शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या भूमिकेला बळी पडू नका - विखे

By admin | Updated: October 26, 2015 02:39 IST

पाण्याच्या चिघळलेला प्रश्न हे राष्ट्रवादीचे पाप आहे. या मुद्द्यावर जनतेचे डोके भडकवून दंगे व गोळीबार घडविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे

लोणी (जि. अहमदनगर) : पाण्याच्या चिघळलेला प्रश्न हे राष्ट्रवादीचे पाप आहे. या मुद्द्यावर जनतेचे डोके भडकवून दंगे व गोळीबार घडविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे. त्यांच्या भूमिकेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केले आहे. मराठवाड्यातील जनता आपली बंधू आहे. त्यांच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र बसावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एक झाले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचाही त्यात समावेश होता. त्यानंतर बाळासाहेब विखे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. पाणीप्रश्नावर राष्ट्रवादीला अकोले, कोपरगाव, नेवासा, राहुरीत मोर्चाच्या निमित्ताने वादंग करायचे आहेत. पाणीप्रश्नी काँग्रेसची भूमिका योग्य व समन्वयाची आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी राज्यात बदनाम होत आहे. त्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा आधार घेतला जात आहे. त्यांच्या भूमिकेला बळी न पडता सावधगिरी बाळगा, असे आवाहन त्यांनी केले आहे.राष्ट्रवादीतील नेत्यांच्या कृष्णकृत्यांच्या चौकशा राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी एकही प्रभावी प्रश्न नाही. त्यामुळे त्यांनी आता पाणीप्रश्नावर दंगे व गोळीबार कसा होईल, त्यात जनतेचा बळी कसा जाईल, यासाठी योजना आखल्याचे विखे म्हणाले. (वार्ताहर)