शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातला पाणी पळवू देणार नाही - भुजबळ

By admin | Updated: March 12, 2015 01:31 IST

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला पळवू देणार नाही, असा इशारा देत या संबंधीचा करार आमच्या सरकारच्या काळातही झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला पळवू देणार नाही, असा इशारा देत या संबंधीचा करार आमच्या सरकारच्या काळातही झाला असेल तर तो रद्द करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत केली. ते म्हणाले की दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नारपार या दोन नदीजोड प्रकल्पांद्वारे गुजरातला महाराष्ट्राचे पाणी दिले जात आहे. हेच पाणी महाराष्ट्रात वापरले तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटेल व मुंबईलादेखील मुबलक पाणी मिळेल. या बाबतचा करार आमच्या सरकारमध्ये झालाही असेल पण असे सामंजस्य करार आधी अनेकदा रद्द झालेले आहेत मग हा देखील करा. आधीच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी करार केला असेल पण पाणी देण्याचा अधिकार या सार्वभौम सभागृहाला आहे. महाराष्ट्राचे थेंबभरही पाणी देणार नाही, अशी भूमिका या सभागृहाने एकमताने घेतली पाहिजे आणि त्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून भुजबळ म्हणाले की, समोर गुजरात असल्याने आपली अडचण होत आहे, हे मी समजू शकतो पण महाराष्ट्राचे हक्काचे पाणी कोणाला का द्यायचे? पाणी पळविण्याच्या मुद्यावर सध्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट केले की या संबंधीचा करार आपल्याच सरकारने केला होता. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की त्यावेळी सामंजस्य कराराचा केवळ मसुदा तयार करण्यात आला होता. त्याचा पुनर्विचार केला जावू शकतो. (विशेष प्रतिनिधी)