शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

‘लाइव्ह’ नको; जिवंतपणे जगा!

By admin | Updated: July 16, 2017 00:19 IST

दैनंदिन आयुष्यातील सोशल मीडियाच्या अतिवापराविषयी वेळोवेळी चर्चा होते. गेल्या आठवड्यात नागपूरच्या वेणा तलावात ‘फेसबुक लाइव्ह’ करताना बोट उलटून झालेला

- स्नेहा मोरे दैनंदिन आयुष्यातील सोशल मीडियाच्या अतिवापराविषयी वेळोवेळी चर्चा होते. गेल्या आठवड्यात नागपूरच्या वेणा तलावात ‘फेसबुक लाइव्ह’ करताना बोट उलटून झालेला अपघात हेसुद्धा याचेच एक उदाहरण. आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबतच्या क्षणांना ‘आठवणी’त साठविण्याऐवजी, सोशल मीडियावर ‘शेअर’ करण्यावर दिली जाणारी भर जीवघेणी ठरत असल्याची अनेक उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचे व्यसन वेळीच नियंत्रणात आणले पाहिजे.पूर्वी केवळ टाइमपास म्हणून सोशल मीडिया वापरणारे नेटिझन्स आता मात्र, रात्रंदिवस या आभासी जगात जगताना दिसताहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुकने नव्याने लाइव्ह आॅप्शन उपलब्ध करून दिले. यामुळे तुमच्या समारंभाचे किंवा तुम्ही असलेल्या ठिकाणचे व्हिडीओ चित्रीकरण करून, ते थेट तुमच्या ‘फ्रेंड लिस्ट’मधील मित्रांसोबत लाइव्ह पद्धतीने शेअर करण्याची व्यवस्थाही नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे आता या व्हर्च्युअल जगाला खऱ्याखुऱ्या जगण्याएवढे किंबहुना अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.नागपुरातील वेणा तलावातील दुर्घटनेमुळे एका क्षणात जिवाभावाच्या मित्रांना गमवावे लागले. त्यामुळे त्यांच्यापैकी ज्या मित्रांचा जीव वाचला, त्यांना आता पश्चात्ताप होत आहे. मात्र, वेळ निघून गेल्यावर चुकचुकण्यापेक्षा या अनुभवातून धडा शिकून शहाणपण शिकले पाहिजे. फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरील पोस्टला लाइक, शेअरिंग करताना अथवा त्यावर कमेंट करताना, घटनेचे गांभीर्य बाळगणे आवश्यक असते. त्यावर विचारपूर्वक प्रतिक्रिया देणे अपेक्षित असते. मात्र, अलीकडच्या काळात नेमके याच बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.तंत्रज्ञान हे चांगलेच असते, पण त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला, तर चांगले ठरते आणि त्याचा चुकीचा वापर केला, तर ते घातक ठरते. प्रत्येक चांगल्या गोष्टींसोबत वाईटही येत असते. त्यामुळे सोशल मीडियाचा नीट वापर न करता, कधी-कधी लोकांच्या भावना भडकविण्यासाठीही केला जातो, याची अनेक उदाहरणे आपण नेहमी पाहत असतो. या अप्रत्यक्ष जगात वावरताना, लांबची माणसे जवळ करण्याच्या प्रयत्नात आपण आपली जवळची माणसे लांब करत चाललो आहोत, हेही तितकेच खरे आहे. मात्र, असे असले तरीही, सोशल मीडियाचा खरा अर्थ आहे, विधायक घटनांच्या बाबत शेअरिंग करणे होय. याविषयी मानसोपरचारतज्ज्ञ डॉ. रोहिणी दास यांनी सांगितले की, सातत्याने सोशल मीडियाच्या अनियंत्रित वापराविषयी चर्चा होते. आता मात्र, या प्रकारांमुळे ‘सोशल मीडिया फ्री डे’ सेलिब्रेट करण्याची वेळ आली आहे. नेटिझन्सच्या मानसिकतेला त्यांच्याच जीवनशैलीनुसार उत्तर दिले पाहिजे. म्हणजे सुरुवातीला एक दिवसापासून हे समीकरण सुरू करायचे, त्यात संपूर्ण दिवसभर सोशल साइट्सपासून अलिप्त राहून आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्यासोबत वेळ घालवून तो आठवणींत साठवून ठेवायचा. घरातील लहानग्यांनाही ही सवय आतापासून लावली पाहिजे. जेणेकरून, त्यांचे भविष्य ‘व्हर्च्युअल’ स्क्रीन्सपुरते मर्यादित राहणार नाही.