शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:57 IST

शांततापूर्ण वातावरणात देशाच्या इतिहासात नोंद होईल, असे मोर्चे मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सहनशीलतेने काढले. सरकार जरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी समाजाच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये. असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देकृषिमुल्य आयोगाला वैधानिक दर्जा द्यामराठा आरक्षणासाठी विद्यमान सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहेअन्नप्रक्रिया, उत्पादन क्षेत्राकडे समाजाने वळावे

औरंगाबाद, दि. ५ : शांततापूर्ण वातावरणात देशाच्या इतिहासात नोंद होईल, असे मोर्चे मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सहनशीलतेने काढले. सरकार जरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी समाजाच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये. असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी व्यक्त केले.

श्रीहरी पॅव्हेलियन येथे शिवाई एमबीएन विकास मंडळातर्फे भरविण्यात आलेल्या एबीएन एक्सपो या उद्योग प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, आ. अतुल सावे, आ. सतीष चव्हाण, आ. विक्रम काळे, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, माजी आ. कल्याण काळे, प्रदीप सोळूंके, रंगनाथ काळे, जि.प.अध्यक्ष देवयानी डोणगांवकर, गीता देशमुख, अनुश्री मुळे, वृषाली देशमुख यांची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतीलच असे नाही. शिष्यवृत्ती मिळाली तरी आजच्या शिक्षणाचा खर्च कमी नाही. त्यामुळे तरुण-तरुणींनी उद्योग, व्यापाराकडे वळाले पाहिजे. खा.दानवे यांना उद्देश्यून ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी पुर्ण ताकद लावा. मतभेद असतील तर ते दूर करून मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमिती समोर आणा. कायदेशीर अडचणी आहेत. नवीन आलेले सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. परंतु समाजात खदखद वाढलेली आहे. सहनशीलता संपत आली आहे. खा.दानवे यांनी सरकार उद्योगवृध्दीसाठी करीत असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. 

कृषिमुल्य आयोगाला वैधानिक दर्जा द्याकृषिमुल्य आयोगाला वैधानिक दर्जा दिला जावा. शेतमालाचे भाव कोसळले तरी शेतक-यांना कायद्याने भाव मिळेल. गेल्यावर्षी तुर खरेदीत सरकारचे अंदाज चुकले आहेत. कृषि अर्थव्यवस्था मजूबत झाली पाहिजे. शेतीवर सगळ्या समाजाचे पोट भरते. परंतु शेतीवर अवलंबून राहणे जमणार नाही. नोक-यांचे काही खरे नाही. माहिती-तंत्रज्ञानामुळे अनेक नोक-यांवर गदा येत आहे. नोक-यांना गृहित धरु नका. अन्नप्रक्रिया, उत्पादन क्षेत्राकडे समाजाने वळावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण