शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

धनगर समाजालाही सव्वा लाखाचे घरकूल; लाभासाठी योजनेचे निकष काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 23:19 IST

समाज कल्याण विभागाकडून या योजनेचे परिचालन होत असले तरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत त्याचे निधीचे वितरण व नियंत्रण केले जाते.

नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार सोडून रानोमाळ भटकणाऱ्या भटक्या आणि विमुक्त जमातीच्या लोकांना कायमस्वरूपी एकाच जागेवर स्थायिक करण्याचा भाग म्हणून समाजकल्याण विभागाच्या वतीने भटके व धनगर समाजाच्या कुटुंबीयांसाठी शासनाच्या मदतीतून घरकूल उभारून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

काय आहे योजना? राज्यामध्ये भटक्या जमातीच्या लोकांचे राहणीमान उंचावणे, तसेच त्यांच्या जीवनात स्थिरता आणून त्यांचा कौटुंबिक विकास साधणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून, स्वतःच्या नावावर कुठेही घर नसलेल्या बेघरांसाठी शासनाकडून जागा व घरकूल बांधून देण्याची योजना आहे.

अर्ज कसा कराल?या योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या अर्जदारांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाची भेट घ्यावी. आवश्यक कागदपत्रांची आणि अधिक माहितीची चौकशी करावी आणि समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज करावा.

लाभासाठी योजनेचे निकष काय?या योजनेसाठी गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे, स्वतःच्या मालकीचे घर नसावे. राज्याचा रहिवासी असावा. कच्च्या घरात झोपड्यांमध्ये राहणारा असावा.

चार हप्त्यांत मिळणार एक लाख २० हजार रुपयेसमाज कल्याण विभागाकडून या योजनेचे परिचालन होत असले तरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत त्याचे निधीचे वितरण व नियंत्रण केले जाते. साधारणतः चार हप्त्यात घरकुलाची रक्कम अदा केली जाते. त्यात पहिला इसा १५, नंतर ४० व ४५ व शेवटी २० हजारांचे वाटप केले जाते.

योजनेच्या प्रचाराला यंत्रणा अयशस्वीभटक्या व विमुक्त समाजाला स्थैर्य मिळवून देणाऱ्या या योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात समाजकल्याण विभाग अपयशी ठरला आहे.

समाज कल्याण विभागाकडून ही योजना राबविली जाते. त्यांच्यामार्फत त्याचा प्रचार व प्रसार होणे अपेक्षित आहे. लाभार्थी थेट समाज कल्याण कार्यालयाकडे घरकुलासाठी अर्ज करू शकतो. तालुकापातळीवर पंचायत समितीमार्फत या संदर्भातील प्रस्ताव समाज कल्याणला पाठविले जातात. त्यानंतर मंजूर यादी ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त झाल्यावर त्याची अंमलबाजवणी सुरु होते- आनंद पिंगळे, प्रकल्प संचालक