शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

राज्यातील ७३ हजार विद्यार्थ्यांना ७० कोटींची शिष्यवृत्ती, सारथी शिष्यवृत्तीचे वितरण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:58 IST

कोल्हापूर : राज्यातील मराठा , कुणबी, कुणबी मराठा , मराठा कुणबी ७३ हजार विद्यार्थ्यांना तब्बल ७० कोटी ८ लाख ...

कोल्हापूर : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी ७३ हजार विद्यार्थ्यांना तब्बल ७० कोटी ८ लाख रुपयांच्या छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यापासूनची शिष्यवृत्तीची आणि लाभार्थ्यांचीही सर्वाधिक रक्कम व संख्या आहे.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी एन.एम.एम.एस. म्हणजेच शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेण्यात येते. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ‘सारथी’कडून ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. एन.एम.एम.एस.ची शिष्यवृत्ती निवडक गुणवंतांनाच मिळते. परंतु, ही परीक्षा उत्तीर्ण होणारे गुणवत्तापूर्णच असतात. त्यांना पाठबळ देण्यासाठी ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे.यामध्ये ९वी ते १२वीपर्यंत नियमित शिक्षण घेणाऱ्या अनुदानित विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या तसेच केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ९ हजार ६०० रुपये असे चार वर्षांत एकूण ३८ हजार रुपये देण्यात येतात.

सन २०२४/२५ या वर्षामध्ये आतापर्यंत या शिष्यवृत्तीसाठी राज्यातून ९वी ते १२वीच्या ७३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यातील अर्ज मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या सर्वांना ७० कोटी ८ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत. त्यातील ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, अमरावती, वर्धा, नाशिक, चंद्रपूर व नांदेड या दहा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना आतापर्यंत २ कोटी ६४ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरणही करण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यातील वितरण लवकरच करण्यात येणार आहे.सन - विद्यार्थी संख्या - वितरित शिष्यवृत्तीसन २०२१/२२ - १०,४१४ - ९ कोटी ९९ लाख ७४ हजार रुपयेसन २०२२/२३ - २२.३०० - २१ कोटी ४० लाख ८० हजार रूपयेसन २०२३/२४ - ४४.१०५ - ४२ कोटी ३४ लाख ८ हजार रूपयेसन २०२४/२५ - ७३,००० - ७० कोटी ८ लाख रूपये

या शिष्यवृत्तीमुळे या गटातील विद्यार्थ्यांचा एनएमएमएस परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षण कार्यालयातील अधिकाऱ्यांचे सुयोग्य प्रयत्न, प्रोत्साहन यामुळे परीक्षेतील यशाचा टक्का वाढत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. - किरण कुलकर्णी सहव्यवस्थापकीय संचालक सारथी, उपकेंद्र कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीmarathaमराठा