शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्य कर्जबाजारी असल्याचा प्रचार करू नका, मुनगंटीवार यांनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:52 IST

आपण राज्य कर्जबाजारी आहे असे म्हणतो तेव्हा आधी ऋणभार तपासा. राज्याची क्षमता पाहूनच कर्ज दिले जाते.

नागपूर : आपण राज्य कर्जबाजारी आहे असे म्हणतो तेव्हा आधी ऋणभार तपासा. राज्याची क्षमता पाहूनच कर्ज दिले जाते. आपले राज्य कर्जबाजारी आहे असा प्रचार करू नका. राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज नाही. अशा प्रचारात हित नाही. दिशाभूल करणारी आकडेवारी लोकांमध्ये देऊन राज्याचे अहित करू नका. यावर चिंतन करा, अशा शब्दात वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विरोधकांना सुनावले.नियम २९३ अंतर्गत विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, गेल्या १५ वर्षात राज्यावर २५.०२ टक्क्यांपर्यंत ऋणभार वाढला होता. तो आपण १६ टक्क्यांवर आणला आहे. महाराष्ट्राचे उत्पन्न वाढले. जीएसटीपूर्वीचे उत्पन्न ९०५२५.१९ कोटी होते. जीएसटीनंतर ते १ लाख १५ हजार ९४०.२३ कोटीवर गेले आहे. या तिमाहीत ३९.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही देशातील सर्वाधिक वाढ आहे. महाराष्ट्राचे जीएसटी कौन्सिलमध्ये कौतुक होते.याशिवाय राजकोषीय तूट कमी झाली आहे. व्याज प्रदानाचा दरही कमी झाला आहे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये कल वाढता आहे. राज्य मागे पडलेले नाही. पण ज्यांनी राज्यावर कर्ज वाढवले तेच आमच्यावर विधानसभेत टीका करतात, हे दुर्दैव आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. महाराष्ट्रात बेरोजगारीचा २.१ टक्क्यांवर असलेला दर शून्यावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. काही पक्षातील नेत्यांची बेरोजगारी मात्र वाढली आहे, अशी चुटकीही त्यांनी घेतली. पेट्रोल डिझेल महाराष्ट्रात महाग असल्याचे सांगितले जाते. मात्र, १४ सप्टेंबर २०१३ रोजी पेट्रोलचे दर ८३.६२ रुपये होता. यानंतर मनमोहनसिंग यांनी तेलाच्या किमती ठरविण्याचे अधिकार तेल कंपन्यांना दिले. राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलवर ३ हजार ६९ कोटी रुपये वर्षाची सूट दिली. ३० जून २०१८ च्या आकडेवाडीनुसार डिझेलच्या किमतीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर आहे. विकसित देशांमध्ये पेट्रोलचे दर जास्तच आहेत. इटलीत तर १२८ रुपये दर आहे, असेही त्यांनी सांगितले. मेक इन महाराष्ट्रच्या मंडपाला लागलेली आग दिसते. मात्र, मंत्रालयात आग लागून ५८ हजार फाईल्स जळाल्या हे कसे विसरलात, असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.>तोट्यातील महामंंडळे बंद करणारज्या महामंडळांना कितीही अर्थसाहाय्य केले तरी ती फायद्यात येऊ शकत नाही किंवा ज्यांचे उद्दिष्ट संपले आहे, अशी महामंडळे बंद करण्याबाबत सरकारतर्फे पावले टाकली जात आहेत. सोबत काही महामंडळांमध्ये आणखी गुंतवणूक करून ती फायद्यात येतील का, यावरही विचार केला जाईल, असे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्पष्ट केले. काही लोकांनी महामंडळाचे पैसे लुटले. चेकने पैसे खासगी खात्यात वळते करण्यात आले. अशा प्रकरणांचीही पडताळणी केली जाईल. तोट्यातील महामंडळे फायद्यात आणण्यासाठी काय करता येईल याच्या सूचना द्याव्या, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आवाहनही त्यांनी केले. गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भातील अनेक चौकशीच्या फाईलवर सह्या केल्या. महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. मै नही रहुंगा फिर तुम जेल मे कैसे जाओंगे, याची व्यवस्था करून ठेवली. राज्याला न्याय देणाऱ्या फाईल्स लिहिल्या, असे सांगत आम्ही त्यांच्याच पावलावर चालण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगून मुनगंटीवार यांनी विरोधकांचीच कोंडी केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८