शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

महाराष्ट्राला माथेफिरूच्या मार्गाने जाण्यास भाग पाडू नका - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 4, 2017 11:18 IST

महाराष्ट्राच्या मानेवरचे मडके ज्या दिवशी संतप्त डोके बनेल त्या दिवशीच सरकारबरोबर न्यायालयांचे डोके ठिकाणावर येईल अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - महाराष्ट्रात रिक्षाचालकांना ‘मराठी’ची सक्ती नको असे सांगणा-या न्यायदेवतेने हे फर्मान देशभरासाठी जारी करावे व खासकरून सीमाभागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी अशा मराठी भागातही कळवावे की, तेथेही उगाच नोकरी, रोजगार, शिक्षणात केलेली कानडीची सक्तीदेखील बेकायदेशीर आहे. महाराष्ट्राच्या मानेवरचे मडके ज्या दिवशी संतप्त डोके बनेल त्या दिवशीच सरकारबरोबर न्यायालयांचे डोके ठिकाणावर येईल. आमच्या प्रिय आणि सन्माननीय न्यायदेवतेची सपशेल माफी मागूनच आम्ही हे माथेफिरू विधान करीत आहोत. महाराष्ट्राला माथेफिरूच्या मार्गाने जाण्यास भाग पाडू नका हीच हात जोडून नम्र विनंती! अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे.
 
रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची केलेली सक्ती ही पूर्णपणे बेकायदा आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. महाराष्ट्र सरकारने म्हणजे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशाने रिक्षाचालकाला मराठी भाषा ‘सक्ती’चे सांगणारे परिपत्रक न्यायालयाने रद्द करून ११ कोटी मराठी जनतेला बुचकळय़ात टाकले आहे. न्यायालयाने यासाठी कायद्याचा आणि सरकारी आदेशाचा जो किस पाडला आहे तो सर्व आटापिटा पाहता आपण सगळे महाराष्ट्रातच राहत आहोत ना, असा प्रश्न मराठीजनांना पडला असेल. रिक्षाचालकांना मराठी येणे बंधनकारक आहे हा आदेश जर बेकायदेशीर असेल तर मग कायदेशीर काय याचा खुलासा होणे गरजेचे आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
महाराष्ट्राच्या ‘मराठी’ सरकारला असा आदेश काढण्याचा अधिकारच नसल्याचे सांगून न्यायदेवतेने १०५ मराठी हुतात्म्यांच्या आत्म्यांनाही गोंधळात टाकले आहे. म्हणजे त्या १०५ हुतात्म्यांच्या नातेवाईकांनाही आता प्रश्नच पडला असेल की, हे सर्व १०५ शूरवीर बलिदानाच्या स्तंभावर चढले ते मराठी राज्य, मराठी भाषा आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठीच ना? दिवाकर रावते हे महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री आहेत. केरळ, तामीळनाडू किंवा इतर राज्यांचे नाहीत. त्यांनी इतर प्रांतांत जाऊन मराठीची सक्ती केली नाही अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
भाषिक प्रांतरचनेनुसार घटनेच्या चौकटीत महाराष्ट्र राज्य हे मराठीभाषक राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्रांची भाषा, रोजगार व संस्कृतीचे रक्षण करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे. हे राज्य कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे व कायद्यानेच चालवले जात आहे. आमच्या न्यायालयांना ते पटत नसेल तर या देशातील लोकशाहीवर वरवंटा फिरवून येथे न्यायालयीन एकाधिकारशाहीचे राज्य निर्माण झाल्याचे फर्मान बेशक जाहीर करावे. पण लोकांनी मतपेटीद्वारे निवडून दिलेल्या सरकारचे लोकहितकारी निर्णय फिरवण्याचे अधिकार न्यायदेवतेला खरेच आहेत काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
मुंबई-महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. त्यामुळे येथे कामधंद्यासाठी आलेल्यांना स्थानिक भाषा येणे हे सार्वजनिक हिताचेच आहे. लोकांची गैरसोय टाळता यावी म्हणूनच हा आदेश सरकारने घेतला व तो चुकीचा नाही. रिक्षाचालकांना मराठी येत नसेल तर येथील लोकांनी त्यांच्याशी कोणत्या भाषेत संवाद साधावा याबाबतही मग काय ते मार्गदर्शन व्हावे. हे किंवा अशा प्रकारच्या न्यायव्यवस्थेचे हिटलरी निर्णय म्हणजे राज्याच्या अस्मितेचा अपमान आहे व इतर राज्यांत असे निर्णय आले असते तर एव्हाना जनतेने रस्त्यावर उतरून दंगाच केला असता असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
‘जलिकट्टू’ या तामीळनाडूतील लोकप्रिय अशा बैलांच्या खेळावरील न्यायालयीन बंदीविरोधात तामिळी जनतेने मध्यंतरी अत्यंत तीक्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तामिळी लोकच नव्हे तर तेथील सेलिब्रिटी आणि सरकारदेखील या बंदीविरोधात रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती एवढी चिघळली की शेवटी केंद्र सरकारला अध्यादेश काढावा लागला आणि ‘जलिकट्टू’ला परवानगी द्यावी लागली. मग त्यामुळे तुमचा तो न्यायालयीन अवमान झाला नाही का? दक्षिणेमध्ये तर हिंदीची सक्ती करण्याची हिंमत देशातील कोणत्याही न्यायालयास नाही, पण महाराष्ट्रात ‘मराठी’ नको असे न्यायालयाचे सिंहासनाधिष्ठत सांगतात. अर्थात, एवढे होऊनही सर्व कसे शांत आणि स्वस्थ आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयांच्या मानेवर डोकी आहेत की थंड पाण्याची मडकी, असा प्रश्न पडला आहे. कारण डोकी असती तर ती एव्हाना पेटून उठली असती अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.