शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करू नये! - डॉ. बाळ फोंडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 05:16 IST

जैवशास्त्राच्या क्रांतीचे जसे फायदे झाले आहेत, तसेच काही नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत. त्याची जाणीव विज्ञान साहित्यातून घडते. त्यामुळे विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

- विशेष प्रतिनिधीअलिबाग : जैवशास्त्राच्या क्रांतीचे जसे फायदे झाले आहेत, तसेच काही नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत. त्याची जाणीव विज्ञान साहित्यातून घडते. त्यामुळे विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या ४३ व्या महानगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता माझी निवड केली हा मी माझा नव्हे तर विज्ञान साहित्याचा बहुमान समजतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक तथा विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांनी केले आहे. अलिबागजवळच्या कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज सभागृहातील डॉ. मा.ना. आचार्य साहित्य नगरीत रविवारी मुंबई मराठी साहित्य संघ आणि साहित्य रसिक अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या महानगर साहित्य संमेलनाचे आयोजित केले होते. त्यावेळी डॉ.फोंडके बोलत होते.फोंडके म्हणाले की, संपूर्ण जग हे ज्ञानाधिष्ठित उद्योगसंस्कृतीकडे वळले आहे. त्यासाठी लागणारे भांडवल हे नवनिर्मितीच्या ज्ञानाचे आहे आणि असे ज्ञान विज्ञान साहित्यातून मिळते. विज्ञानाच्या आविष्कारांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव आहे. माहिती तंत्रज्ञान आणि जैवशास्त्राने मारलेल्या मुसंडीचे परिणाम माणसाच्या ऋणानुबंधावर दिसून येत आहेत. या क्रांतीमुळे जग जरी जवळ आले असले, तरी माणसांमध्ये दुरावादेखील निर्माण झाला आहे. संपर्क माध्यमांतून माणसे भेटतात, पण प्रत्यक्ष भेट होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.उद्घाटनानंतर दुसºया सत्रात, डॉ.समीरण वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘समाज माध्यमे आणि वाचन संस्कृती’ या विषयावरील परिसंवादात राही पाटील, श्रीरंजन आवटे आणि आदित्य दवणे सहभागी झाले होते.दुपारच्या सत्रात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांची सुनंदा अमरापूरकर यांनी घेतलेली मुलाखत रंगली. कविसंमेलनात अप्पा ठाकूर, नामदेव कोळी, किशोर पाठक,संजय चौधरी,रमेश धनावडे आदींनी कविता सादर केल्या. 

टॅग्स :scienceविज्ञानRaigadरायगड