शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
2
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
3
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
4
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
5
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
6
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
7
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
8
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
9
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
10
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
12
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
13
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
14
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
15
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
16
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
17
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
18
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
19
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
20
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

मरणानंतर तेरवी करू नका; जलसंधारणावर पैसे खर्च करा!

By admin | Updated: February 22, 2017 21:58 IST

त्यूनंतर पार पाडल्या जाणाऱ्या परंपरागत विधींमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या तेरवीच्या कार्यक्रमावर कुठलाही खर्च न करता तो पैसा जलसंधारणाच्या कामावर खर्च करा

प्रफुल्ल बानगावकर

कारंजा ( वाशिम ), दि. 22 - मृत्यूनंतर पार पाडल्या जाणाऱ्या परंपरागत विधींमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या तेरवीच्या कार्यक्रमावर कुठलाही खर्च न करता तो पैसा जलसंधारणाच्या कामावर खर्च करा, असा सल्ला जानोरी येथील अन्नपूर्णा स्वयंसहायता बचतगटातील जिगरबाज महिला सदस्यांनी दिला आहे.

चित्रपट अभिनेता अमिर खान याने सुरू केलेल्या पाणी फाऊंडेशन या उपक्रमात सहभागी होउन अनेकांना पाण्याचे महत्व कळायला लागले आहे. फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेली सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २ ही महाराष्टातील ३० तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यात वाशिम जिल्हयातील कारंजा तालुक्याची या स्पर्धेकरिता निवड झाली असून या स्पर्धेत १०० टक्के गावचा सहभाग आहे. त्यात ३ पुरूष व २ महीलांची ग्रामसभेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. या गावातील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेउन आल्यानंतर ग्राम वाठोडा येथे केलेल्या मार्गदर्शनाने प्रेरीत होउन अन्नपूर्णा महिला बचत गटाच्या सदस्यांनी आपल्या मुलांना आवाहन केले की, मरणानंतर आमची तेरवी करण्यापेक्षा गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तेरवीत होणाऱ्या पैश्याच्या खर्चातून गावात जलसंधारणाची कामे करा, जणेकरून तुमच्या मुलाबाळांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार नाही. दुष्काळाची झळ सोसताना आम्हाला झालेले दु:ख शब्दात मांडण्यासारखे नसून आज सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याचे कळले आहे.

जीवनात कशाची गरज आहे, याची जाणीव ठेवत मुलांनो समृद्ध जीवन जगण्यासाठी पाणीच महत्वाचे आहे. पाणी हेच जीवन आहे, तेव्हा पाणी अडवा-पाणी जिरवा हे आम्हास कळले आहे. येणाऱ्या पिढीला पण दुष्काळाचे चटके सहन करण्याची वेळ येउ नये, याकरीता पाण्याला जपा. कारण पाणी राहील तरच हरीतक्रांती राहील. पाण्यामुळै समृध्द जीवन जगण्यासाठी मदत होईल. वेळप्रसंगी आमची तेरवी करू नका, तेरवीकरीता येणारा खर्च आमच्या जीवंतपणीच जलसंधारणाच्या कामांवर खर्च करा, असे भावनिक आवाहन अन्नपूर्णा बचतगटाच्या अध्यक्ष नंदा पुरूषोत्तम भिंगारे, सचिव अन्नपूर्णा रमेश भिंगारे, संगिता संतोष भिंगारे, रेखा प्रल्हाद भिंगारे, संगिता साहेबराव भिंगारे, इंदुताई गणेश भिंगारे, गंगाबाई तुळशिराम भिंगारे या महिलांनी केले आहे. असा संकल्प करणाऱ्या महिलांची संख्या आता वाढत आहे. त्यामुळे गावात वॉटर कपसाठी महीलांचे मतपरीवर्तन होत असून महीलांनी केलेल्या या निर्धारामुळे पाणी फाउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला मुर्तस्वरूप येउन भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई दुर झाल्याशिवाय राहणार नसल्याचे दिसून येत आहे.