शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून असतानाच पीक कर्जवाटप करा

By admin | Updated: June 26, 2015 02:19 IST

मान्सून सर्वत्र सुरू असतानाही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पुरेसे गाठले गेलेले नाही. त्यामुळे बँकांनी या कर्जवाटपाची वेळ पाळावी. तसेच,

मुंबई : मान्सून सर्वत्र सुरू असतानाही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पुरेसे गाठले गेलेले नाही. त्यामुळे बँकांनी या कर्जवाटपाची वेळ पाळावी. तसेच, गतवर्षी दुष्काळ असलेल्या भागांना प्राधान्याने कर्जवाटप करावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीची (एसएलबीसी) बैठक बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी सहभागी बँकांना ही सूचना करण्यात आली. बँकांनी प्राधान्य क्षेत्रांसाठी (शेती, उद्योग, शिक्षण, गृह) या आर्थिक वर्षात १ लाख ८६ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आराखडा या बैठकीत मांडण्यात आला. यापैकी ६६ हजार ७४८ कोटींचे कर्ज शेतीशी संबंधित असून त्यातील ४४ हजार ३१९ कोटी पीक कर्ज असणार आहे. काही मर्यादित शेतकऱ्यांनाच अद्याप पीककर्जाचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे कर्जवाटपाचा वेग वाढवावा, तसेच शेती व ग्रामीण भागातील समस्यांकडे बँकांनी अत्यंत संवेदनशीलपणे पाहावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. पीक कर्जाचे वाटप करताना शेतकरी आत्महत्या झालेल्या जिल्ह्यांत प्राधान्य देण्याची सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या व्याजाचा भार उचलण्यासाठी सरकारने तसा फंड उभारावा, असे मत बँकर्स समितीचे अध्यक्ष व बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक सुशील मुनोत यांनी मांडले. या बैठकीला कृषिमंत्री एकनाथ खडसे, तसेच कृषी राज्यमंत्री राम शिंदे हेही उपस्थित होते.