शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

By admin | Updated: January 16, 2017 03:13 IST

शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये युत्या, आघाड्यांसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच

आविष्कार देसाई,

अलिबाग- रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला अथवा दोन्ही पक्षांना एकत्र येऊनही सत्ता काबीज करता येणार नाही. यासाठीच शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये युत्या, आघाड्यांसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच आहे. राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट झालेली नसल्याने त्या त्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.२१ फेब्रुवारी रोजी ५९ रायगड जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समितींच्या जागांसाठी निवडणुका होत आहेत. रायगड जिल्हा परिषदेने सुमारे १०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करुन अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. जिल्हा परिषदेला राज्यासह केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी कोट्यवधींंचा निधी येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेतील तिजोरीच्या चाव्या आपल्याचकडे राहाव्यात, असे सर्वच पक्षांना वाटते. परंतु प्रत्येक राजकीय पक्षांची ताकद कमी-अधिक असल्याने त्यांना युती, आघाडीशिवाय पर्याय नाही.सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २० जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर कर्जत, रोहे, तळा, माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन या सहा पंचायत समिती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्या खालोखाल शेकापकडे १९ जिल्हा परिषद सदस्य आणि अलिबाग, पेण, पनवेल, मुरुड, पाली या पाच पंचायत समितीवर लाल बावटा फडकला आहे. शिवसेनेकडे १४ जिल्हा परिषद सदस्य, उरण, खालापूर, महाड आणि पोलादपूर या चार पंचायत समितींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. भाजपा आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य आहे.रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे, तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. त्यामुळे ते चांगल्याच मजबूत स्थितीमध्ये आहेत. त्यांची काही जागांवर बोलणी अद्यापही सुरु आहेत. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे यांचा मतदार संघ संपुष्टात आल्याने त्यांना शेकापच्या ताब्यातील खांडस मतदार संघ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. परंतु शेकाप तो मतदार संघ देण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येते. त्यामुळे टोकरे यांना कोठून उमेदवारी द्यायची याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.जिल्हा परिषदेवर एका पक्षाची सत्ता येणे सोडाच पण दोन पक्षांनाही कठीण जाणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू स्थिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये काँग्रेसलाही सामावून घेण्याबाबत प्रदेश पातळीवर बोलणी सुरु आहेत. याला राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनीही ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. स्थानिक पातळीवरील राजकारणाला वेग स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जाण्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते इच्छुक आहेत. परंतु अद्यापही वरिष्ठ स्तरावरुन युती, आघाडीबाबत आदेश आलेले नाहीत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत यांनी सांगितले. भाजपाची जिल्ह्यामध्ये ताकद नसल्याने त्यांच्या युतीबाबत अद्याप हे स्पष्ट केलेले नाही.शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी अलिबाग आणि पेण तालुक्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना अशी मोट बांधण्यात आली आहे. त्या दिशेने दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. अन्य ठिकाणीही युती करण्याबाबत शिवसेना प्रयत्न करीत आहे.