शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

तुम्ही आत्महत्या करू नका.!

By admin | Updated: June 21, 2014 23:35 IST

दरवर्षी पाचविला पुजलेला दुष्काळ.. अवकाळी गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

पुणो : दरवर्षी पाचविला पुजलेला दुष्काळ.. अवकाळी गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटूंबच उद्ध्वस्त होत असल्याने या आत्महत्या रोखण्यासाठी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून या आत्महत्याग्रस्त शेतक:यांची मुले या आत्महत्या रोखण्यासाठी सरसावली आहेत. 
‘आमच्या वडीलांनी आत्महत्या केली.. तशी तुम्ही करू नका’ असा संदेश देत राज्यभरातून आलेले हे चिमुकले आळंदी ते पंढरपूर या मार्गावर शेतक:यांना आवाहन करीत आहेत.  5 वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील अधारतीर्थ आधाराश्रम या संस्थेच्या मध्यमातून ही मुले या दिंडीत सहभागी झाली आहेत. 
राज्यभरातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अनेक मुले अनाथ होत असून त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी आधारतीर्थ या संस्थेने स्वीकारली आहे. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ही मुले संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणा:या दिंडीतून आळंदी ते पंढरपूर्पयत समाजप्रबोधनाची जबाबदारी पार पाडत आहेत. 
 संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर शहरात दाखल झालेली अभिनव दिंडी पुणोकरांसाठी उत्सूकतेचा विषय ठरत होती. ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत करून या मुलांसाठी पुणोकर मदतीचा हातही पुढे करीत होते. तसेच भावूक होऊन त्यांचे कौतुकही करीत होते. 
 
मायबाप सरकारला जाग येऊ दे
पथनाटय़, डोक्यावर संदेश लिहलेली टोपी, हाती टाळ आणि मृदृंग घेऊन विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत कीर्तनातूनही ही मुले आत्महत्या रोखण्याचा संदेश देत आहे. ‘बळीराजाचे राज्य येऊ दे, मायबाप सरकारला जाग येऊ दे’, ‘विठ्ठला शेतक:याच्या आत्महत्या थांबाव’ असा संदेश हे बालवारकरी देत  आहेत.