शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची वाट अवघडच

By admin | Updated: June 27, 2017 02:26 IST

विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसमोर आता रोज नवीन आव्हाने उभी राहत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसमोर आता रोज नवीन आव्हाने उभी राहत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आता विधिच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ४५ टक्क्यांची मर्यादा असतानाही ४९ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाइन स्वीकारले जात नाहीत. गुणांची मर्यादा वाढल्यास शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू शकते. दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचे टीवायचे निकाल लागण्याची चिन्ह नसल्याने हजारो विद्यार्थी तणावाखाली आहेत. शेकडो विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने सीईटी सेलने यावर तातडीने कार्यवाही करून सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे. विधि अभ्यासक्रमांसाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत ५ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज भरता येणार नाहीत. एलएलबीच्या अभ्यासक्रम माहितीपुस्तिकेत ४५ टक्क्यांची मर्यादा देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अर्ज भरताना ४७ अथवा ४८ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ जूनला सुरू झाली. ४९ टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जात नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत ४९.५० टक्क्यांहून कमी गुण असल्यामुळे तुमचा अर्ज स्वीकारला जात नसल्याचा मेसेज येत आहे. याबाबत युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी सीईटी सेल आयुक्त चंद्रशेखर ओक यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची गैरसोय तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे.