शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

देशाच्या पटलावर ‘पालघर’ बनणार हटके जिल्हा

By admin | Updated: August 2, 2014 23:00 IST

अरबी समुद्राच्या कवेत, सह्याद्रीच्या छायेत, विविधतेने, विपुलतेने नैसर्गिक साधन संपत्तीने बहरलेला नवनिर्मित पालघर जिल्हा देशाच्या पटलावर एक वेगळे स्थान मिळविणार आहे.

आशिष पाटील - केळवे-माहीम
अरबी समुद्राच्या कवेत, सह्याद्रीच्या छायेत, विविधतेने, विपुलतेने नैसर्गिक साधन संपत्तीने बहरलेला नवनिर्मित पालघर जिल्हा देशाच्या पटलावर एक वेगळे स्थान मिळविणार आहे. या पटलावरील त्याचे स्थान ‘सबसे हटके’ रहाणार हे निश्चित आहे.
आजपासून राज्याच्या नकाशात पालघर या नवीन जिल्हय़ाचा आलेख चढणार आहे. देशात, राज्यात अनेक जिल्हे आहेत, मात्र या जिल्हय़ाची भौगोलिक, नैसर्गिक परिस्थिती तसेच बलस्थाने पहाता देशातील वेगळा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला नक्कीच महत्त्व मिळेल. पश्चिमेला अरबी समुद्राचे लांब विस्तृत किनारे, त्यावर चालणारा मासेमारी व्यवसाय, पर्यटन व्यवसाय, पूर्वेला सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा, त्यावर वसलेली घनदाट जंगले, दक्षिणोला वैतरणा, भाईंदरसारख्या खाडय़ा तर उत्तरेला गुजरातला चिरणा:या डहाणू, झाईसारख्या खाडय़ा अशी निसर्गाची देणगी घेऊन आलेला हा जिल्हा ज्याचा भूगोल पहाता कोणीही मोहीत होऊन जाईल.
या जिल्हय़ात विपुल पाण्याचे स्त्रोत, सुजलाम सुफलाम वसुंधरा, विविधतेने नटलेली वनराई, विविध पिकांची, विविध फळाफुलांची देण लाभलेली आहे. जवळच्या शहरी संस्कृतीची दरुगधी आहे, परंतु ग्रामीण संस्कृतीचा ओलावाही या जिल्ह्याने जपला आहे. ज्या ठिकाणी राम - लक्ष्मणाच्या काळातील देवस्थाने, रामकुंडे अजूनही जपून आहेत, तर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारे बुरुज, बाणकोट किल्लेही जपून आहेत, तसेच लाल फिरंग्याच्या अन्यायाविरोधात बलिदान केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्मारकेही येथे जतन केली जात आहेत. 
विकासासाठी मागे वळून पहाण्याची अजिबात भीती नाही. फक्त दु:ख एवढेच की वाडा, विक्रमगड, जव्हारसारखी आजची आदिवासी भावंडे दु:खी आहेत. परंतू ‘सब्र का फल मिठा होता है’. त्याचाही कायापालट होणार आहे. कारण आमचा पालघर जिल्हा ‘सबसे हटके’ बनणार आहे.
 
पर्यटनात नेहमीच आघाडीवर
4देशातील प्रगतीचा इतिहास घडविणारा डॉ. होमी भाभा यांच्या आजोळातील पहिला तारापूर अणुशक्ती प्रकल्प असो किंवा आशियातील सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत ही याच जिल्हय़ात आहे. सूर्यासारखे मोठे जलस्त्रोत या ठिकाणी आहेत. निसर्ग कवीच्या दृष्टीतील कॅलिफोर्निया किंवा पर्यटकांच्या मनातील केरळचे स्वपA केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील केळवा-माहीमच्या नारळी पोकळीच्या बागामध्ये विस्तृत समुद्र किना:यावर साकारता येते. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक विस्तृत पश्चिम रेल्वे राष्ट्रीय महामार्ग 8 याच जिल्हय़ातून जातो, तर विकासाची गंगा जेथे ओथंबून वाहते असे मुंबई, गुजरातसारखे दोन भाऊ शेजारीच आशेने उभे आहेत.