शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नाल्यांवरील बांधकामांच्या कारवाईवरून प्रशासनात मतभेद

By admin | Updated: April 26, 2016 04:16 IST

येत्या दीड महिन्यावर पावसाळा आला असताना शहरातील धोकादायक इमारतींबरोबरच नाल्यांवरील बांधकामांचा मुद्दाही आता चर्चेत आला आहे

ठाणे : येत्या दीड महिन्यावर पावसाळा आला असताना शहरातील धोकादायक इमारतींबरोबरच नाल्यांवरील बांधकामांचा मुद्दाही आता चर्चेत आला आहे. या बांधकामांवर सरसकट कारवाई करण्याची मागणी भाजपा आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी महासभेत केली. सरसकट कारवाई केली तर त्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी तेवढी घरे पालिकेकडे नसल्याने ती कशी करायची, असा सवाल पालिका प्रशासनाने उपस्थित केला. तर, पुनर्वसनाची जबाबदारी पालिका घेणार नाही, असा ठराव करण्याची भूमिका पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेताच सर्वच लोकप्रतिनिधींनी आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कारवाईच्या या मुद्यालाच बगल देऊन हा विषयच बंद केला.बुधवारच्या महासभेत काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे आणि भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी नाल्यांवरील बांधकामांवर कारवाई कधी करणार, असा सवाल केला होता. परंतु, कारवाई करण्यास काहीच अडचण नसल्याचे सांगून आयुक्त जयस्वाल यांनी ती केल्यानंतर सुमारे १० हजारांच्यावर रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. सध्या पालिकेकडे तेवढी घरेच नसल्याने त्यांचे पुनर्वसन पालिका करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, यापूर्वीच नाल्यांवरील बांधकामे निष्कासित करण्याचा ठराव झाला असल्याची आठवणही पाटणकर यांनी प्रशासनाला करून दिली. त्यामुळे त्याचे काय करणार, असा सवालही त्यांनी केला. नाल्यांच्या दोन्ही बाजूंस सहा मीटर सोडून तरी किमान कारवाई करावी, असा सल्लाही दिला किंवा जी बांधकामे संपूर्णपणे नाल्यातच आहेत, अशांवर तरी किमान ती करावी, अशी मागणी केली.पाटणकर आणि शिंदे हे दोन्ही नगरसेवक या मुद्यावरुन आक्रमक झाले होते. त्यानुसार, पुन्हा आयुक्तांनी प्रशासनाची बाजू मांडताना कारवाई करण्यास पालिका तयार आहे. परंतु, पालिका त्या रहिवाशांचे पुनर्वसन करणार नाही, अशी गुगली टाकून तसा ठराव करावा, अशी सूचना त्यांनी केली. (प्रतिनिधी)