शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

स्वाभिमान गहाण ठेऊन सत्ता नको- आ. हर्षवर्धन जाधव

By admin | Updated: October 30, 2014 13:13 IST

शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करून, स्वाभिमान गहाण ठेऊन जर सत्ता मिळत असेल तर अशी सत्ता नकोच असा पवित्रा सेना आमदार हर्षवर्धन जाधवांनी घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ३० - शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करून, स्वाभिमान गहाण ठेऊन जर सत्ता मिळत असेल तर अशी सत्ता नकोच असा पवित्रा शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वात जास्त जागा मिळवत सत्तास्थापनेसाठी दावा केला, मात्र शिवसेनेला त्यात कोठेही स्थान मिळालेले दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच माफी मागितल्यावरच शिवसेनेशी युती होईल असा पवित्रा भाजपा नेत्यांनी घेतल्याचे वृत्त फिरत आहे. त्या पार्श्वभूमीवरच शिवसेना आमदार जाधव यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.
महाराष्ट्रापासून मुंबई व विदर्भ वेगळा करण्याचा भाजपाने घाट घातला असल्याची टीका त्यांनी केली. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत मराठी माणसाकडे नजर वाकडीकरून पाहण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. मात्र आता सर्वजण मराठी माणसाला घाटी म्हणून चिडवतात. भाजपा मराठी माणासाला अपमानास्पद वागणूक देत असून भाजपा त्यांची अस्मिता चिरडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
त्यामुळे आपली अस्मिता, तत्व सोडून भाजपाला साथ देण्याची गरज नाही असे आपले वैयक्तिक मत असल्याचे जाधव यांनी सांगितले.