शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

भ्रामक प्रचाराला युवकांनी बळी पडू नये- अमित शाह

By admin | Updated: June 5, 2016 15:54 IST

यापूर्वीच्या चुकीच्या सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 5-  यापूर्वीच्या चुकीच्या सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या. युवक या देशाची ताकद बनण्याऐवजी देशावरचे ओझे बनले. हे चित्र पालटवण्यासाठी देशाचे भाग्य बदलणाऱ्या योजना मोदी सरकारने सुरू केल्या आहेत. त्याविरुद्धच्या भ्रामक प्रचाराला युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी केले.राज्य सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या प्रसारासाठी भाजपने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अमर साबळे, संजय पाटील, पुण्यातील आमदार, नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक केले. खासदार अनिल शिरोळे यांनी आभार मानले.शहा म्हणाले, जगातले सर्वाधिक युवक भारतात आहेत. भारत हा तरुणांचा देश आहे. युवकांच्या हातांना काम देण्याची रणनीती आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती नरेंद्र मोदींकडे आहे. रोजगार निर्माण करण्याच्या कृषी क्षेत्राच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून असल्याने शेती फायद्यात येऊ शकत नाही. शेतीवरचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी युवकांना कौशल्याधारीत शिक्षण देण्याचे मोदींचे नियोजन आहे.ह्णह्णमेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्कील इंडिया, मुद्रा बँक, जन-धन योजना यामुळे देशाचे भाग्य बदलणार आहे. गेल्या वर्षभरात वीस लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे़ ते म्हणाले, ह्यह्यकृषी क्षेत्राला मजबूत करणे आणि बेरोजगारी निर्मुलनाच्या दिशेने मोदी सरकारची वाटचाल सुरु आहे. यंदाच्या वर्षातले पहिल्या तिमाहीचा देशाचा विकास दर जगात सर्वाधिक आहे. जीडीपी ला मानवीय दृष्टीकोन दिला आहे. केवळ कंपन्या किंवा व्यापारातील वाढ म्हणजे जीडीपी नाही़ त्याला सामाजिक सशक्तकरण्याचे साधन केले आहे. देशाचे अथर्तंत्र ताळ्यावर आहे. अपवाद वगळता महागाईवरही नियंत्रण ठेवण्यात सरकार यशस्वी झाले आहे.ह्णह्णह्यह्यसन १९७२ मध्ये कॉंग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण गरीबी हटली का,ह्णह्ण असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. कॉंग्रेसवाले दोन वर्षात कुठे आहेत ह्यअच्छे दिनह्ण म्हणून विचारत आहेत. कॉंग्रेसने ६७ वर्षात गरीबी हटवण्यासाठी जितके प्रयत्न केले नाहीत तितके मोदी सरकारने दोन वर्षात केले. मात्र गेल्या दोन वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप करण्याची संधी मिळाली नसल्याने कॉंग्रेसवाले बेचैन झाले आहेत, असे ते म्हणाले.