शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दिवाळी सण आहे; वातावरण बिघडू देऊ नका - मुख्यमंत्री; भुजबळ, देसाई यांना दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 07:01 IST

मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेले असतानाच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. यावरून शिंदे गटातील मंत्री आणि भुजबळ यांच्यात जुंपली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांची विशेष बैठक घेत परस्परविरोधी, सरकारविरोधी विधाने करून वातावरण चिघळवू नका, दिवाळी सण आहे तेव्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कोणतीही वक्तव्ये करू नका, अशी समज मंत्री भुजबळ आणि मंत्री शंभूराज देसाई यांना दिली. 

भुजबळ यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे व सरकारच्याच भूमिकेवर शंका उपस्थित केली. शिंदे समितीकडून आलेले आकडे व सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या आकडेवारीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे बैठकीनंतर मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, शंभूराज देसाई, हसन मुश्रीफ, संदीपान भुमरे, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

शंभूराज देसाई काय म्हणाले? कॅबिनेट निर्णय झाला असताना भुजबळ विनाकारण वातावरण बिघडवताहेत. त्या मंत्रिमंडळ बैठकीला ते स्वत: होते. वंशावळीत ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे. सरसकट आरक्षण देत नाही आहोत, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे असताना बाहेर सरकार विरोधात कशाला वक्तव्य करीत आहेत, अशी भूमिका शंभूराज देसाई यांनी मांडली. 

भुजबळ काय म्हणाले?  माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे घर जाळण्यात आले. ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे. हे सर्व पाहिल्यानंतर मी उद्वेग व्यक्त केला. सध्या राज्यभरात जे वातावरण आहे आणि आरक्षणावरून जो असंतोष पसरत आहे, ते लोक पाहत आहेत. हे वातावरण असेच कायम राहिले तर लोक नक्कीच विचार करतील, याअनुषंगाने मी विधान केले, असे भुजबळ म्हणाले.   

...तर आमरण उपोषण करू : पंकजा मुंडे बीड : ओबीसी व मराठा समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न होत असेल तर होऊ देणार नाही. परंतु, हिंसक घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणत्याही वर्गाला अस्वस्थ करू नये. हिंसाचाराच्या घटना पुन्हा घडल्या तर आम्ही आमरण उपोषण करू, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यास आमचा पाठिंबा आहे. परंतु जे जन्मतःच मागास आहेत, इतर मागासवर्गीय आहेत, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला संविधान मार्गाने टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.  

ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हानमुंबई : ओबीसींच्या आरक्षणाच्या टक्क्यांत वाढ करण्यासंदर्भातील १९९४चा अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर उत्तर देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला अखेरची संधी दिली. यापुढे संधी देण्यात येणार नाही, असेही न्यायालयाने बजावले. तसेच १० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकार व मागासवर्ग आयोगाला बुधवारी दिले. याचिकेवरील पुढील सुनावणी ३ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. राज्य सरकारच्या २३ मार्च १९९४च्या अध्यादेशाला व्यवसायाने वकील असलेले बाळासाहेब सराटे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवठेकर व प्रशांत भोसले यांनी आव्हान दिले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChagan Bhujbalछगन भुजबळShambhuraj Desaiशंभूराज देसाई