शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करू नये! - डॉ. बाळ फोंडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 05:16 IST

जैवशास्त्राच्या क्रांतीचे जसे फायदे झाले आहेत, तसेच काही नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत. त्याची जाणीव विज्ञान साहित्यातून घडते. त्यामुळे विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

- विशेष प्रतिनिधीअलिबाग : जैवशास्त्राच्या क्रांतीचे जसे फायदे झाले आहेत, तसेच काही नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत. त्याची जाणीव विज्ञान साहित्यातून घडते. त्यामुळे विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या ४३ व्या महानगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता माझी निवड केली हा मी माझा नव्हे तर विज्ञान साहित्याचा बहुमान समजतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक तथा विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांनी केले आहे. अलिबागजवळच्या कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज सभागृहातील डॉ. मा.ना. आचार्य साहित्य नगरीत रविवारी मुंबई मराठी साहित्य संघ आणि साहित्य रसिक अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या महानगर साहित्य संमेलनाचे आयोजित केले होते. त्यावेळी डॉ.फोंडके बोलत होते.फोंडके म्हणाले की, संपूर्ण जग हे ज्ञानाधिष्ठित उद्योगसंस्कृतीकडे वळले आहे. त्यासाठी लागणारे भांडवल हे नवनिर्मितीच्या ज्ञानाचे आहे आणि असे ज्ञान विज्ञान साहित्यातून मिळते. विज्ञानाच्या आविष्कारांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव आहे. माहिती तंत्रज्ञान आणि जैवशास्त्राने मारलेल्या मुसंडीचे परिणाम माणसाच्या ऋणानुबंधावर दिसून येत आहेत. या क्रांतीमुळे जग जरी जवळ आले असले, तरी माणसांमध्ये दुरावादेखील निर्माण झाला आहे. संपर्क माध्यमांतून माणसे भेटतात, पण प्रत्यक्ष भेट होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.उद्घाटनानंतर दुसºया सत्रात, डॉ.समीरण वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘समाज माध्यमे आणि वाचन संस्कृती’ या विषयावरील परिसंवादात राही पाटील, श्रीरंजन आवटे आणि आदित्य दवणे सहभागी झाले होते.दुपारच्या सत्रात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांची सुनंदा अमरापूरकर यांनी घेतलेली मुलाखत रंगली. कविसंमेलनात अप्पा ठाकूर, नामदेव कोळी, किशोर पाठक,संजय चौधरी,रमेश धनावडे आदींनी कविता सादर केल्या. 

टॅग्स :scienceविज्ञानRaigadरायगड