शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

निदान वाढीव पाणीपट्टी रद्द करा

By admin | Updated: July 23, 2016 01:38 IST

पाऊस चांगला झाला असला तरी पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा अद्याप समाधानकारक नाही.

पुणे : पाऊस चांगला झाला असला तरी पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा अद्याप समाधानकारक नाही. त्यामुळे आताच शहराला रोज पाणी देऊन भविष्यात संकट ओढवून घेऊ नये. मात्र गेले सलग ८ महिने पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना दिलासा म्हणून त्यांच्यावर लादलेली वाढीव पाणीपट्टी निदान या वर्षीपुरती रद्द करा, अशी मागणी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी केली.पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला ही धरणे भरली असल्यामुळे पुण्याला रोज पाणी सोडावे, अशी मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अलगुडे यांनी शुक्रवारी पानशेत, वरसगाव व खडकवासला या धरणांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र राऊत होते. पालिका प्रशासनाने पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठीच्या योजनेला सभागृहात मतदान करून मंजुरी घेतली गेली. या योजनेसाठी म्हणूनच पुणेकरांवर या वर्षी १० टक्के व नंतर दरवर्षी ५ टक्के याप्रमाणे वाढीव पाणीपट्टी लादली. २४ तास पाणी देणे दूरच राहिले, दिवसाआड पाणी देण्याची वेळ प्रशासनावर आली. जवळपास वर्षभर पुणेकर ही टंचाई सहन करीत आहेत. प्रशासनाने आता त्यांना दिलासा म्हणून या वर्षीची वाढीव पाणीपट्टी रद्द करावी, अशी मागणी अलगुडे यांनी केली. (प्रतिनिधी)