शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

भाषेचा वापर राजकारणासाठी करू नका- अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:35 IST

साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती करून राजकारणापेक्षा साहित्यकारणाचा विचार करणारे वातावरण निर्माण केले पाहिजे, असा मौलिक सल्ला नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी दिला.

पुणे : सर्वांचा सांस्कृतिक भूगोल सारखाच आहे. बेळगाव आपलेच आहे. ते आपले नव्हते, असे कधीच झालेले नाही. राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीचा संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. भौगोलिकदृष्ट्या सोयीसाठी राज्यांची रचना झाली. मात्र, आपण सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेलेले असू, तर माणसांनी सीमारेषा पुसून टाकायला हवी.आजकाल प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जाते. राजकारणाशिवाय विचार करणे फार कमी लोकांना जमते. भाषा ही राजकारणासाठी वापरू नका. साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती करून राजकारणापेक्षा साहित्यकारणाचा विचार करणारे वातावरण निर्माण केले पाहिजे, असा मौलिक सल्ला नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी दिला.यवतमाळ येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची सन्मानाने निवड केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अध्यक्षपदाची निवड माझ्यासाठी केवळ वर्षभरापुरता उपचार नाही. वाड्मयीन परंपरेतील सर्व गढूळपणा निघून जाऊन ती निखळपणे पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. घरातून मिळालेले साहित्याचे संस्कार घेऊन आयुष्यभर ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे, अशा शब्दांत ढेरे यांनी भावना व्यक्त केल्या. मराठी भाषा मुळातच अभिजात आहे. त्याबाबतचे अनेक प्राचीन पुरावे केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यावर केवळ केंद्राची मोहोर बाकी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.शिवस्मारकाबाबत भूमिका काय, असे विचारले असता, डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘पुतळे, स्मारके यांच्या पलीकडे जाऊन शिवाजीमहाराज समजून घेण्याची गरज आहे. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आज्ञापत्रांचे उत्तम संपादन केले. ज्यांचे आपण नुसते नाव घेतो, त्यांच्या कार्याची व्याप्ती, महाराष्ट्र आणि देशासाठी योगदान, कार्यकर्तृत्व इतिहासातून समजून घेणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. शिवरायांचे स्मारक करा अथवा करु नका, जमिनीवर करा किंवा समुद्रात करा; शिवरायांचे स्मारक व्हायचेच असेल, तर ते सामान्य माणसाच्या मनात व्हावे.ढेरे म्हणाल्या, ‘‘संमेलनाध्यक्षपदाची पुण्याई खूप मोठी आहे. ज्ञानवंत, विचारवंतांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवली आहे. अद्यापही मी स्वत:ला या पदासाठी योग्य समजत नाही. साहित्याची सेवा एका वर्षात होण्यासारखी नाही. ज्या ज्ञानपरंपरेमध्ये माझे वडील लिहीत होते, त्यामध्ये वाङ्मयबाह्य गोष्टींचा कधीच विचार झाला नाही. त्यांनी केवळ साहित्य, संस्कृतीची सेवा केली.४सध्याचा जमाना मल्टिस्क्रीनचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिव्यक्तीचे माध्यम मिळाले आहे. नव्या माध्यमातून अनेक माणसे लिहू लागली. या माध्यमात दीर्घकालीन, टिकाऊ साहित्य निर्माण होऊ शकणार नाही. मात्र, तिथे माणसांना संवाद साधावासा वाटतो, अभिव्यक्तीच्या कल्पना मांडता येतात. त्यातूनच आपण लिहावे, अशी प्रेरणा मिळते. त्यामुळे समाजमाध्यमांवर पूर्णपणे फुली मारता येणार नाही. मात्र, गंभीर आणि टिकाऊ वाङ्मयाकडे जाण्यासाठी ही वाट मिळते आहे आणि ती स्वागतार्ह आहे.’’स्त्री-पुरूषापेक्षा साहित्याचा उत्तम व सर्वश्रेष्ठ दर्जा हा संमेलनाध्यक्ष निवडीचा निकष असावा. मुळात संमेलनाध्यक्षाचा विचार करताना स्त्री-पुरुष असा मतभेद करू नये. कारण स्त्री-पुरुषांपेक्षाही संमेलनाध्यक्ष पद मोठे आहे. येत्या काळातही महिला लेखिका त्यांच्या लेखणीच्या बळावर संमेलनाध्यक्ष होत राहतील. नव्या बदलाने संमेलनाची वाट प्रशस्त होत जाईल. त्यातून समाजाची वाङ्मयीन दृष्टी विस्तारत राहील.४आज अण्णा असते, तर त्यांनी संमेलनाध्यक्ष पद स्वीकारायचे का नाकारायचे, याचे स्वातंत्र्यही मला बहाल केले असते. कारण नेहमी चांगले काम करण्याला त्यांचे प्राधान्य होते. संमेलनाध्यक्ष पदापेक्षा मी एखादा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला, तर त्याचा त्यांना खूप आनंद वाटला असता. कारण लौकिक गोष्टीचे स्थान काय असते, हे मला केवळ अण्णांमुळेच कळत गेले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेPoliticsराजकारण