शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला माथेफिरूच्या मार्गाने जाण्यास भाग पाडू नका - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 4, 2017 11:18 IST

महाराष्ट्राच्या मानेवरचे मडके ज्या दिवशी संतप्त डोके बनेल त्या दिवशीच सरकारबरोबर न्यायालयांचे डोके ठिकाणावर येईल अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - महाराष्ट्रात रिक्षाचालकांना ‘मराठी’ची सक्ती नको असे सांगणा-या न्यायदेवतेने हे फर्मान देशभरासाठी जारी करावे व खासकरून सीमाभागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी अशा मराठी भागातही कळवावे की, तेथेही उगाच नोकरी, रोजगार, शिक्षणात केलेली कानडीची सक्तीदेखील बेकायदेशीर आहे. महाराष्ट्राच्या मानेवरचे मडके ज्या दिवशी संतप्त डोके बनेल त्या दिवशीच सरकारबरोबर न्यायालयांचे डोके ठिकाणावर येईल. आमच्या प्रिय आणि सन्माननीय न्यायदेवतेची सपशेल माफी मागूनच आम्ही हे माथेफिरू विधान करीत आहोत. महाराष्ट्राला माथेफिरूच्या मार्गाने जाण्यास भाग पाडू नका हीच हात जोडून नम्र विनंती! अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे.
 
रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची केलेली सक्ती ही पूर्णपणे बेकायदा आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. महाराष्ट्र सरकारने म्हणजे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशाने रिक्षाचालकाला मराठी भाषा ‘सक्ती’चे सांगणारे परिपत्रक न्यायालयाने रद्द करून ११ कोटी मराठी जनतेला बुचकळय़ात टाकले आहे. न्यायालयाने यासाठी कायद्याचा आणि सरकारी आदेशाचा जो किस पाडला आहे तो सर्व आटापिटा पाहता आपण सगळे महाराष्ट्रातच राहत आहोत ना, असा प्रश्न मराठीजनांना पडला असेल. रिक्षाचालकांना मराठी येणे बंधनकारक आहे हा आदेश जर बेकायदेशीर असेल तर मग कायदेशीर काय याचा खुलासा होणे गरजेचे आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
महाराष्ट्राच्या ‘मराठी’ सरकारला असा आदेश काढण्याचा अधिकारच नसल्याचे सांगून न्यायदेवतेने १०५ मराठी हुतात्म्यांच्या आत्म्यांनाही गोंधळात टाकले आहे. म्हणजे त्या १०५ हुतात्म्यांच्या नातेवाईकांनाही आता प्रश्नच पडला असेल की, हे सर्व १०५ शूरवीर बलिदानाच्या स्तंभावर चढले ते मराठी राज्य, मराठी भाषा आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठीच ना? दिवाकर रावते हे महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री आहेत. केरळ, तामीळनाडू किंवा इतर राज्यांचे नाहीत. त्यांनी इतर प्रांतांत जाऊन मराठीची सक्ती केली नाही अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
भाषिक प्रांतरचनेनुसार घटनेच्या चौकटीत महाराष्ट्र राज्य हे मराठीभाषक राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्रांची भाषा, रोजगार व संस्कृतीचे रक्षण करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे. हे राज्य कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे व कायद्यानेच चालवले जात आहे. आमच्या न्यायालयांना ते पटत नसेल तर या देशातील लोकशाहीवर वरवंटा फिरवून येथे न्यायालयीन एकाधिकारशाहीचे राज्य निर्माण झाल्याचे फर्मान बेशक जाहीर करावे. पण लोकांनी मतपेटीद्वारे निवडून दिलेल्या सरकारचे लोकहितकारी निर्णय फिरवण्याचे अधिकार न्यायदेवतेला खरेच आहेत काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
मुंबई-महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. त्यामुळे येथे कामधंद्यासाठी आलेल्यांना स्थानिक भाषा येणे हे सार्वजनिक हिताचेच आहे. लोकांची गैरसोय टाळता यावी म्हणूनच हा आदेश सरकारने घेतला व तो चुकीचा नाही. रिक्षाचालकांना मराठी येत नसेल तर येथील लोकांनी त्यांच्याशी कोणत्या भाषेत संवाद साधावा याबाबतही मग काय ते मार्गदर्शन व्हावे. हे किंवा अशा प्रकारच्या न्यायव्यवस्थेचे हिटलरी निर्णय म्हणजे राज्याच्या अस्मितेचा अपमान आहे व इतर राज्यांत असे निर्णय आले असते तर एव्हाना जनतेने रस्त्यावर उतरून दंगाच केला असता असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
‘जलिकट्टू’ या तामीळनाडूतील लोकप्रिय अशा बैलांच्या खेळावरील न्यायालयीन बंदीविरोधात तामिळी जनतेने मध्यंतरी अत्यंत तीक्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तामिळी लोकच नव्हे तर तेथील सेलिब्रिटी आणि सरकारदेखील या बंदीविरोधात रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती एवढी चिघळली की शेवटी केंद्र सरकारला अध्यादेश काढावा लागला आणि ‘जलिकट्टू’ला परवानगी द्यावी लागली. मग त्यामुळे तुमचा तो न्यायालयीन अवमान झाला नाही का? दक्षिणेमध्ये तर हिंदीची सक्ती करण्याची हिंमत देशातील कोणत्याही न्यायालयास नाही, पण महाराष्ट्रात ‘मराठी’ नको असे न्यायालयाचे सिंहासनाधिष्ठत सांगतात. अर्थात, एवढे होऊनही सर्व कसे शांत आणि स्वस्थ आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयांच्या मानेवर डोकी आहेत की थंड पाण्याची मडकी, असा प्रश्न पडला आहे. कारण डोकी असती तर ती एव्हाना पेटून उठली असती अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.