शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘लाइव्ह’ नको; जिवंतपणे जगा!

By admin | Updated: July 16, 2017 00:19 IST

दैनंदिन आयुष्यातील सोशल मीडियाच्या अतिवापराविषयी वेळोवेळी चर्चा होते. गेल्या आठवड्यात नागपूरच्या वेणा तलावात ‘फेसबुक लाइव्ह’ करताना बोट उलटून झालेला

- स्नेहा मोरे दैनंदिन आयुष्यातील सोशल मीडियाच्या अतिवापराविषयी वेळोवेळी चर्चा होते. गेल्या आठवड्यात नागपूरच्या वेणा तलावात ‘फेसबुक लाइव्ह’ करताना बोट उलटून झालेला अपघात हेसुद्धा याचेच एक उदाहरण. आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबतच्या क्षणांना ‘आठवणी’त साठविण्याऐवजी, सोशल मीडियावर ‘शेअर’ करण्यावर दिली जाणारी भर जीवघेणी ठरत असल्याची अनेक उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचे व्यसन वेळीच नियंत्रणात आणले पाहिजे.पूर्वी केवळ टाइमपास म्हणून सोशल मीडिया वापरणारे नेटिझन्स आता मात्र, रात्रंदिवस या आभासी जगात जगताना दिसताहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुकने नव्याने लाइव्ह आॅप्शन उपलब्ध करून दिले. यामुळे तुमच्या समारंभाचे किंवा तुम्ही असलेल्या ठिकाणचे व्हिडीओ चित्रीकरण करून, ते थेट तुमच्या ‘फ्रेंड लिस्ट’मधील मित्रांसोबत लाइव्ह पद्धतीने शेअर करण्याची व्यवस्थाही नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे आता या व्हर्च्युअल जगाला खऱ्याखुऱ्या जगण्याएवढे किंबहुना अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.नागपुरातील वेणा तलावातील दुर्घटनेमुळे एका क्षणात जिवाभावाच्या मित्रांना गमवावे लागले. त्यामुळे त्यांच्यापैकी ज्या मित्रांचा जीव वाचला, त्यांना आता पश्चात्ताप होत आहे. मात्र, वेळ निघून गेल्यावर चुकचुकण्यापेक्षा या अनुभवातून धडा शिकून शहाणपण शिकले पाहिजे. फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरील पोस्टला लाइक, शेअरिंग करताना अथवा त्यावर कमेंट करताना, घटनेचे गांभीर्य बाळगणे आवश्यक असते. त्यावर विचारपूर्वक प्रतिक्रिया देणे अपेक्षित असते. मात्र, अलीकडच्या काळात नेमके याच बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.तंत्रज्ञान हे चांगलेच असते, पण त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला, तर चांगले ठरते आणि त्याचा चुकीचा वापर केला, तर ते घातक ठरते. प्रत्येक चांगल्या गोष्टींसोबत वाईटही येत असते. त्यामुळे सोशल मीडियाचा नीट वापर न करता, कधी-कधी लोकांच्या भावना भडकविण्यासाठीही केला जातो, याची अनेक उदाहरणे आपण नेहमी पाहत असतो. या अप्रत्यक्ष जगात वावरताना, लांबची माणसे जवळ करण्याच्या प्रयत्नात आपण आपली जवळची माणसे लांब करत चाललो आहोत, हेही तितकेच खरे आहे. मात्र, असे असले तरीही, सोशल मीडियाचा खरा अर्थ आहे, विधायक घटनांच्या बाबत शेअरिंग करणे होय. याविषयी मानसोपरचारतज्ज्ञ डॉ. रोहिणी दास यांनी सांगितले की, सातत्याने सोशल मीडियाच्या अनियंत्रित वापराविषयी चर्चा होते. आता मात्र, या प्रकारांमुळे ‘सोशल मीडिया फ्री डे’ सेलिब्रेट करण्याची वेळ आली आहे. नेटिझन्सच्या मानसिकतेला त्यांच्याच जीवनशैलीनुसार उत्तर दिले पाहिजे. म्हणजे सुरुवातीला एक दिवसापासून हे समीकरण सुरू करायचे, त्यात संपूर्ण दिवसभर सोशल साइट्सपासून अलिप्त राहून आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्यासोबत वेळ घालवून तो आठवणींत साठवून ठेवायचा. घरातील लहानग्यांनाही ही सवय आतापासून लावली पाहिजे. जेणेकरून, त्यांचे भविष्य ‘व्हर्च्युअल’ स्क्रीन्सपुरते मर्यादित राहणार नाही.