शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लेखापरीक्षण विभागाला टाळे ?

By admin | Updated: April 23, 2015 05:35 IST

स्थायी समितीच्या आखत्यारीत असलेल्या मुख्य लेखापरीक्षण विभागाला टाळे लावण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे़ या खात्यातील कर्मचारी वर्गात कपात करण्यात येत आहे़

मुंबई : स्थायी समितीच्या आखत्यारीत असलेल्या मुख्य लेखापरीक्षण विभागाला टाळे लावण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे़ या खात्यातील कर्मचारी वर्गात कपात करण्यात येत आहे़ हा प्रकार म्हणजे प्रशासनाचा स्थायी समितीच्या अधिकारावर गदा असल्याचे तीव्र पडसाद आज उमटले़ याची गंभीर दखल घेऊन अन्य विभागांमध्ये पाठविण्यात आलेले लेखापरीक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ माघारी बोलावण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले़ तसेच प्रशासनाच्या मनमानीविरोधात स्थायी समितीची बैठक एकमताने तहकूब करण्यात आली़ मुख्य लेखापरीक्षण हा विभाग १९३८ पासून कार्यरत आहे़ प्रशासकीय कामकाजाचे प्रत्येक महिन्यात परीक्षण करून स्थायी समितीपुढे अहवाल सादर करण्याचे या विभागाचे काम आहे़ परंतु गेल्या सात वर्षांमध्ये या विभागाकडून लेखापरीक्षण अहवाल सादर झालेला नाही़ हजार कर्मचारी-अधिकारी वर्ग असलेल्या या विभागातील शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान खात्यात पाठविण्यात आले आहे़ तसेच या विभागातील मनुष्यबळ कमी करीत हा विभाग बंद करण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली असल्याचे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणले़याबाबत नगर विकास खात्याला पत्र लिहून हा विभाग बंद करायचा असल्याने कर्मचारी वर्गाचे काय करावे, असे पत्रच आयुक्त सीताराम कुंटे यांनी नगर विकास खात्याला पाठविले आहे़ हे पत्र म्हणजे स्थायी समितीच्या अधिकारावर गदाच असल्याचा संताप सदस्यांनी व्यक्त केला़ आयएएस लॉबी लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा आणत असल्याने त्यांना दणका द्यायलाच हवा, असे मत सर्वांनी व्यक्त केले़ स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हे पत्रच बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त करीत सभा तहकूब केली़ (प्रतिनिधी)