शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

तरुणांना उपदेशाचे डोस देऊ नका

By admin | Updated: February 4, 2015 02:09 IST

ज्येष्ठ कवी, गीतकार गुलजार यांनी आजच्या तरुणांना कोणतेही उपदेश करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. तरूणांच्या हाती देश सुरक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पुणे : ‘अब हिंदुस्तान तुम्हारे पास है, उसे मुझे मत लौटाना, और आगे ले जाना...’ अशा शब्दांत तरुणाईच्या क्षमतेवर विश्वास प्रकट करीत ज्येष्ठ कवी, गीतकार गुलजार यांनी आजच्या तरुणांना कोणतेही उपदेश करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. तरूणांच्या हाती देश सुरक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘जो बन रहा है वतन, चलो ना चले वतन की बात करे’, अशा शब्दांत त्यांनी इतरांनाही तरूणांना साथ देण्याचे आवाहन केले. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातर्फे आयोजित ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ‘जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गुलजार यांच्यासह इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, बंगळुरू येथील प्राध्यापक त्रिलोचन शास्त्री यांना ‘आचार्य श्रेष्ठ’, खा. अनंतकुमार हेगडे यांना ‘जनप्रतिनिधी श्रेष्ठ’, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांना ‘जनजागरण श्रेष्ठ’ तर उद्योजिका खा. अनू आगा यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर गुलजार म्हणाले, माझ्या नसानसांत हिंदुस्तान आहे. त्याची आठवण काढावी लागत नाही. आताच्या तरूणांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे वाटते. त्यांच्याकडे पाच हजार वर्षांचा संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखू नये. त्यांच्याकडे क्षमता आहे. पण आहे तेथेच थांबू नका, आम्ही देश इथपर्यंत आणला. आता तुम्हाला तो आणखी पुढे न्यायचा आहे. मागील ६० वर्षांत भ्रष्टाचार किती वाढला. गंगा किती दूषित झाली? याला आमची पिढी जबाबदार आहे. यात तरूणांचा काय दोष ! त्यामुळे आता तरुणांना उपदेश न करता त्यांच्याकडूनच शिकण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. शास्त्री म्हणाले, देशातील सध्याची राजकारणाची स्थिती पाहता मूल्याधिष्ठित राजकारणाची गरज आहे.देशात शौचालय, पिण्याचे पाणी, स्त्रियांची सुरक्षितता, दर्जेदार शिक्षणाचे प्रश्न गंभीर आहे. स्वच्छ भारत मोहिमेबरोबरच सर्वांची मनेही स्वच्छ व्हायला हवीत, असे पाडगावकर म्हणाले. आगा म्हणाल्या, आकर्षणांच्या मागे धावण्यापेक्षा ध्येय उराशी बाळगून इतरांसाठी समर्पित काम करण्याची वृत्ती जोपासायला हवी. हेगडे यांनी राजकारणातील गुन्हेगारी हे कटू वास्तव असल्याचे सांगितले. बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. आर. अय्यर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, पुरस्कार समितीचे समन्वयक प्रा. राहुल कराड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)