शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सांस्कृतिक क्षेत्रातील दडपशाही सहन करणार नाही - जयंत सावरकर

By admin | Updated: January 25, 2017 17:23 IST

राम गणेश गडकरी पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर सांस्कृतिक क्षेत्रात येऊ पाहणारी दडपशाही कलाकार व प्रेक्षक सहन करणार नाहीत असा रोखठोक जबाब

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 25 - राम गणेश गडकरी पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर सांस्कृतिक क्षेत्रात येऊ पाहणारी दडपशाही कलाकार व प्रेक्षक सहन करणार नाहीत असा रोखठोक जबाब उस्मानाबाद येथील नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी कल्याणमध्ये दिला.

सीकेपी संस्था कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातर्फे भाषाप्रभु राम गणेश गडकरी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीसोहळा कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयंत सावरकर यांनी सांस्कृतिक चळवळीत येऊ पाहणाऱ्या दहशतवादा बद्दल आपले मन मोकळे केले. समारोहास कायस्थ प्रबोधनच्या संपादिका नीता प्रधान, उद्योजक समीर गुप्ते, संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे, शिवसेनेचे महापालिका क्षेत्रसंघटक दिपक सोनाळकर, परिवहन सदस्य राजू दिक्षीत तसेच सावित्री महिला मंडळाच्या अध्यक्षा मृणाल दुर्वे, शास्त्रज्ञ अजित महाडकर, प्रशांत मुल्हेरकर, अशोक कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर आदी उपस्थित होते.

आज गडकऱ्यांचा पुतळा फोडला उद्या ही मंडळी कोणती नाटके बघा आणि बघू नका हे सुध्दा सांगतील. त्यांना वेळीच प्रतिबंध केला पाहिजे. राम गणेश गडकरी यांच्या साहित्यावर अनेक कलाकारांचे संसार उभे राहिले. आपले आजचे वय 82 वर्षे आहे. आपण अनेक नाटकांमध्ये कामे केली. परंतु सर्वात जास्त कामे राम गणेश गडकरी यांच्या नाटकांमध्ये केली व त्या नाटकांमुळेच आपल्यासारख्यांचा संसार उभे राहिल्याचे जयंत सावरकर यांनी सांगितले.
राम गणेश गडकरी यांची भाषाशैली अमोघ होती. ज्याला `श' आणि `ष' याच्यातील शब्दोच्चार उच्चारता येत नाहीत ती व्यक्ती गडकऱ्यांच्या नाटकात काम करुच शकत नाहीत. स्पष्ट उच्चार आणि समाजाला काहीतरी नवे देणे, समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हे गडकऱ्यांच्या लेखनाचे वैशिष्ट होते. ज्या राजसंन्यास नाटकावरुन एवढा गहजब केला जातो. त्या राजसंन्यासचे आतापर्यंत फक्त तीन प्रयोग झाले त्यातील दोन प्रयोगात आपण काम केले आहे. राजसंन्यास नाटक खरोखरंच गडकऱ्यांनी लिहिले आहे का, याची तरी खातरजमा करायला हवी होती. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात राजसंन्यासचा काही भाग गडकऱ्यांनी आपल्या लेखनिकाकरवी लिहून घेतला व उर्वरित नाटक गडकऱ्यांच्या पश्चात पूर्ण झाले, ही वस्तुस्थिती असल्याचेही जयंत सावरकर यांनी सांगितले.
 
जयंत सावरकरांचा गौरव...
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातर्फे संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे व अन्य पदाधिकाऱ्यांनी जयंत सावरकर यांचा शानदार सत्कार करुन गौरव केला. तसेच कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल  जयंत सावरकर यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.