शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेत आलेच नाही संचालक अपात्रता विधेयक

By admin | Updated: August 6, 2016 04:53 IST

संचालकांच्या अपात्रतेसंदर्भातील विधानसभेने गुरुवारी रात्री उशिरा संमत केलेले विधेयक विधान परिषदेत आजच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीदेखील मांडले गेले नाही

मुंबई : सहकारी संस्थांच्या संचालकांच्या अपात्रतेसंदर्भातील विधानसभेने गुरुवारी रात्री उशिरा संमत केलेले विधेयक विधान परिषदेत आजच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीदेखील मांडले गेले नाही. सरकारची ही खेळी असल्याचा आरोप करून विरोधकांनी सरकाला घेरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या विषयी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करीत ही प्रशासकीय चूक असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, काँग्रेसचे नारायण राणे यांनी या बाबत सरकारवर टीका केली. त्यांनी आरोप केला की विधान परिषदेची संमती न घेण्याची खेळी या मागे आहे. सुरुवातीला संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. दरम्यान, या मुद्यावर दुपारी सभागृह दुपारी २ पर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरु होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात जाहीर दिलगिरी व्यक्त केली. या सार्वभौम सभागृहाचा सन्मान राखलाच पाहिजे. चिकित्सा समिती वेळेत नियुक्त व्हायला हवी होती, अशी कबुलीही त्यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात सभापती जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असल्याचे सांगत विरोधकांनी हा चेंडू सभापतींच्या कोर्टात टोलवला. विधानसभेत सरकारकडे बहुमत आहे. साहजिकच बहुमताच्या जोरावर सरकारला हवी ती विधेयके सभेत मंजूर करु न घेतली जातात. मात्र, परिषदेत विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे अनेकदा विधानसभेने मंजूर केलेली विधेयके परिषदेत विरोधक लटकवून ठेवतात. त्यासाठी अशी विधेयके चिकित्सा समितीकडे सहा महिन्यांसाठी पाठवण्याची विरोधकांची खेळी असते.त्याचमुळे राज्य सरकारने विरोधकांच्याही पुढे जाऊन चिकित्सा समिती स्थापनच केली नाही, असे म्हटले जाते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील सुधारणेचे हे विधेयक गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेत मंजूर झाले होते. पण विधान परिषदेने हे विधेयक सहमत न करता ते सभागृहाच्या चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. (विशेष प्रतिनिधी)>विधानसभेत गुरु वारी ते दुसऱ्यांदा मंजूर होऊनही आज विधान परिषदेत आलेच नाही. ही बाब विधान परिषद सभागृहाचा अवमान असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सरकारला या सभागृहाचे, सदस्यांचे अधिकार मान्य नसतील तर हे सभागृहच बरखास्त करा, असा टोलाही त्यांनी हाणला.