शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नाल्यांवरील बांधकामांच्या कारवाईवरून प्रशासनात मतभेद

By admin | Updated: April 26, 2016 04:16 IST

येत्या दीड महिन्यावर पावसाळा आला असताना शहरातील धोकादायक इमारतींबरोबरच नाल्यांवरील बांधकामांचा मुद्दाही आता चर्चेत आला आहे

ठाणे : येत्या दीड महिन्यावर पावसाळा आला असताना शहरातील धोकादायक इमारतींबरोबरच नाल्यांवरील बांधकामांचा मुद्दाही आता चर्चेत आला आहे. या बांधकामांवर सरसकट कारवाई करण्याची मागणी भाजपा आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी महासभेत केली. सरसकट कारवाई केली तर त्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी तेवढी घरे पालिकेकडे नसल्याने ती कशी करायची, असा सवाल पालिका प्रशासनाने उपस्थित केला. तर, पुनर्वसनाची जबाबदारी पालिका घेणार नाही, असा ठराव करण्याची भूमिका पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेताच सर्वच लोकप्रतिनिधींनी आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कारवाईच्या या मुद्यालाच बगल देऊन हा विषयच बंद केला.बुधवारच्या महासभेत काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे आणि भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी नाल्यांवरील बांधकामांवर कारवाई कधी करणार, असा सवाल केला होता. परंतु, कारवाई करण्यास काहीच अडचण नसल्याचे सांगून आयुक्त जयस्वाल यांनी ती केल्यानंतर सुमारे १० हजारांच्यावर रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. सध्या पालिकेकडे तेवढी घरेच नसल्याने त्यांचे पुनर्वसन पालिका करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, यापूर्वीच नाल्यांवरील बांधकामे निष्कासित करण्याचा ठराव झाला असल्याची आठवणही पाटणकर यांनी प्रशासनाला करून दिली. त्यामुळे त्याचे काय करणार, असा सवालही त्यांनी केला. नाल्यांच्या दोन्ही बाजूंस सहा मीटर सोडून तरी किमान कारवाई करावी, असा सल्लाही दिला किंवा जी बांधकामे संपूर्णपणे नाल्यातच आहेत, अशांवर तरी किमान ती करावी, अशी मागणी केली.पाटणकर आणि शिंदे हे दोन्ही नगरसेवक या मुद्यावरुन आक्रमक झाले होते. त्यानुसार, पुन्हा आयुक्तांनी प्रशासनाची बाजू मांडताना कारवाई करण्यास पालिका तयार आहे. परंतु, पालिका त्या रहिवाशांचे पुनर्वसन करणार नाही, अशी गुगली टाकून तसा ठराव करावा, अशी सूचना त्यांनी केली. (प्रतिनिधी)