शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

शेवटचे चार दिवस धुमधडाका

By admin | Updated: August 29, 2014 03:12 IST

गणेशोत्सवातील शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी मिळाल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे

औरंगाबाद : गणेशोत्सवातील शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी मिळाल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. अशी परवानगी देत असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केल्याने औरंगाबाद खंडपीठाच्या न्या़ आर. एम. बोर्डे आणि न्या़ व्ही. के. जाधव यांनी यासंदर्भातील याचिका निकाली काढली. वर्षभरात १५ वेगवेगळ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्यात येते. यात तीन दिवस कोणते हे ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. गणेशोत्सवात गौरी विसर्जन, गणेश चतुर्थी आणि गणेश विसर्जनाचा दिवस, असे एकूण तीन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्यात येते. गणेशोत्सवात शेवटचे सलग चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन विनोद पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिले होते. या निवेदनावर कोणताही निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. अशीच मागणी करणाऱ्या जनहित याचिकेत २०११ मध्ये खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे आदेशित केले होते. मात्र, त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही, अशी माहिती याचिकाकर्त्याने २६ आॅगस्ट रोजी सुनावणीवेळी न्यायालयाला दिली होती.