शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
2
शिक्षकांच्या छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रोसमोर उडी; सुसाइड नोटमध्ये ४ शिक्षिका व मुख्याध्यापकांचे नाव
3
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
4
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
5
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
6
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
7
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
8
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
9
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
10
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
11
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
12
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
13
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद
14
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
15
"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
16
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
17
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
18
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
19
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
20
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनात ठरावांवर अंमल न होणे हा साहित्यिकांचा अपमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 23:59 IST

संमिश्र प्रतिक्रिया : सीएए, डिटेन्शन कॅम्प, जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ भूमिकेची मागणी

जान्हवी मोर्येडोंबिवली : उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सीएए कायदा, जेएनयूमधील तरुणांना झालेली मारहाण वगैरे विषयांवर निषेधाचे ठराव करावेत, यावरून वादळ उठले आहे. मात्र, केवळ संमेलनात ठराव करून काय उपयोग, असा सवाल करतानाच सरकार जर साहित्यिकांनी केलेले ठराव गांभीर्याने घेऊन त्यावर अंमलबजावणी करणार नसेल, तर असे ठराव करून काय उपयोग, असा सूर काही साहित्यिक व रसिकांनी लावला आहे, तर काही वादविषयांवर साहित्यिकांनी संमेलनाच्या व्यासपीठावर ठोस भूमिका घेतली, हा संदेश लोकांपर्यंत नेण्यासाठी ठराव गरजेचे असल्याचे साहित्यिकांचे म्हणणे आहे.

संमेलनातील ठराव म्हणजे साहित्यिकांचा विचार असतो. पण, त्या ठरावांकडे गांभीर्याने न पाहणे हा साहित्यिकांचा अपमान असल्याची टीका कल्याणमधील साहित्यप्रेमी भिकू बारस्कर यांनी केली आहे. उस्मानाबाद येथील संत गोरोबा काकांच्या नगरीत ९३ वे साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात नागरिकत्व सुधारणा कायदा, जनगणनेत विविध प्रकारचे २५ प्रश्न विचारले जाणे व नागरिकत्व सिद्ध न होणाऱ्यांची डिटेन्शन कॅम्पमध्ये रवानगी करणे, शिवाय जेएनयूमधील विद्यार्थ्यांना झालेली मारहाण या सर्व घटनांच्या व धोरणांच्या निषेधार्थ ठराव झाला पाहिजे का, याबाबत विचारणा केली असता साहित्यप्रेमींनी ठरावाचे काही होत नसल्याची खंत व्यक्त केली.

संमेलनात एखाद्या विषयावर ठराव येतो, तेव्हा त्याचा प्रभाव पडायला हवा. ठराव प्रभावी होत नसल्याने पुढे कार्यवाही होत नाही. त्यामुळे ठरावाची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी. संमेलनातील ठरावांचा सरकारने गांभीर्याने विचार केल्यास साहित्यिकांचा मान राखला जाईल, असे बारस्कर यांनी सांगितले.‘जेएनयूच्या घटनेचा ठराव हा योग्यच’ज्येष्ठ कवी राजीव जोशी यांनी सांगितले की, जेएनयूमधील विद्यार्थ्यांना मारहाण झाली, ही चुकीची गोष्ट आहे. त्यांचा निषेध झालाच पाहिजे. पण, नेमकी ही मारहाण कोणी केली, ते पाहावे. कदाचित, त्यामागे परकीय शक्तीचा हात असू शकतो. संमेलनात याच्या निषेधार्थ ठराव झाल्यास चांगले आहे, पण आपल्याकडे अनेक प्रश्नांवर ठराव होतात, पण त्यांचे पुढे काहीच होत नाही.चुकीचे उघड होईल!दीपाली काळे म्हणाल्या की, सध्या ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या चांगल्याच आहेत. जनगणनेसाठी जास्त प्रश्न विचारणार, त्यामुळे कोठे अवैध धंदे सुरू असल्यास माहिती मिळणार आहे. मग, या प्रश्नांच्या निषेधार्थ संमेलनात ठराव करण्याचा प्रश्नच येत नाही.चुकीचे निर्णय, कृतीविरोधात ठराव हवेच!अमरेंद्र पटवर्धन म्हणाले, जेएनयू विद्यार्थी असोत किंवा कुठेही आणि कोणावरही हल्ला हा नक्कीच निषेधार्थ आहे. सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, हिंसक कृत्य करणे यांचा निषेध नक्कीच झाला पाहिजे. नागरिक संरक्षण कायदा हा विषय प्रथम नीट समजून घेतला पाहिजे. अनेकांना त्याची नक्की माहिती नाही. अर्धवट माहितीच्या आधारे उगाच वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी अनुचित कृत्ये घडवणे हे निषेधार्ह आहे. चुकीचे निर्णय व कृती याच्या निषेधाचे ठराव साहित्य संमेलनात झाले, तर उत्तम होईल कारण साहित्य संमेलन हे खूप मोठे व्यासपीठ आहे.

टॅग्स :jnu attackजेएनयू