाटला असता. कारण लौकिक गोष्टीचे स्थान काय असते, हे मला केवळ अण्णांमुळेच कळत गेले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेPoliticsराजकारण