शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

देशाच्या पटलावर ‘पालघर’ बनणार हटके जिल्हा

By admin | Updated: August 2, 2014 23:00 IST

अरबी समुद्राच्या कवेत, सह्याद्रीच्या छायेत, विविधतेने, विपुलतेने नैसर्गिक साधन संपत्तीने बहरलेला नवनिर्मित पालघर जिल्हा देशाच्या पटलावर एक वेगळे स्थान मिळविणार आहे.

आशिष पाटील - केळवे-माहीम
अरबी समुद्राच्या कवेत, सह्याद्रीच्या छायेत, विविधतेने, विपुलतेने नैसर्गिक साधन संपत्तीने बहरलेला नवनिर्मित पालघर जिल्हा देशाच्या पटलावर एक वेगळे स्थान मिळविणार आहे. या पटलावरील त्याचे स्थान ‘सबसे हटके’ रहाणार हे निश्चित आहे.
आजपासून राज्याच्या नकाशात पालघर या नवीन जिल्हय़ाचा आलेख चढणार आहे. देशात, राज्यात अनेक जिल्हे आहेत, मात्र या जिल्हय़ाची भौगोलिक, नैसर्गिक परिस्थिती तसेच बलस्थाने पहाता देशातील वेगळा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला नक्कीच महत्त्व मिळेल. पश्चिमेला अरबी समुद्राचे लांब विस्तृत किनारे, त्यावर चालणारा मासेमारी व्यवसाय, पर्यटन व्यवसाय, पूर्वेला सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा, त्यावर वसलेली घनदाट जंगले, दक्षिणोला वैतरणा, भाईंदरसारख्या खाडय़ा तर उत्तरेला गुजरातला चिरणा:या डहाणू, झाईसारख्या खाडय़ा अशी निसर्गाची देणगी घेऊन आलेला हा जिल्हा ज्याचा भूगोल पहाता कोणीही मोहीत होऊन जाईल.
या जिल्हय़ात विपुल पाण्याचे स्त्रोत, सुजलाम सुफलाम वसुंधरा, विविधतेने नटलेली वनराई, विविध पिकांची, विविध फळाफुलांची देण लाभलेली आहे. जवळच्या शहरी संस्कृतीची दरुगधी आहे, परंतु ग्रामीण संस्कृतीचा ओलावाही या जिल्ह्याने जपला आहे. ज्या ठिकाणी राम - लक्ष्मणाच्या काळातील देवस्थाने, रामकुंडे अजूनही जपून आहेत, तर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारे बुरुज, बाणकोट किल्लेही जपून आहेत, तसेच लाल फिरंग्याच्या अन्यायाविरोधात बलिदान केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्मारकेही येथे जतन केली जात आहेत. 
विकासासाठी मागे वळून पहाण्याची अजिबात भीती नाही. फक्त दु:ख एवढेच की वाडा, विक्रमगड, जव्हारसारखी आजची आदिवासी भावंडे दु:खी आहेत. परंतू ‘सब्र का फल मिठा होता है’. त्याचाही कायापालट होणार आहे. कारण आमचा पालघर जिल्हा ‘सबसे हटके’ बनणार आहे.
 
पर्यटनात नेहमीच आघाडीवर
4देशातील प्रगतीचा इतिहास घडविणारा डॉ. होमी भाभा यांच्या आजोळातील पहिला तारापूर अणुशक्ती प्रकल्प असो किंवा आशियातील सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत ही याच जिल्हय़ात आहे. सूर्यासारखे मोठे जलस्त्रोत या ठिकाणी आहेत. निसर्ग कवीच्या दृष्टीतील कॅलिफोर्निया किंवा पर्यटकांच्या मनातील केरळचे स्वपA केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील केळवा-माहीमच्या नारळी पोकळीच्या बागामध्ये विस्तृत समुद्र किना:यावर साकारता येते. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक विस्तृत पश्चिम रेल्वे राष्ट्रीय महामार्ग 8 याच जिल्हय़ातून जातो, तर विकासाची गंगा जेथे ओथंबून वाहते असे मुंबई, गुजरातसारखे दोन भाऊ शेजारीच आशेने उभे आहेत.