शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पुरवठा योजनेच्या सर्व समित्या बरखास्त करणार

By admin | Updated: July 23, 2015 01:31 IST

राज्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्या बरखास्त करण्यात येतील, तसेच राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबतचा अभ्यास

मुंबई : राज्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्या बरखास्त करण्यात येतील, तसेच राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबतचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय तांत्रिक समिती नियुक्त करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित पेयजल योजनांच्या कामाबाबतचा आमदार किशोर पाटील, संजय सावकारे, दिलीप वळसे-पाटील, गणपतराव देशमुख, गुलाबराव पाटील, मधुकर चव्हाण, शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. फडणवीस म्हणाले की पाणीपुरवठा योजनांमध्ये ग्राम समित्यांना अधिकार दिल्याने याबाबत अनेक त्रुटी दिसून येत आहेत. पाणीपुरवठा योजनेत लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांच्या सर्व समित्या बरखास्त करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच या योजनेंतर्गत नवीन समिती स्थापन करीत असताना धोरणात्मक सूचनांचा विचार करून आवश्यक ते फेरबदल करण्यात येईल. याशिवाय पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू राहावी यासाठी या समितीत तांत्रिक अभियंत्याला सामावून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलताना सांगितले. केंद्रामार्फत नवीन पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला नव्या योजना हाती घेण्यापूर्वी जुन्या योजना पूर्ण कराव्यात, असे आदेश दिले आहेत. तसेच नवीन योजना घेतल्यास सदर योजना सन २०१७ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे कळविले आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी राज्य शासनामार्फत सकारात्मक पावले उचलली जातील, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.