शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

खोटे निष्कर्ष काढून तेढ वाढवू नका : चंद्रकांतदादा

By admin | Updated: February 22, 2015 02:20 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यामागे अनेक कंगोरे असू शकतात. प्रसारमाध्यमांनी पुराव्याशिवाय निष्कर्ष काढत समाजात तेढ निर्माण करू नये.

शासनाची भूमिका : पानसरे यांच्यावरील हल्ला निषेधार्ह; कोणतीही विचारधारा असो, कठोर शासन होईलचकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यामागे अनेक कंगोरे असू शकतात. प्रसारमाध्यमांनी पुराव्याशिवाय निष्कर्ष काढत समाजात तेढ निर्माण करू नये. पोलीस त्यांची भूमिका चोख बजावत आहेत. हल्लेखोर कोणत्याही विचारधारेचा असला तरी त्याला पकडून कठोर शासन झालेच पाहिजे, हीच शासनाची भूमिका आहे, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी उजळाईवाडी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.मंत्री पाटील म्हणाले, पानसरे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नैसर्गिक श्वासोच्छ्वास सुरू होण्यासाठी अत्याधुनिक उपचारांची गरज असल्यानेच पानसरे कुटुंबीय, डॉक्टर्स यांच्याशी चर्चा करूनच त्यांना मुंबईला हलविण्यात आले होते. शुक्रवारी मुंबईत पोहोचल्यानंतर सहा ते दहा वाजेपर्यंत पानसरे यांची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपयोग झाला नाही.पानसरे हे पुरोगामी विचारांचे प्रेरणास्थान होते. पुरोगामी चळवळ ही एक बाजू झाली. माणसाच्या जीवनात अनेक अंग असतात, अनेक भूमिकांमधून माणूस जगत असतो. हे सर्व पर्याय समोर ठेवून पोलीस तपास करीत आहेत. गुप्ततेच्या कारणास्तव तपासाचे सर्व कंगोरे खुले करणे योग्य नाही. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा गेल्या पाच दिवसांत सलग दोन तासही झोपलेले नाहीत. पोलीस प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. नाहक आरोप करून पोलिसांचे मनोबल कमी करू नका, असा सल्ला पाटील यांनी दिला.पानसरे यांच्यावरील हल्ला हा प्रतिगामी शक्तींनी केला, असे ठामपणे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. ठोस पुरावे असल्यास पोलिसांना द्या. नाहक आरोप करून साप साप म्हणून भुई थोपटणे योग्य नाही. पानसरे यांच्यावरील हल्ला हा भ्याडपणाचे लक्षण आहे. कोणत्याही प्रकारचा विरोध हा कायद्याच्या चौकटीत राहूनच केला पाहिजे, असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले.