शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मराठी मतांची विभागणी भाजपाला फायदेशीर

By admin | Updated: October 10, 2014 05:32 IST

अवघ्या पाच दिवसांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली आहे. प्रचारासाठी तर अवघे तीन दिवस शिल्लक आहेत.

अवघ्या पाच दिवसांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली आहे. प्रचारासाठी तर अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. अशावेळी मुंबई उपनगरातील २६ जागांसाठी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मनसेत अक्षरश: हातघाईच्या लढाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार जिवाचा आटापिटा करीत आहेत. पक्षाचे स्टार प्रचारक, खासदार आणि सेलिब्रेटी प्रचारफेऱ्या आणि सभांमध्ये दिसू लागले आहेत.विद्यमान जागा राखण्यासाठी काँग्रेस उमेदवार जंगजंग पछाडत असताना पुनरागमनासाठी शिवसेना उमेदवारांनी कंबर कसली आहे. तर, गुजराती मतांच्या भरोशावर मुंबईतील सामर्थ्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपा नेत्यांची धडपड आहे. गेल्या वेळी उपनगरात ११ ठिकाणी काँग्रेस विजयी झाली. शिवसेना, भाजपा आणि मनसेला प्रत्येकी ४ जागांवर यश मिळाले. २ जागांवर राष्ट्रवादी आणि शिवाजीनगर मानखुर्द येथे अबू आझमींच्या रूपात सपाला १ जागा मिळाली. उपनगर असो अथवा महानगर राष्ट्रवादीचे अस्तित्व तसेही औषधापुरतेच असल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि मनसे अशीच चौरंगी लढत येथे रंगू लागली आहे. उमेदवारांचा व्यक्तिगत जनसंपर्क, परंपरागत मतदारांवर काँग्रेसची मदार आहे. स्वाभाविकपणे शिवसेना व मनसेने मराठी मतांच्या आशेवर आपली राजकीय गणिते मांडली आहेत. तर, गुजराती मतांवर भाजपाचा डोळा आहे. बिगर मराठी मतदारांचा पाठिंबा आणि मराठी मतातील विभाजनाने गेल्या वेळी काँग्रेसने यशाला गवसणी घातली. पण, लोकसभेतील मोदी लाटेने सारी समीकरणे बिघडून टाकली आहेत. गुजराती मते पूर्णपणे भाजपाकडे वळली आहेत. तर युती तुटल्याने उत्तर भारतीय मतांची बेरीजही भाजपासाठी आशादायी आहे. या बेरजेच्या गणिताचा फटका बसू नये यासाठी काँग्रेस उमेदवारांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. पण, विद्यमान संख्याबळ कायम राखताना मात्र काँग्रेसची दमछाक होणार आहे. राज ठाकरेंच्या सभांच्या आधारे वातावरण बदलण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. राज यांच्या सभांमुळे मनसेचे इंजिन ट्रॅकवर येत असल्याचे चित्र असले तरी २००९ प्रमाणे मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाही. मनसेसमोर आहे त्या जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे. विकासाचा मुद्दा रेटतानाच गुजराती आणि उत्तर भारतीय राजकारणावर राज ठाकरेंचा आसूड फुटत आहे. विकासाचे आश्वासन आणि मराठी अस्मितेच्या आधारे आपली मते राखण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. पण, भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने जाणीवपूर्वक मुंबईच्या गुजरातीकरणाचा मुद्दा लावून धरल्याने आता मराठी मतदारांचीच कोंडी झाल्याचे चित्र आहे. पण, भाजपावरील टीकेच्या आधारे मराठी मते राखण्यात शिवसेना काही प्रमाणात यशस्वी होण्याची शक्यता आहे.