मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने एप्रिल महिन्यात मुंबईत मोर्चाचे आयोजन केले असतानाच, त्यात सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. राज्य शासनाने शनिवारी तसे परिपत्रक जारी केले. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार शासकीय कर्मचाऱ्याने संप किंवा निदर्शनांमध्ये सहभागी होऊ नये, असे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ही शासन मान्यताप्राप्त संघटना नाही. अशा संघटनेद्वारे आयोजित मोर्चात कार्यालयीन वेळेत सहभागी होणे, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाची भंग करणारी ठरेल व मोर्चात सहभागी होणारे कर्मचारी हे शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
मोर्चात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई
By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST