पुणो : दरवर्षी पाचविला पुजलेला दुष्काळ.. अवकाळी गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटूंबच उद्ध्वस्त होत असल्याने या आत्महत्या रोखण्यासाठी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून या आत्महत्याग्रस्त शेतक:यांची मुले या आत्महत्या रोखण्यासाठी सरसावली आहेत.
‘आमच्या वडीलांनी आत्महत्या केली.. तशी तुम्ही करू नका’ असा संदेश देत राज्यभरातून आलेले हे चिमुकले आळंदी ते पंढरपूर या मार्गावर शेतक:यांना आवाहन करीत आहेत. 5 वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील अधारतीर्थ आधाराश्रम या संस्थेच्या मध्यमातून ही मुले या दिंडीत सहभागी झाली आहेत.
राज्यभरातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अनेक मुले अनाथ होत असून त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी आधारतीर्थ या संस्थेने स्वीकारली आहे. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ही मुले संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणा:या दिंडीतून आळंदी ते पंढरपूर्पयत समाजप्रबोधनाची जबाबदारी पार पाडत आहेत.
संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर शहरात दाखल झालेली अभिनव दिंडी पुणोकरांसाठी उत्सूकतेचा विषय ठरत होती. ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत करून या मुलांसाठी पुणोकर मदतीचा हातही पुढे करीत होते. तसेच भावूक होऊन त्यांचे कौतुकही करीत होते.
मायबाप सरकारला जाग येऊ दे
पथनाटय़, डोक्यावर संदेश लिहलेली टोपी, हाती टाळ आणि मृदृंग घेऊन विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत कीर्तनातूनही ही मुले आत्महत्या रोखण्याचा संदेश देत आहे. ‘बळीराजाचे राज्य येऊ दे, मायबाप सरकारला जाग येऊ दे’, ‘विठ्ठला शेतक:याच्या आत्महत्या थांबाव’ असा संदेश हे बालवारकरी देत आहेत.