शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

मान्सून असतानाच पीक कर्जवाटप करा

By admin | Updated: June 26, 2015 02:19 IST

मान्सून सर्वत्र सुरू असतानाही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पुरेसे गाठले गेलेले नाही. त्यामुळे बँकांनी या कर्जवाटपाची वेळ पाळावी. तसेच,

मुंबई : मान्सून सर्वत्र सुरू असतानाही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पुरेसे गाठले गेलेले नाही. त्यामुळे बँकांनी या कर्जवाटपाची वेळ पाळावी. तसेच, गतवर्षी दुष्काळ असलेल्या भागांना प्राधान्याने कर्जवाटप करावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीची (एसएलबीसी) बैठक बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी सहभागी बँकांना ही सूचना करण्यात आली. बँकांनी प्राधान्य क्षेत्रांसाठी (शेती, उद्योग, शिक्षण, गृह) या आर्थिक वर्षात १ लाख ८६ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आराखडा या बैठकीत मांडण्यात आला. यापैकी ६६ हजार ७४८ कोटींचे कर्ज शेतीशी संबंधित असून त्यातील ४४ हजार ३१९ कोटी पीक कर्ज असणार आहे. काही मर्यादित शेतकऱ्यांनाच अद्याप पीककर्जाचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे कर्जवाटपाचा वेग वाढवावा, तसेच शेती व ग्रामीण भागातील समस्यांकडे बँकांनी अत्यंत संवेदनशीलपणे पाहावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. पीक कर्जाचे वाटप करताना शेतकरी आत्महत्या झालेल्या जिल्ह्यांत प्राधान्य देण्याची सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या व्याजाचा भार उचलण्यासाठी सरकारने तसा फंड उभारावा, असे मत बँकर्स समितीचे अध्यक्ष व बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक सुशील मुनोत यांनी मांडले. या बैठकीला कृषिमंत्री एकनाथ खडसे, तसेच कृषी राज्यमंत्री राम शिंदे हेही उपस्थित होते.