शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

महासत्तेचे स्वप्न पेरणारे नेतृत्व हरपले

By admin | Updated: July 29, 2015 02:14 IST

भारत २०२०पर्यंत जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न पेरणारा महान वैज्ञानिक देशाने गमावला आहे. एक पे्ररणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, या शब्दांत माजी राष्ट्रपती

मुंबई : भारत २०२०पर्यंत जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न पेरणारा महान वैज्ञानिक देशाने गमावला आहे. एक पे्ररणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, या शब्दांत माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कलाम आणि ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा.सू. गवई यांना श्रद्धांजली वाहून विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि एमआयएमचे इम्तियाज जलिल आणि अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.मुख्यमंत्री म्हणाले की, आज देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असताना डॉ. कलाम आपल्यातून निघून जावेत ही शोकांतिका आहे. आपल्या देशात युवक शक्तीची ताकद ओळखून त्याचा लाभ कशा रीतीने घेतला पाहिजे याची उत्तम जाणीव त्यांना होती. भारत हा तरुणाईने समृद्ध देश होणार हे ओळखून युवाशक्तीला मनुष्यबळात परावर्तित केल्यास देश जागतिक महासत्ता होऊ शकतो, असा त्यांचा विश्वास होता. रिपब्लिकन पार्टीचे नेते, विधान परिषदेचे माजी सभापती आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या निधनाने राज्याच्या समतावादी चळवळीचा प्रमुख आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला असून, आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी झालेय.वाचन पे्ररणा दिवसडॉ. कलाम यांचे लेखन पे्ररणादायी होते आणि त्यांना वाचनाचा छंद होता. त्यांची स्मृती सदैव राहावी यासाठी राज्यातील शाळा-महाविद्यालयांमधून त्यांचा जयंती दिन (१५ आॅक्टोबर) हा ‘वाचन पे्ररणा दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.स्मृतिदिन बालविज्ञान दिनएपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन राज्य शासनाने ‘बालविज्ञान दिवस’ म्हणून घोषित करावा, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी केली. कलाम आणि रा.सू. गवई यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला त्या वेळी सभापती बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, प्रा. जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील, जनार्दन चांदूरकर यांची या वेळी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करणारी भाषणे झाली.