शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

पीडित, तक्रारदाराची निंदा करू नका - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:32 IST

तपास करत असताना संबंधित तक्रारदार किंवा पीडित व्यक्तीची त्याच्या चारित्र्यावरून निंदा करण्यापासून पोलिसांनी स्वत:ला परावृत्त करावे, अशी सूचना उच्च न्यायालयाने पोलिसांना केली आहे.

मुंबई : तपास करत असताना संबंधित तक्रारदार किंवा पीडित व्यक्तीची त्याच्या चारित्र्यावरून निंदा करण्यापासून पोलिसांनी स्वत:ला परावृत्त करावे, अशी सूचना उच्च न्यायालयाने पोलिसांना केली आहे.पोलिसांनी त्यांच्या कृत्यामुळे नागरिकांच्या सन्मान व प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही, इतकी संवेदनशीलता व समज दाखवावी, असे न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका याचिकेवर आदेश देताना म्हटले.याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तिचा भाऊ आॅक्टोबर २०१५ पासून गायब आहे. तो कस्टम हाउस एजंट होता. पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली. मात्र त्याला शोधून काढण्यास पोलिसांना अपयश आले. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.संबंधित व्यक्तीला शोधण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. त्याशिवाय पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, अशी माहिती पायधुनी पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला.मात्र गुन्हे अन्वेषण विभागाने काहीही तपास केला नसल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, याचिकाकर्त्याचा भाऊ स्वत:च्या मर्जीने घर सोडून गेला असावा. ‘याचिकाकर्त्याचा भाऊ अल्कोहोलच्या अधीन झालेला होता. त्याच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याने तो सतत दु:खी होता. त्याच्या मद्यपानाच्या सवयीमुळे त्याचे कुटुंबीयांबरोबर सतत वाद होत होते. वारंवार होणाºया वादामुळे व मुलाच्या मृत्यूमुळे याचिकाकर्त्याच्या भावाने घर व कंपनी सोडली असावी. तो स्वत:ला लपवत असावा,’ अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.त्यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आक्षेप घेतला. तर न्यायालयानेही पोलिसांनी असे गृहीत धरून तपास करू नये, असे म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालय