शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पवारांना धोका देणाऱ्यांना माफ करणार नाही

By admin | Updated: December 21, 2015 00:23 IST

शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्यात विविध नेत्यांनी शरद पवार यांना पंतप्रधानपद न मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली. पवार यांना त्या काळात धोका देणाऱ्यांना आपण कधीही माफ करणार नाही

पुणे : शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्यात विविध नेत्यांनी शरद पवार यांना पंतप्रधानपद न मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली. पवार यांना त्या काळात धोका देणाऱ्यांना आपण कधीही माफ करणार नाही, असे ज्येष्ठ उद्योगपती सायरस पूनावाला यांनी सांगितले. शरद पवार यांचे महाविद्यालयीन जीवनापासून मित्र असलेले सायरस पूनावला यांनी आपल्या ५७ वर्षांच्या मैत्रीचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, ‘‘पी. व्ही. नरसिंहराव यांच्या वेळी दिल्लीत पंतप्रधानपदाची खलबते सुरू असताना, आपण पवार हे आता पंतप्रधान होणार म्हणून आपण काही मित्रांसह दिल्लीत हजर होतो. मात्र, त्यावेळी काही लोकांनी त्यांना धोका दिला. त्यांना आपण कधीही माफ केले नाही आणि करणारही नाही. पवार आणि आपण चांगलो मित्र आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत राहू. पवारांचा वारसा आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी सांभाळला असून, ते पवारांचे नाव आणखी मोठे करतील.’’शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा एकमेव नेता : प्रफुल्ल पटेल शरद पवार म्हणजे कोण, याचं उत्तर दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेला त्यांचा सर्वपक्षीय सोहळा होता अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशात आज शेतकऱ्यांच्या नावाने राजकरण करणारे अनेक नेते आहेत. मात्र, त्यांच्यासाठी अल्पव्याजदरात कर्ज, संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठांची दारे उघडून दिली. आज अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं जात असलं तरी पवार यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर कधीच पोहोचला होता असा उल्लेखही पटेल यांनी या वेळी केला.साहेबांच्या सल्ल्यानेच देशाचा विकास : धनंजय मुंडे देशाला न लाभलेला पंतप्रधान म्हणून पवारसाहेब ओळखले जातात. मात्र, केंद्राच्या राजकरणात गेल्या ३५ वर्षांत झालेल्या प्रत्येक पंतप्रधानासह विद्यमान पंतप्रधानही पवारांचा सल्ला घेत असल्याने देशाच्या विकासात पवार यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या वेळी बोलताना केले.महाराष्ट्राची सर्वांगीण माहिती असलेला एकमेव नेता : पतंगराव कदम महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात चौफेर वावर आणि प्रवास असलेले पवार हे महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल माहीत असलेले एकमेव नेते असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने आणि केंद्राने सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली. एक उत्तम राज्यकर्ता, शासनकर्ता कसा असावा याचे आदर्श उदाहरण पवार आहेत. सर्वसामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून ते नेहमी कार्यरत राहिले. तर त्यांच्या या कार्याला पडद्याआडून प्रतिभाताई पवार यांनी ताकद दिली. या वेळी पंतप्रधानपदासाठी अनुकूल वातावरण असताना, पवार हे पुन्हा राज्यात आले याबाबत आपल्याला आवडले नसल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)गरिबांच्या कल्याणाचे धोरण स्वीकारावेजात-धर्म बाजूला ठेवून भाईचारा जपण्याचे, गरिबांच्या कल्याणाचे पवारांचे धोरण सगळ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी या वेळी उपस्थितांना केले. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पवार नेहमीच आग्रही राहिले. वेळ प्रसंगी त्यांनी राजकीय विरोध पत्कारून त्यांनी मराठवाडा विद्यापीठचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेन नामांतरण केले. समाजातील वं़चित घटकाला न्याय देण्यासाठी मंडल आयोग लागू करून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण उपलब्ध करून दिले. महिलांना आधी 33 टक्के आरक्षण आणि नंतर ५० टक्के आरक्षण देण्यास आग्रही राहिले. अशा प्रसंगी त्यांनी कधीही आपल्या राजकणात तसेच समाजकारणात जात, धर्म न आणता भाईचारा जपण्याचे काम केले.मी हरलो म्हणून बरे झालेमुंबईत मी शिवसेनेचा महापौर असताना गरवारे क्रिकेट क्लबच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मला शरद पवार यांच्याविरुद्ध उभे करण्यात आले होते, त्या वेळी मी हरलो म्हणून बरे झाले. मी अध्यक्ष झालो असतो तर कार्यकाळ संपवून शांत बसलो असतो. पवार निवडून आल्यानंतर मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, बीसीसीआयचे अध्यक्ष त्यानंतर आयसीसीआयचे अध्यक्ष अशा एकएक पायऱ्या चढत गेले अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.