शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
3
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा
4
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
5
गुंतवणूकदारांसाठी 'डिव्हिडंड'चा डबल धमाका! BEL, DLF सह 'या' कंपन्या देणार छप्परफाड लाभांश
6
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
7
इस्रायलचे गाझावर हल्ले, विरोधात 22 देश एकवटले; पण एकाही मुस्लिम देशाचा पाठिंबा नाही...
8
Mumbai Local Train: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंब्रा- कळवा मार्गावर लोकलची बैलाला धडक
9
अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?
10
पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये
11
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
12
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
13
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
14
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
15
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
16
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
17
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
18
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
19
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
20
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story

‘काहीही करा पण आम्हाला प्रवेश द्या’

By admin | Updated: July 9, 2016 02:22 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगर क्षेत्रामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया १०० टक्के आॅनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. मात्र प्रवेश अर्ज चुकीचे भरलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगर क्षेत्रामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया १०० टक्के आॅनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. मात्र प्रवेश अर्ज चुकीचे भरलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज बाद झाल्यानंतर मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आॅफलाइन प्रवेशासाठी गर्दी केली जात आहे. ‘काहीही करा, मात्र प्रवेश द्या’, अशा गाऱ्हाण्यांमुळे उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी वर्ग मात्र पुरता हैराण झाला आहे.या वर्षी न्यायालयाच्या आदेशामुळे एकही प्रवेश आॅफलाइन पद्धतीने करणार नाही, अशी भूमिका शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी स्पष्ट केली आहे. मात्र चुकीचा अर्ज भरल्याने दोन्ही गुणवत्ता यादीत नाव न आलेले विद्यार्थी थेट उपसंचालक कार्यालयाकडे धाव घेत आहेत. याशिवाय पहिल्या यादीत नाव आल्यानंतरही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थीही प्रवेशासाठी कार्यालयात येत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.मुळात अपूर्ण प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चौथ्या गुणवत्ता यादीच्या रूपात किंवा समुपदेशन फेरीच्या रूपात १५ जुलैनंतर मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ५० हजारहून अधिक जागाही उपलब्ध आहेत. मात्र पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून पालक विद्यार्थ्यांसोबत उपसंचालक कार्यालयात गर्दी करीत आहेत. त्यात अधिक संख्या ही पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयांत प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांची आहे. कारण हे विद्यार्थी गुणवत्ता असतानाही प्रवेश प्रक्रियेबाहेर पडलेले आहेत. त्यामुळे अपूर्ण अर्ज भरलेल्या आणि गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांनी १५ जुलैपर्यंत कार्यालयात येऊ नये, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)यांमधील बहुतांश विद्यार्थी उपसंचालक कार्यालयात येत आहेत...- ८२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज अपूर्ण भरला.- २२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज पूर्ण भरला, मात्र तो कन्फर्म करून अप्रूव्ह केला नाही.- ३ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला, मात्र तो कन्फर्म केल्यानंतर अप्रूव्ह केला नाही.- १ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून कन्फर्म करून अप्रूव्ह केला, मात्र पसंतीक्रम अर्ज अपूर्ण भरला.- १ हजार १२७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज पूर्ण भरला, मात्र तो कन्फर्म करून अप्रूव्ह केला नाही.म्हणून आॅफलाइन प्रवेशाचा गोंधळकल्याणच्या एका विद्यार्थिनीला 98%गुण मिळाले होते. मात्र प्रवेश अर्ज चुकीचा भरल्याने ती आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडली होती. एका गुणवंत विद्यार्थिनीचे नुकसान होऊ नये, म्हणून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण उपसंचालकांना संबंधित विद्यार्थिनीला प्रवेश मिळवून देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणानंतर प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेले बहुतेक विद्यार्थी प्रवेशाची अपेक्षा घेऊन कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आले.