शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

डायलिसिस सेंटर प्रत्येक जिल्ह्यात उभारणार, धर्मादाय आयुक्तालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:44 IST

गौरीशंकर घाळेमुंबई : धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समित्यांनी यंदाच्या वर्षी यशस्वीपणे सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले होते. त्यानंतर आता गरीब रुग्णांना माफक दरात सेवा पुरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस सेंटर उभारण्याचा उपक्रम धर्मादाय आयुक्तालय आणि जिल्हा नियोजन समित्यांनी हाती घेतला आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अथवा तालुक्याच्या ठिकाणी डायलिसिस ...

गौरीशंकर घाळेमुंबई : धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समित्यांनी यंदाच्या वर्षी यशस्वीपणे सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले होते. त्यानंतर आता गरीब रुग्णांना माफक दरात सेवा पुरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस सेंटर उभारण्याचा उपक्रम धर्मादाय आयुक्तालय आणि जिल्हा नियोजन समित्यांनी हाती घेतला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अथवा तालुक्याच्या ठिकाणी डायलिसिस सेंटर नाहीत. त्यामुळे रुग्णांना प्रवास खर्च करून डायलिसिस सेंटरला जावे लागते. विशेषत: गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी निर्माण केलेल्या जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस सेंटर उभारण्याचे निर्देश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील सर्व धर्मादायसह आयुक्त, धर्मादाय उपायुक्त आणि सहायक धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था कायद्यातील विश्वस्त संस्थांच्या उद्देशान्वये गरीब लोकांची सेवा करणे, मदत करणे, त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा देणे अभिप्रेत आहे. धर्मादाय संस्थांचे पालनकर्ता म्हणून विविध संस्थांमार्फत गरीब रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळतात की नाही अथवा त्या उपलब्ध करून देणे हा धर्मादाय आयुक्तालयाच्या कामकाजाचा भाग असल्याचे या परिपत्रकात नमूद आहे. त्यामुळे जिल्हा समित्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरील धर्मादाय रुग्णालये, आणि खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने जिल्हा, तालुका स्तरावर डायलिसिस सेंटर उभारण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. डायलिसिस सेंटरच्या उभारणीसाठी, कार्यान्विततेसाठी जिल्ह्यातील धार्मिक संस्था, अन्य सामाजिक, शैक्षणिक संस्थांकडून निधी घ्यावा, असे आवाहन राज्य धर्मादाय आयुक्तांनी केले आहे.हिशोब ठेवण्याचे निर्देशनिधी उभारताना कोणावरही दबाव अथवा सक्ती करू नये. शिवाय, ज्या संस्थामध्ये वाद आहेत अशा विश्वस्तांकडून निधी घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत. केवळ जिल्हा नियोजन समित्यांमार्फत निधी स्वीकारून त्याचा हिशोब ठेवण्याचे निर्देशही राज्य धर्मादाय आयुक्तांनी दिले.