शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पुनर्वसन नको, हक्काची घरे वाचवा

By admin | Updated: July 11, 2017 00:28 IST

रिंगरोड प्रकल्पामध्ये घरे जाणाऱ्या बाधितांनी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलने सुरू केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : रिंगरोड प्रकल्पामध्ये घरे जाणाऱ्या बाधितांनी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलने सुरू केली आहेत. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रविवारी चिंचवडेनगर येथील दगडोबा चौकात मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सत्तारूढ पक्ष नेते एकनाथ पवार आंदोलकांशी बोलताना ‘रिंगरोड प्रकल्प रद्द नाही झाला तर ज्यांची घरे जातील त्यांचे आम्ही पुनर्वसन करू’, असे वक्तव्य केल्यामुळे आंदोलक गोंधळ घालत आक्रमक झाले. या वेळी परिस्थिती पाहता उपस्थित लोकप्रतिनिधींना तेथून काढता पाय घ्यावा लागला होता. घर बचाव संघर्ष समितीच्या पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाला मार्गदर्शन करण्याकरिता प्रथमच सत्तारूढ पक्षनेते आणि आमदार उपस्थित राहिले याचा आम्हाला आनंद वाटला़ ते आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून यशस्वी मार्ग काढतील अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु भाजपाच्या नेत्यांनी नकारात्मक भूमिका दर्शविल्यामुळे आंदोलकांच्या भावनेचा उद्रेक झाला. मात्र सत्ताधाऱ्यांच्याच भूमिकेमुळे आज गोंधळ निर्माण झाला. उलट पवार यांनी आम्ही तुमच्या घराच्या विटेलाही धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका घ्याला हवी होती. - विजय पाटील, समन्वयक घर बचाव संघर्ष समितीआमची घरे कोणत्याही परिस्थितीत तोडता कामा नये. नेत्यांनी आमच्या घरांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. अगोदर रिंगरोडचे आरक्षण रद्द करा व आमची घरे वाचवा. आजच्या आंदोलनात पालिकेत सत्तेत असणाऱ्या सताधाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही बाधित नागरिक जाहीर निषेध करीत आहोत. - हंसराज चिघळीकर, रिंगरोड बाधित नागरिक, बिजलीनगरघर म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून आमच्या घरांवर कुऱ्हाड आणून विकास साधायचा असेल तर या विकासाला आमचा विरोध आहे. आमच्या घरांचा प्रश्न नेत्यांनी काढू नये. आम्हाला आहे त्या ठिकाणी आहे तसे राहू द्या. आम्हाला पुनर्वसन नको. आम्ही आमचे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करीत असताना आमच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.- रेखा भोळे, पदाधिकारी घर बचाव संघर्ष समितीलोकांनी विश्वासावर निवडून देऊन सत्ताबदल केला. हेच आज आमचा विश्वासघात करीत आहेत. त्यांचा आम्ही निषेध करीत आहोत. कोणत्याही परिस्थितीत आमची घरे वाचली पाहिजेत. आम्हाला पुनर्वसन नको. जोपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणारच.- अमर मुलगे, बाधित नागरिक, बिजलीनगरसत्ताधाऱ्यांच्या आजच्या वाक्त्व्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हाला त्यांची घरे नकोत़ आम्हाला आमची हक्काची घरे वाचली पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने आमच्या घरावर असणारा प्राधिकरणाचा शिक्का काढून सातबाऱ्यावर आमची नोंद करावी. आमची घरे वाचली पाहिजेत व प्रस्तावित रिंगरोड रद्द झाला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी विरोधक असताना अनधिकृत घरांबाबत दिलेला शब्द पाळावा. - धनाजी येळेकर, बाधित नागरिक, थेरगाव