शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात टोल बसवू देणार नाही

By admin | Updated: June 25, 2015 23:28 IST

नारायण राणे : कणकवली येथे मच्छिमार्केटचा प्रारंभ

कणकवली : कणकवली शहर राज्यात नावारूपाला येण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. येथे अद्ययावत मच्छीमार्केट उभारून लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली आहे. यापुढेही क्रीडांगण, उद्यान असे समाजोपयोगी प्रकल्प उभारले जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर कोणत्याही परिस्थितीत शासनाला टोल लावू देणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.येथील नगरपंचायतीच्यावतीने पटकीदेवी मंदिराशेजारी अद्ययावत मच्छीमार्केट उभारण्यात आले आहे. या मच्छीमार्केटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, उपनगराध्यक्ष समीर नलावडे, ज्येष्ठ व्यापारी सुरेश कामत, विजयकुमार वळंजू, भाई खोत, प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, नागरिकांना १८ नागरी सुविधा देण्यासाठी नगरपंचायत आहे, याचे भान नगरसेवकांनी ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पहिले सुसज्ज मच्छीमार्केट येथे उभारण्यात आले असून स्वच्छतेबरोबरच त्याची चांगली निगा राखणे हे सर्वांचे काम आहे. भेसळयुक्त भाज्या, फळे नागरिकांपर्यंत जाऊ नयेत यासाठी नगरपंचायतीने प्रयत्न करावेत. नागरिकांनी नगरसेवकांवर अंकुश ठेवण्याबरोबरच त्यांना सहकार्यही केले पाहिजे. शहरातील नागरिक निरोगी राहतील यादृष्टीने नगरपंचायतीने प्रयत्न करावेत. शहराची गरज असलेले क्रीडांगण तसेच उद्यानाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल असेही ते म्हणाले.नीतेश राणे म्हणाले, जिल्ह्यातील राजकारण सध्या ज्या दिशेने जात आहे ते पाहता नारायण राणे यांच्यासारखे राजकीय इच्छाशक्ती असलेलेच नेते येथे असणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्याच्या विकासाचा प्रवास अंधाराच्या दिशेने चालला आहे. नारायण राणे पालकमंत्री असताना विकासाला त्यांनी दिशा दिली होती. मात्र, आता त्या विरूद्ध परिस्थिती आहे. सध्याचे पालकमंत्री पालक नसून मालक बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्हा नियोजन समितीसाठी निधी, महामार्ग चौपदरीकरण, आंबा बागायतदार तसेच मच्छीमारांचे प्रश्न यासाठी आम्हाला भांडावे लागत आहे. शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. यावर सत्ताधारी कोणतीही उपाययोजना करीत नाहीत. टीका करणे सोपे असते. मात्र, विकास करण्यासाठी दूरदृष्टी लागते. कणकवली हे आदर्श शहर बनविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शहर विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी लवकरच खासगी सल्लागार नियुक्त करण्यात येईल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करूनच पुढील निवडणुकीत आम्ही मते मागायला येऊ. नीलेश राणे म्हणाले, कणकवली शहरातील ५८ आरक्षणे विकसित केली तरी शहरातील अनेक समस्या सुटणार आहेत. हे शहर माझं आहे या भावनेतून नागरिक तसेच नगरसेवकांनी विकासासाठी प्रयत्न करावेत. चौफेर विकास होणे आवश्यक असून त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. राणे कुटुंबीय महाराष्ट्रात मानानेच राहिले असून मानानेच मरणार आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका करताना याचा विचार करावा. संदेश पारकर, भाई खोत, सुरेश कामत, जगन्नाथ सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी मानले. सावंतवाडी येथील मृगेश पालव या विद्यार्थ्याने आपले मत यावेळी मांडले. (वार्ताहर)पालकमंत्री आहे हे का सांगावे लागते?लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून दिला तरच विकास होतो. हे मच्छीमार्केट तत्कालीन खासदार नीलेश राणे यांच्यामुळेच होऊ शकले आहे. आताचे पालकमंत्री फक्त श्रेय घेण्यासाठीच असून त्यांचा कोणताही अभ्यास नाही. त्यांना मी पालकमंत्री आहे असे वारंवार का सांगावे लागते? गेल्या पंचवीस वर्षांत आम्ही जे काम केले त्याच्या एक टक्का तरी त्यांनी केले का? याचा प्रथम विचार करावा आणि त्यानंतरच टीका करावी. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज, विमानतळ असे जनतेच्या हिताचे प्रकल्प आम्ही आणले आहेत. शिवसेना-भाजपावाल्यानी असे एक तरी विधायक काम करून दाखवावे त्यानंतरच टीका करावी. गेले काही दिवस मी शांत होतो. मात्र, आता जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले.जमीन मालकांचा सत्कार मच्छिमार्केटसाठी जमीन देणाऱ्या खेमाजी राणे, जगन्नाथ सावंत तसेच वास्तूरचनाकार देशपांडे, पांगम, ठेकेदार रामदास विखाळे, रघु नाईक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.