शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

मरणानंतर तेरवी करू नका; जलसंधारणावर पैसे खर्च करा!

By admin | Updated: February 22, 2017 21:58 IST

त्यूनंतर पार पाडल्या जाणाऱ्या परंपरागत विधींमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या तेरवीच्या कार्यक्रमावर कुठलाही खर्च न करता तो पैसा जलसंधारणाच्या कामावर खर्च करा

प्रफुल्ल बानगावकर

कारंजा ( वाशिम ), दि. 22 - मृत्यूनंतर पार पाडल्या जाणाऱ्या परंपरागत विधींमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या तेरवीच्या कार्यक्रमावर कुठलाही खर्च न करता तो पैसा जलसंधारणाच्या कामावर खर्च करा, असा सल्ला जानोरी येथील अन्नपूर्णा स्वयंसहायता बचतगटातील जिगरबाज महिला सदस्यांनी दिला आहे.

चित्रपट अभिनेता अमिर खान याने सुरू केलेल्या पाणी फाऊंडेशन या उपक्रमात सहभागी होउन अनेकांना पाण्याचे महत्व कळायला लागले आहे. फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेली सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २ ही महाराष्टातील ३० तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यात वाशिम जिल्हयातील कारंजा तालुक्याची या स्पर्धेकरिता निवड झाली असून या स्पर्धेत १०० टक्के गावचा सहभाग आहे. त्यात ३ पुरूष व २ महीलांची ग्रामसभेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. या गावातील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेउन आल्यानंतर ग्राम वाठोडा येथे केलेल्या मार्गदर्शनाने प्रेरीत होउन अन्नपूर्णा महिला बचत गटाच्या सदस्यांनी आपल्या मुलांना आवाहन केले की, मरणानंतर आमची तेरवी करण्यापेक्षा गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तेरवीत होणाऱ्या पैश्याच्या खर्चातून गावात जलसंधारणाची कामे करा, जणेकरून तुमच्या मुलाबाळांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार नाही. दुष्काळाची झळ सोसताना आम्हाला झालेले दु:ख शब्दात मांडण्यासारखे नसून आज सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याचे कळले आहे.

जीवनात कशाची गरज आहे, याची जाणीव ठेवत मुलांनो समृद्ध जीवन जगण्यासाठी पाणीच महत्वाचे आहे. पाणी हेच जीवन आहे, तेव्हा पाणी अडवा-पाणी जिरवा हे आम्हास कळले आहे. येणाऱ्या पिढीला पण दुष्काळाचे चटके सहन करण्याची वेळ येउ नये, याकरीता पाण्याला जपा. कारण पाणी राहील तरच हरीतक्रांती राहील. पाण्यामुळै समृध्द जीवन जगण्यासाठी मदत होईल. वेळप्रसंगी आमची तेरवी करू नका, तेरवीकरीता येणारा खर्च आमच्या जीवंतपणीच जलसंधारणाच्या कामांवर खर्च करा, असे भावनिक आवाहन अन्नपूर्णा बचतगटाच्या अध्यक्ष नंदा पुरूषोत्तम भिंगारे, सचिव अन्नपूर्णा रमेश भिंगारे, संगिता संतोष भिंगारे, रेखा प्रल्हाद भिंगारे, संगिता साहेबराव भिंगारे, इंदुताई गणेश भिंगारे, गंगाबाई तुळशिराम भिंगारे या महिलांनी केले आहे. असा संकल्प करणाऱ्या महिलांची संख्या आता वाढत आहे. त्यामुळे गावात वॉटर कपसाठी महीलांचे मतपरीवर्तन होत असून महीलांनी केलेल्या या निर्धारामुळे पाणी फाउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला मुर्तस्वरूप येउन भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई दुर झाल्याशिवाय राहणार नसल्याचे दिसून येत आहे.