शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

धनगर समाजात साखरपुडा बंद

By admin | Updated: June 1, 2014 00:28 IST

धनगर समाज मंडळाने जिल्ह्यात साखरपुडा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेत ला असून त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

म्हसावद : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करताना त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी समाज परिवर्तनाचा अनोखा संकल्प येथील धनगर समाज मंडळाने घेतला आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात समाजात साखरपुडा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने म्हसावद येथे शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रम झाले. त्यानिमित्ताने सकाळी प्रतिमा पूजन व व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मोहन फणसे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून ‘परिवर्तनाची लढाई’चे चंद्रकांत हजारे व प्रमुख अतिथी म्हणून देवीदास हटकर, मुख्याध्यापिका सुरेखा गुजर, रमाकांत पाटील उपस्थित होते. या वेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र मांडले. याचवेळी समाज बांधवांनी अहिल्याबाई होळकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी समाजातील अनिष्ट रूढी व प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रामुख्याने साखरपुडा बंद करणे व लग्नाच्या बस्त्यासाठी जाणारी अनावश्यक गर्दी टाळणे हे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांसंदर्भात समाजातील कार्यकर्ते गावागावात फिरून लोकजागृती करणार आहेत. या निर्णयाचे समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या वेळी दिलीप चैत्राम धनगर, अंबालाल लांडगे, प्रा.श्रीराम सूर्यवंशी, भटू धनगर, अनिल सूर्यवंशी, विनोद ठाकरे, ज्ञानेश्वर लांडगे, अशोक लामगे, गोरख ठाकरे, प्रकाश सूर्यवंशी, विजय भलकार, किशोर लांडगे, नानाभाई मुजगे, चिंतामण लांडगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गणेश सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन अशोक बागले यांनी तर आभार डॉ.रजनीकांत सूर्यवंशी यांनी मानले. (वार्ताहर)