शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भ्रामक प्रचाराला युवकांनी बळी पडू नये- अमित शाह

By admin | Updated: June 5, 2016 15:54 IST

यापूर्वीच्या चुकीच्या सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 5-  यापूर्वीच्या चुकीच्या सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या. युवक या देशाची ताकद बनण्याऐवजी देशावरचे ओझे बनले. हे चित्र पालटवण्यासाठी देशाचे भाग्य बदलणाऱ्या योजना मोदी सरकारने सुरू केल्या आहेत. त्याविरुद्धच्या भ्रामक प्रचाराला युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी केले.राज्य सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या प्रसारासाठी भाजपने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अमर साबळे, संजय पाटील, पुण्यातील आमदार, नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक केले. खासदार अनिल शिरोळे यांनी आभार मानले.शहा म्हणाले, जगातले सर्वाधिक युवक भारतात आहेत. भारत हा तरुणांचा देश आहे. युवकांच्या हातांना काम देण्याची रणनीती आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती नरेंद्र मोदींकडे आहे. रोजगार निर्माण करण्याच्या कृषी क्षेत्राच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून असल्याने शेती फायद्यात येऊ शकत नाही. शेतीवरचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी युवकांना कौशल्याधारीत शिक्षण देण्याचे मोदींचे नियोजन आहे.ह्णह्णमेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्कील इंडिया, मुद्रा बँक, जन-धन योजना यामुळे देशाचे भाग्य बदलणार आहे. गेल्या वर्षभरात वीस लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे़ ते म्हणाले, ह्यह्यकृषी क्षेत्राला मजबूत करणे आणि बेरोजगारी निर्मुलनाच्या दिशेने मोदी सरकारची वाटचाल सुरु आहे. यंदाच्या वर्षातले पहिल्या तिमाहीचा देशाचा विकास दर जगात सर्वाधिक आहे. जीडीपी ला मानवीय दृष्टीकोन दिला आहे. केवळ कंपन्या किंवा व्यापारातील वाढ म्हणजे जीडीपी नाही़ त्याला सामाजिक सशक्तकरण्याचे साधन केले आहे. देशाचे अथर्तंत्र ताळ्यावर आहे. अपवाद वगळता महागाईवरही नियंत्रण ठेवण्यात सरकार यशस्वी झाले आहे.ह्णह्णह्यह्यसन १९७२ मध्ये कॉंग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण गरीबी हटली का,ह्णह्ण असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. कॉंग्रेसवाले दोन वर्षात कुठे आहेत ह्यअच्छे दिनह्ण म्हणून विचारत आहेत. कॉंग्रेसने ६७ वर्षात गरीबी हटवण्यासाठी जितके प्रयत्न केले नाहीत तितके मोदी सरकारने दोन वर्षात केले. मात्र गेल्या दोन वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप करण्याची संधी मिळाली नसल्याने कॉंग्रेसवाले बेचैन झाले आहेत, असे ते म्हणाले.