शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

By admin | Updated: January 16, 2017 03:13 IST

शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये युत्या, आघाड्यांसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच

आविष्कार देसाई,

अलिबाग- रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला अथवा दोन्ही पक्षांना एकत्र येऊनही सत्ता काबीज करता येणार नाही. यासाठीच शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये युत्या, आघाड्यांसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच आहे. राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट झालेली नसल्याने त्या त्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.२१ फेब्रुवारी रोजी ५९ रायगड जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समितींच्या जागांसाठी निवडणुका होत आहेत. रायगड जिल्हा परिषदेने सुमारे १०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करुन अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. जिल्हा परिषदेला राज्यासह केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी कोट्यवधींंचा निधी येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेतील तिजोरीच्या चाव्या आपल्याचकडे राहाव्यात, असे सर्वच पक्षांना वाटते. परंतु प्रत्येक राजकीय पक्षांची ताकद कमी-अधिक असल्याने त्यांना युती, आघाडीशिवाय पर्याय नाही.सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २० जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर कर्जत, रोहे, तळा, माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन या सहा पंचायत समिती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्या खालोखाल शेकापकडे १९ जिल्हा परिषद सदस्य आणि अलिबाग, पेण, पनवेल, मुरुड, पाली या पाच पंचायत समितीवर लाल बावटा फडकला आहे. शिवसेनेकडे १४ जिल्हा परिषद सदस्य, उरण, खालापूर, महाड आणि पोलादपूर या चार पंचायत समितींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. भाजपा आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य आहे.रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे, तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. त्यामुळे ते चांगल्याच मजबूत स्थितीमध्ये आहेत. त्यांची काही जागांवर बोलणी अद्यापही सुरु आहेत. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे यांचा मतदार संघ संपुष्टात आल्याने त्यांना शेकापच्या ताब्यातील खांडस मतदार संघ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. परंतु शेकाप तो मतदार संघ देण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येते. त्यामुळे टोकरे यांना कोठून उमेदवारी द्यायची याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.जिल्हा परिषदेवर एका पक्षाची सत्ता येणे सोडाच पण दोन पक्षांनाही कठीण जाणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू स्थिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये काँग्रेसलाही सामावून घेण्याबाबत प्रदेश पातळीवर बोलणी सुरु आहेत. याला राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनीही ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. स्थानिक पातळीवरील राजकारणाला वेग स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जाण्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते इच्छुक आहेत. परंतु अद्यापही वरिष्ठ स्तरावरुन युती, आघाडीबाबत आदेश आलेले नाहीत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत यांनी सांगितले. भाजपाची जिल्ह्यामध्ये ताकद नसल्याने त्यांच्या युतीबाबत अद्याप हे स्पष्ट केलेले नाही.शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी अलिबाग आणि पेण तालुक्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना अशी मोट बांधण्यात आली आहे. त्या दिशेने दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. अन्य ठिकाणीही युती करण्याबाबत शिवसेना प्रयत्न करीत आहे.