शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गृहनिर्माण धोरणाबाबत लोकप्रतिनिधींची अनास्था

By admin | Updated: June 9, 2015 02:59 IST

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणाबाबत आपले अभिप्राय व सूचना देण्याकरिता महिनाभराची मुदत देऊनही जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकप्रतिनिधींनी आपले मत नोंदवले आहे.

संदीप प्रधान. मुंबईराज्यातील भाजपाप्रणीत सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणाबाबत आपले अभिप्राय व सूचना देण्याकरिता महिनाभराची मुदत देऊनही जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकप्रतिनिधींनी आपले मत नोंदवले आहे. सचिवांनीही या धोरणाबाबत फारसे ममत्व दाखवलेले नाही.राज्याच्या गृहनिर्माण धोरणाचा मसुदा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेचे २८८ तर विधान परिषदेचे ७८ सदस्य तसेच ४८ खासदार यांना पाठवला होता. ८ मेपासून महिन्याभरात त्यांनी गृहनिर्माण विभागाकडे आपले अभिप्राय व सूचना सादर करणे अपेक्षित होते. पण आमदार, खासदार व सचिव यांनी याबाबत उदासिनता दाखवल्याने अगदी मोजक्या सूचना प्राप्त झाल्या. गृहनिर्माण विभागाने सांगितले की, केवळ आमदार नितेश राणे यांनी आपले म्हणणे आमच्याकडे सादर केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात गृहनिर्माण विभागाचा कार्यभार पाहणारे सचिव प्रविण दराडे यांच्या कार्यालयाकडे काही सूचना आल्या आहेत किंवा कसे याबाबत विचारणा केली असता तेथेही आमदार अथवा खासदार यांनी सूचना केल्या नसल्याचे सांगण्यात आले. काही लोकप्रतिनिधींनी थेट दराडे यांच्याकडे आपल्या सूचना पाठवल्या असल्यास त्याची आम्हाला कल्पना नाही, असे त्यांच्या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत प्रविण दराडे यांच्याशी संपर्क साधण्याकरिता त्यांना वारंवार दूरध्वनी केले व संदेश पाठवले. मात्र ते प्रतिक्रियेला उपलब्ध झाले नाहीत.प्रकाश मेहता यांच्या कार्यालयाकडेही याबाबत विचारणा केली असता आमच्याकडे कुठलीही सूचना आलेली नाही, असे सांगण्यात आले. गृहनिर्माण हा तसा सदस्यांच्या जिव्हाळ््याचा विषय आहे. अनेकदा पुनर्विकास योजना, बिल्डर व रहिवाशी यांच्यातील वाद याबाबत सदस्यांकडून लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र या सर्व समस्यांचे मूळ असलेल्या धोरणाच्या निश्चितीबाबत लोकप्रतिनिधी किती बेदरकरीने वागतात याचे हे उदाहरण असल्याचे मानले जात आहे.