शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

राष्ट्रवादीच्या भूमिकेला बळी पडू नका - विखे

By admin | Updated: October 26, 2015 02:39 IST

पाण्याच्या चिघळलेला प्रश्न हे राष्ट्रवादीचे पाप आहे. या मुद्द्यावर जनतेचे डोके भडकवून दंगे व गोळीबार घडविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे

लोणी (जि. अहमदनगर) : पाण्याच्या चिघळलेला प्रश्न हे राष्ट्रवादीचे पाप आहे. या मुद्द्यावर जनतेचे डोके भडकवून दंगे व गोळीबार घडविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे. त्यांच्या भूमिकेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केले आहे. मराठवाड्यातील जनता आपली बंधू आहे. त्यांच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र बसावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एक झाले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचाही त्यात समावेश होता. त्यानंतर बाळासाहेब विखे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. पाणीप्रश्नावर राष्ट्रवादीला अकोले, कोपरगाव, नेवासा, राहुरीत मोर्चाच्या निमित्ताने वादंग करायचे आहेत. पाणीप्रश्नी काँग्रेसची भूमिका योग्य व समन्वयाची आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी राज्यात बदनाम होत आहे. त्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा आधार घेतला जात आहे. त्यांच्या भूमिकेला बळी न पडता सावधगिरी बाळगा, असे आवाहन त्यांनी केले आहे.राष्ट्रवादीतील नेत्यांच्या कृष्णकृत्यांच्या चौकशा राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी एकही प्रभावी प्रश्न नाही. त्यामुळे त्यांनी आता पाणीप्रश्नावर दंगे व गोळीबार कसा होईल, त्यात जनतेचा बळी कसा जाईल, यासाठी योजना आखल्याचे विखे म्हणाले. (वार्ताहर)