शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

डायलिसिस सेंटर प्रत्येक जिल्ह्यात उभारणार, धर्मादाय आयुक्तालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:44 IST

गौरीशंकर घाळेमुंबई : धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समित्यांनी यंदाच्या वर्षी यशस्वीपणे सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले होते. त्यानंतर आता गरीब रुग्णांना माफक दरात सेवा पुरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस सेंटर उभारण्याचा उपक्रम धर्मादाय आयुक्तालय आणि जिल्हा नियोजन समित्यांनी हाती घेतला आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अथवा तालुक्याच्या ठिकाणी डायलिसिस ...

गौरीशंकर घाळेमुंबई : धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समित्यांनी यंदाच्या वर्षी यशस्वीपणे सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले होते. त्यानंतर आता गरीब रुग्णांना माफक दरात सेवा पुरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस सेंटर उभारण्याचा उपक्रम धर्मादाय आयुक्तालय आणि जिल्हा नियोजन समित्यांनी हाती घेतला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अथवा तालुक्याच्या ठिकाणी डायलिसिस सेंटर नाहीत. त्यामुळे रुग्णांना प्रवास खर्च करून डायलिसिस सेंटरला जावे लागते. विशेषत: गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी निर्माण केलेल्या जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस सेंटर उभारण्याचे निर्देश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील सर्व धर्मादायसह आयुक्त, धर्मादाय उपायुक्त आणि सहायक धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था कायद्यातील विश्वस्त संस्थांच्या उद्देशान्वये गरीब लोकांची सेवा करणे, मदत करणे, त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा देणे अभिप्रेत आहे. धर्मादाय संस्थांचे पालनकर्ता म्हणून विविध संस्थांमार्फत गरीब रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळतात की नाही अथवा त्या उपलब्ध करून देणे हा धर्मादाय आयुक्तालयाच्या कामकाजाचा भाग असल्याचे या परिपत्रकात नमूद आहे. त्यामुळे जिल्हा समित्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरील धर्मादाय रुग्णालये, आणि खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने जिल्हा, तालुका स्तरावर डायलिसिस सेंटर उभारण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. डायलिसिस सेंटरच्या उभारणीसाठी, कार्यान्विततेसाठी जिल्ह्यातील धार्मिक संस्था, अन्य सामाजिक, शैक्षणिक संस्थांकडून निधी घ्यावा, असे आवाहन राज्य धर्मादाय आयुक्तांनी केले आहे.हिशोब ठेवण्याचे निर्देशनिधी उभारताना कोणावरही दबाव अथवा सक्ती करू नये. शिवाय, ज्या संस्थामध्ये वाद आहेत अशा विश्वस्तांकडून निधी घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत. केवळ जिल्हा नियोजन समित्यांमार्फत निधी स्वीकारून त्याचा हिशोब ठेवण्याचे निर्देशही राज्य धर्मादाय आयुक्तांनी दिले.