शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना उपदेशाचे डोस देऊ नका

By admin | Updated: February 4, 2015 02:09 IST

ज्येष्ठ कवी, गीतकार गुलजार यांनी आजच्या तरुणांना कोणतेही उपदेश करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. तरूणांच्या हाती देश सुरक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पुणे : ‘अब हिंदुस्तान तुम्हारे पास है, उसे मुझे मत लौटाना, और आगे ले जाना...’ अशा शब्दांत तरुणाईच्या क्षमतेवर विश्वास प्रकट करीत ज्येष्ठ कवी, गीतकार गुलजार यांनी आजच्या तरुणांना कोणतेही उपदेश करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. तरूणांच्या हाती देश सुरक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘जो बन रहा है वतन, चलो ना चले वतन की बात करे’, अशा शब्दांत त्यांनी इतरांनाही तरूणांना साथ देण्याचे आवाहन केले. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातर्फे आयोजित ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ‘जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गुलजार यांच्यासह इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, बंगळुरू येथील प्राध्यापक त्रिलोचन शास्त्री यांना ‘आचार्य श्रेष्ठ’, खा. अनंतकुमार हेगडे यांना ‘जनप्रतिनिधी श्रेष्ठ’, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांना ‘जनजागरण श्रेष्ठ’ तर उद्योजिका खा. अनू आगा यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर गुलजार म्हणाले, माझ्या नसानसांत हिंदुस्तान आहे. त्याची आठवण काढावी लागत नाही. आताच्या तरूणांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे वाटते. त्यांच्याकडे पाच हजार वर्षांचा संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखू नये. त्यांच्याकडे क्षमता आहे. पण आहे तेथेच थांबू नका, आम्ही देश इथपर्यंत आणला. आता तुम्हाला तो आणखी पुढे न्यायचा आहे. मागील ६० वर्षांत भ्रष्टाचार किती वाढला. गंगा किती दूषित झाली? याला आमची पिढी जबाबदार आहे. यात तरूणांचा काय दोष ! त्यामुळे आता तरुणांना उपदेश न करता त्यांच्याकडूनच शिकण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. शास्त्री म्हणाले, देशातील सध्याची राजकारणाची स्थिती पाहता मूल्याधिष्ठित राजकारणाची गरज आहे.देशात शौचालय, पिण्याचे पाणी, स्त्रियांची सुरक्षितता, दर्जेदार शिक्षणाचे प्रश्न गंभीर आहे. स्वच्छ भारत मोहिमेबरोबरच सर्वांची मनेही स्वच्छ व्हायला हवीत, असे पाडगावकर म्हणाले. आगा म्हणाल्या, आकर्षणांच्या मागे धावण्यापेक्षा ध्येय उराशी बाळगून इतरांसाठी समर्पित काम करण्याची वृत्ती जोपासायला हवी. हेगडे यांनी राजकारणातील गुन्हेगारी हे कटू वास्तव असल्याचे सांगितले. बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. आर. अय्यर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, पुरस्कार समितीचे समन्वयक प्रा. राहुल कराड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)