शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

पवारांना धोका देणाऱ्यांना माफ करणार नाही

By admin | Updated: December 21, 2015 00:23 IST

शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्यात विविध नेत्यांनी शरद पवार यांना पंतप्रधानपद न मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली. पवार यांना त्या काळात धोका देणाऱ्यांना आपण कधीही माफ करणार नाही

पुणे : शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्यात विविध नेत्यांनी शरद पवार यांना पंतप्रधानपद न मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली. पवार यांना त्या काळात धोका देणाऱ्यांना आपण कधीही माफ करणार नाही, असे ज्येष्ठ उद्योगपती सायरस पूनावाला यांनी सांगितले. शरद पवार यांचे महाविद्यालयीन जीवनापासून मित्र असलेले सायरस पूनावला यांनी आपल्या ५७ वर्षांच्या मैत्रीचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, ‘‘पी. व्ही. नरसिंहराव यांच्या वेळी दिल्लीत पंतप्रधानपदाची खलबते सुरू असताना, आपण पवार हे आता पंतप्रधान होणार म्हणून आपण काही मित्रांसह दिल्लीत हजर होतो. मात्र, त्यावेळी काही लोकांनी त्यांना धोका दिला. त्यांना आपण कधीही माफ केले नाही आणि करणारही नाही. पवार आणि आपण चांगलो मित्र आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत राहू. पवारांचा वारसा आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी सांभाळला असून, ते पवारांचे नाव आणखी मोठे करतील.’’शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा एकमेव नेता : प्रफुल्ल पटेल शरद पवार म्हणजे कोण, याचं उत्तर दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेला त्यांचा सर्वपक्षीय सोहळा होता अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशात आज शेतकऱ्यांच्या नावाने राजकरण करणारे अनेक नेते आहेत. मात्र, त्यांच्यासाठी अल्पव्याजदरात कर्ज, संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठांची दारे उघडून दिली. आज अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं जात असलं तरी पवार यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर कधीच पोहोचला होता असा उल्लेखही पटेल यांनी या वेळी केला.साहेबांच्या सल्ल्यानेच देशाचा विकास : धनंजय मुंडे देशाला न लाभलेला पंतप्रधान म्हणून पवारसाहेब ओळखले जातात. मात्र, केंद्राच्या राजकरणात गेल्या ३५ वर्षांत झालेल्या प्रत्येक पंतप्रधानासह विद्यमान पंतप्रधानही पवारांचा सल्ला घेत असल्याने देशाच्या विकासात पवार यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या वेळी बोलताना केले.महाराष्ट्राची सर्वांगीण माहिती असलेला एकमेव नेता : पतंगराव कदम महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात चौफेर वावर आणि प्रवास असलेले पवार हे महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल माहीत असलेले एकमेव नेते असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने आणि केंद्राने सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली. एक उत्तम राज्यकर्ता, शासनकर्ता कसा असावा याचे आदर्श उदाहरण पवार आहेत. सर्वसामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून ते नेहमी कार्यरत राहिले. तर त्यांच्या या कार्याला पडद्याआडून प्रतिभाताई पवार यांनी ताकद दिली. या वेळी पंतप्रधानपदासाठी अनुकूल वातावरण असताना, पवार हे पुन्हा राज्यात आले याबाबत आपल्याला आवडले नसल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)गरिबांच्या कल्याणाचे धोरण स्वीकारावेजात-धर्म बाजूला ठेवून भाईचारा जपण्याचे, गरिबांच्या कल्याणाचे पवारांचे धोरण सगळ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी या वेळी उपस्थितांना केले. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पवार नेहमीच आग्रही राहिले. वेळ प्रसंगी त्यांनी राजकीय विरोध पत्कारून त्यांनी मराठवाडा विद्यापीठचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेन नामांतरण केले. समाजातील वं़चित घटकाला न्याय देण्यासाठी मंडल आयोग लागू करून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण उपलब्ध करून दिले. महिलांना आधी 33 टक्के आरक्षण आणि नंतर ५० टक्के आरक्षण देण्यास आग्रही राहिले. अशा प्रसंगी त्यांनी कधीही आपल्या राजकणात तसेच समाजकारणात जात, धर्म न आणता भाईचारा जपण्याचे काम केले.मी हरलो म्हणून बरे झालेमुंबईत मी शिवसेनेचा महापौर असताना गरवारे क्रिकेट क्लबच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मला शरद पवार यांच्याविरुद्ध उभे करण्यात आले होते, त्या वेळी मी हरलो म्हणून बरे झाले. मी अध्यक्ष झालो असतो तर कार्यकाळ संपवून शांत बसलो असतो. पवार निवडून आल्यानंतर मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, बीसीसीआयचे अध्यक्ष त्यानंतर आयसीसीआयचे अध्यक्ष अशा एकएक पायऱ्या चढत गेले अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.