शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजालाही सव्वा लाखाचे घरकूल; लाभासाठी योजनेचे निकष काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 23:19 IST

समाज कल्याण विभागाकडून या योजनेचे परिचालन होत असले तरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत त्याचे निधीचे वितरण व नियंत्रण केले जाते.

नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार सोडून रानोमाळ भटकणाऱ्या भटक्या आणि विमुक्त जमातीच्या लोकांना कायमस्वरूपी एकाच जागेवर स्थायिक करण्याचा भाग म्हणून समाजकल्याण विभागाच्या वतीने भटके व धनगर समाजाच्या कुटुंबीयांसाठी शासनाच्या मदतीतून घरकूल उभारून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

काय आहे योजना? राज्यामध्ये भटक्या जमातीच्या लोकांचे राहणीमान उंचावणे, तसेच त्यांच्या जीवनात स्थिरता आणून त्यांचा कौटुंबिक विकास साधणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून, स्वतःच्या नावावर कुठेही घर नसलेल्या बेघरांसाठी शासनाकडून जागा व घरकूल बांधून देण्याची योजना आहे.

अर्ज कसा कराल?या योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या अर्जदारांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाची भेट घ्यावी. आवश्यक कागदपत्रांची आणि अधिक माहितीची चौकशी करावी आणि समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज करावा.

लाभासाठी योजनेचे निकष काय?या योजनेसाठी गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे, स्वतःच्या मालकीचे घर नसावे. राज्याचा रहिवासी असावा. कच्च्या घरात झोपड्यांमध्ये राहणारा असावा.

चार हप्त्यांत मिळणार एक लाख २० हजार रुपयेसमाज कल्याण विभागाकडून या योजनेचे परिचालन होत असले तरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत त्याचे निधीचे वितरण व नियंत्रण केले जाते. साधारणतः चार हप्त्यात घरकुलाची रक्कम अदा केली जाते. त्यात पहिला इसा १५, नंतर ४० व ४५ व शेवटी २० हजारांचे वाटप केले जाते.

योजनेच्या प्रचाराला यंत्रणा अयशस्वीभटक्या व विमुक्त समाजाला स्थैर्य मिळवून देणाऱ्या या योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात समाजकल्याण विभाग अपयशी ठरला आहे.

समाज कल्याण विभागाकडून ही योजना राबविली जाते. त्यांच्यामार्फत त्याचा प्रचार व प्रसार होणे अपेक्षित आहे. लाभार्थी थेट समाज कल्याण कार्यालयाकडे घरकुलासाठी अर्ज करू शकतो. तालुकापातळीवर पंचायत समितीमार्फत या संदर्भातील प्रस्ताव समाज कल्याणला पाठविले जातात. त्यानंतर मंजूर यादी ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त झाल्यावर त्याची अंमलबाजवणी सुरु होते- आनंद पिंगळे, प्रकल्प संचालक