शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

नवीन पूल उभारूनही गैरसोय

By admin | Updated: June 28, 2016 01:54 IST

नाणे मावळात जाण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर नऊ-दहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाची उभारणी करण्यात आली

कामशेत : नाणे मावळात जाण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर नऊ-दहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाची उभारणी करण्यात आली आहे. जुन्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात तो पाण्याखाली जात असल्याने नवीन पुलाची उंची वाढविण्यात आली. पण रस्त्याची उंची पुलापेक्षा कमी असल्याने, तसेच येथील रस्त्यावरील मोरींची दुरवस्था झाल्याने पाऊस व नदीचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक बंद होत असते. त्यामुळे पुलाएवढी रस्त्याची उंची करावी, अशी मागणी होत आहे.कामशेतमधून नाणे मावळात जाण्यासाठी इंद्रायणी नदी ओलांडावी लागते.नदीवर तीन पूल असून, एक सर्वात जुना व पडीक अवस्थेत आहे. त्याच्या बाजूला दुसरा पूल आहे. या पुलावरूनही पाणी जात असल्याने दहा वर्षांपूर्वी या दोन पुलांच्या मध्ये तिसऱ्या पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाची उंची जास्त ठेवण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पुलाच्याउंचीला प्राधान्य देऊन तशी उपाययोजना केली. पण, पुलाच्या पुढील रस्त्यावर पावसाळ्यात गेली अनेक वर्षे नदीच्या पुराचे पाणी येत असते. यामुळे नाणे मावळातील सर्व गावांचा संपर्क तुटतो. हे शासकीय अभियंत्यांच्या लक्षात का येत नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. पुलाची उंची व रस्त्याची उंची यात मोठी तफावत असल्याने पुराच्या पाण्यात पूल शाबूत राहतो; पण, रस्ता मात्र तीन ते चार फूट पाण्याखाली जातो. थोड्या पावसातही एक किलोमीटरच्या या रस्त्यावर पाणी येऊन कामशेत व नाणे मावळाचे दळणवळण ठप्प होत आहे. अनेक वर्षांच्या या समस्येने नागरिक त्रस्त असून दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदारवर्ग व इतर व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. नाणे मावळात साधारण ३० ते ३५ गावे व वाड्या-वस्त्या आहेत. नाणेगाव, नवीन उकसान, नाणोली, साई, वाउंड, कचरेवाडी, घोणशेत, देशमुखवाडी, खरमारेवाडी, लंकेवाडी, कांब्रे, कोंडिवडे, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, ब्राह्मणवाडी, पालेनामा, गोवित्री, उकसान, वडवली, वळवंती, कोळवाडी, उंबरवाडी, खांडशी, सांगिसे, भाजगाव, सोमवडी, शिरदे, थोरण, जांभवली आदी गावांतून व दुर्गम भागामधून लोक खरेदी, व्यवसाय, शिक्षणासाठी व इतर कामांसाठी येत असतात. पावसाळ्यात हा रस्ता पाण्याखाली गेल्यास व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजल्नदी पलीकडील रस्त्यावर दर वर्षी पाणी येत असून, तीन-चार फूट पाणी रस्त्यावरुन वाहत असते. वाहने व माणसे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे. पलीकडे असलेला अनाथाश्रम व मंदिर पूर्ण पाण्याखाली जाते. जुना पूल पाण्याखाली जातो म्हणून जास्त उंचीचा नवीन पूल करोडो रुपये खर्च करुन बांधला. पण, रस्त्याच्या उंचीकडे लक्ष दिले नाही. रस्ता पाण्याखाली जाऊन सर्वच गावांचा संपर्क तुडत असल्याने पुलासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे, असे नागरिक सांगतात. याशिवाय या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोऱ्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांनी भराव केल्याने मोरींचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. पाणी वाहून जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे नदीचे पाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन साचते. नाणे मावळात पावसाळ्याच्या दिवसांत अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी येत असतात. येथे प्राचीन कोंडेश्वर मंदिर, ढाकभैरी, धरणे, तसेच अनेक गावात प्राचीन मंदिरे आहेत. येथील डोंगररांगांमधून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी, भिजण्यासाठी पर्यटक येतात. पावसाचा जोर वाढला, की रस्त्यावर पाणी येते. रस्ता बंद झाल्याने अनेक पर्यटक पलीकडे अडकून पडतात. शासनाने लवकरात लवकर या रस्त्याची उंची वाढवावी, पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरी व चर काढावे, रस्त्याची कमी झालेली रुंदी रस्त्याची हद्द कायम करून त्यावरील शेतांची अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी होत आहे.  जाता येत नाही.नोकरदारांचे कामाचे खाडे होतात. कधी कधी तर चार ते पाच दिवस या रस्त्याचे पाणी ओसरत नाही. अशा वेळी अनेक लोक कामशेतमध्ये अडकून पडतात. या वेळी त्यांना पाहुण्या-रावळ्यांकडे राहावे लागते. वर्षाविहारासाठी येणारे पर्यटकही पलीकडे अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. नाणे मावळातील नागरिकांचे अतोनात हाल होतात. रग्णांना दवाखान्यात आणणेअवघड होऊन जाते. (वार्ताहर)