शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

विधान परिषदेत आलेच नाही संचालक अपात्रता विधेयक

By admin | Updated: August 6, 2016 04:53 IST

संचालकांच्या अपात्रतेसंदर्भातील विधानसभेने गुरुवारी रात्री उशिरा संमत केलेले विधेयक विधान परिषदेत आजच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीदेखील मांडले गेले नाही

मुंबई : सहकारी संस्थांच्या संचालकांच्या अपात्रतेसंदर्भातील विधानसभेने गुरुवारी रात्री उशिरा संमत केलेले विधेयक विधान परिषदेत आजच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीदेखील मांडले गेले नाही. सरकारची ही खेळी असल्याचा आरोप करून विरोधकांनी सरकाला घेरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या विषयी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करीत ही प्रशासकीय चूक असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, काँग्रेसचे नारायण राणे यांनी या बाबत सरकारवर टीका केली. त्यांनी आरोप केला की विधान परिषदेची संमती न घेण्याची खेळी या मागे आहे. सुरुवातीला संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. दरम्यान, या मुद्यावर दुपारी सभागृह दुपारी २ पर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरु होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात जाहीर दिलगिरी व्यक्त केली. या सार्वभौम सभागृहाचा सन्मान राखलाच पाहिजे. चिकित्सा समिती वेळेत नियुक्त व्हायला हवी होती, अशी कबुलीही त्यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात सभापती जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असल्याचे सांगत विरोधकांनी हा चेंडू सभापतींच्या कोर्टात टोलवला. विधानसभेत सरकारकडे बहुमत आहे. साहजिकच बहुमताच्या जोरावर सरकारला हवी ती विधेयके सभेत मंजूर करु न घेतली जातात. मात्र, परिषदेत विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे अनेकदा विधानसभेने मंजूर केलेली विधेयके परिषदेत विरोधक लटकवून ठेवतात. त्यासाठी अशी विधेयके चिकित्सा समितीकडे सहा महिन्यांसाठी पाठवण्याची विरोधकांची खेळी असते.त्याचमुळे राज्य सरकारने विरोधकांच्याही पुढे जाऊन चिकित्सा समिती स्थापनच केली नाही, असे म्हटले जाते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील सुधारणेचे हे विधेयक गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेत मंजूर झाले होते. पण विधान परिषदेने हे विधेयक सहमत न करता ते सभागृहाच्या चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. (विशेष प्रतिनिधी)>विधानसभेत गुरु वारी ते दुसऱ्यांदा मंजूर होऊनही आज विधान परिषदेत आलेच नाही. ही बाब विधान परिषद सभागृहाचा अवमान असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सरकारला या सभागृहाचे, सदस्यांचे अधिकार मान्य नसतील तर हे सभागृहच बरखास्त करा, असा टोलाही त्यांनी हाणला.